03:14am | Jan 07, 2019 |
सातारा : ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांनी तत्कालिन व्यवस्थेविरोधात ‘दर्पण’मधून आवाज उठवला. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढले. हाच आदर्श ठेवून आजची पत्रकारिता अधिक प्रगल्भ करून सर्वसामान्य माणसांच्या वेदनेला आवाज द्या, असे आवाहन सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी केले.
पत्रकारदिनानिमित्त सातारा पत्रकार संघाच्यावतीने ‘दर्पण’कारांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सातारा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी अध्यक्ष शरद काटकर, दै.‘पुढारी’चे ब्युरो मॅनेजर जीवनधर चव्हाण, दीपक प्रभावळकर, दीपक शिंदे, राहुल तपासे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. पाटणे म्हणाले, ‘दर्पण’कारांचे लेखन हे समाजहितैषी व नि:पक्षपाती होते. चुकीच्या व्यवस्थेविरोधात त्यांनी दर्पणमधून प्रखरतेने आवाज उठवला. पत्रकार हा केवळ बातम्या लिहणारा नसला पाहिजे तर अभ्यासू, व्यासंगी, वक्तृत्व कलेवर प्रभुत्व मिळवणारा असला पाहिजे. त्याचे मन संवेदनशील असले पाहिजे तरच तो व्यथा पोटतिडकीने मांडू शकतो. सातारा पत्रकार संघाला चांगला वारसा लाभला आहे. तसेच सातारा जिल्ह्याने पत्रकारितेचा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. पत्रकारांच्या हक्काची लढावू संघटना जिल्ह्यातही उभी आहे. या संघटनेच्या छत्राखाली मतभेद विसरून सगळे एकत्र आले आहेत हे फार मोठे यश आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, पत्रकाराने पत्रकाराच्या मदतीला उभे राहणे हाच खरा धर्म आहे. सातारा पत्रकार संघाने आतापर्यंत हे काम केले आहे. भविष्यात सुद्धा चांगले काम होईल. बाळशास्त्री जांभेकरांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार पत्रकारांची वाटचाल सुरू राहिल.
शरद काटकर म्हणाले, आजची पत्रकारिता सोशल होवू लागली आहे. सध्याची पत्रकारिता सुसंस्कृत व सुसह्य झाली आहे. नव्या पिढीतील पत्रकारांनी अधिक अभ्यासूपणे सामोरे गेले पाहिजे.
दिपक प्रभावळकर म्हणाले, सातारा जिल्हा हा पत्रकारितेतील अभेद्य जिल्हा असून सर्व पत्रकार हे एकाच छत्राखाली आहेत हे खूप महत्वाचे आहेत.पत्रकार संघाचे कवच हे जिल्ह्यात अभेद्य असून ते तसेच ठेवूया.
दिपक शिंदे म्हणाले, पत्रकारितेत अनेक संधी येत राहतात. आधुनिक युगात अनेक बदल घडत असून त्याप्रमाणे आपणही बदलणे गरजेचे आहे.
यावेळी शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयामधील पत्रकार उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |