लंडन : इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संघातील मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी झुंजार कामगिरी करण्यास तयार राहावे, अशी सूचना केली आहे ती भारताचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत भारतीय संघाचा डाव १७९ धावांत ३९.२ षटकांत आटोपला. या पार्श्वभूमीवर विराटने पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या सहाकाऱ्यांना ही सूचना केली. रवींद्र जाडेजाने ५० चेंडूंत ५४ धावा केल्याने भारताला सराव सामन्यात किमान दीडशे धावांच्या पुढे मजल मारता आली होती.
विराटने हेदेखील मान्य केले की त्याच्या सहकाऱ्यांना डावपेचांची व्यवस्थिती अंमलबजावणी करता आली नाही. 'परिस्थिती आव्हानात्मक होती, अशा परिस्थितीत डावपेचांनुसार वाटचाल करणे आवश्यक असते जे आम्हाला जमले नाही. इंग्लंडमधील काही ठिकाणी असे ढगाळ वातावरण सातत्याने असणार. त्यामुळे भारतीय संघाने ४ बाद ५० अशा स्थितीतून सावरत १८०पर्यंतचे आव्हान उभारले हे काही वाईट नाही', असे विराट म्हणाला. न्यूझीलंडने या सराव लढतीत भारतावर सहा विकेट राखून मात केली. 'वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत कधीकधी आघाडीची फळी अपयशी ठरू शकते. जे आमच्याबाबतीत झाले. तेव्हा हार्दिककडून झालेल्या धावा, धोनीने दडपण कमी करण्याचा केलेला प्रयत्न आणि जाडेजाचे अर्धशतक हे या अपयशातून भारतीय संघाला मिळालेल्या सकारात्मक बाबी आहेत', असे विराट म्हणाला.
भारतीय संघातील गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल विराट म्हणाला, 'लढतीच्या दुसऱ्या डावांत खेळपट्टीकडून गोलंदाजांसाठी काहीच उरले नाही. तरीदेखील आमच्या गोलंदाजांनी धावांना चाप लावला होता. अशा कमी धावसंख्येच्या आव्हानाच्या वेळीस क्षेत्ररक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. झेल घेण्याची सोप संधी त्यांनी साधली तरी लढतीला कलाटणी मिळू शकते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही स्तरावर कामगिरी उंचवावी लागेल'.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |