04:08am | Aug 04, 2019 |
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कधी नव्हे असा मुसळधार पाऊस पडत आहे. सुमारे दहा वर्षानंतर सातारा जिल्ह्यातील धरणे नियोजित वेळेमध्ये भरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील विविध नद्यांवरील असलेले पूल मात्र शेवटच्या घटका मोजत असल्यामुळे कोणत्याही क्षणी महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलावरील दुर्घटना घडू शकते. अतीवृष्टीनंतर जिल्हा प्रशासनाला आताशा उपरती आली आहे.
सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून राज्यभरात ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांचे नियोजन बिघडलेले आहे. अवेळी पडणार्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणेही पूर्ण क्षमतेने भरत नाहीत, असे विदारक चित्र आहे. मात्र यावर्षी सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील कोयना धरण हे जवळपास पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे, तर जिल्ह्यातील इतर धरणेही येत्या काही दिवसांत पावसाच्या संततधारेमुळे भरणार आहेत. आजच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उरमोडी, कण्हेर, धोम, तारळी या धरणाजवळच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, झोपलेल्या सातारा जिल्हा प्रशासनाला अतीवृष्टीनंतर पावसाच्या थेंबाचे तुषार चेहर्यावर उडल्यामुळे जाग आलेली आहे. कोणतीही आपत्कालीन यंत्रणा सक्रीय नसतानाही जिल्हा प्रशासन लोकांना सतर्कतेचा इशारा देत आहे, ही मोठी हास्यास्पद बाब आहे. परवाच कराड येथील कोयना नदीवरील पूल कोसळला (पाडला की, कोसळला? याबाबत अनेकांची मत मतांतरे आहेत). मात्र सातारा जिल्ह्यातील माहुली येथील ब्रिटीशकालीन पूल, वडूथ व आरळे दरम्यानचा कृष्णा नदीवरील पूल अखेरची घटका मोजत आहेत.
आरळे वडूथ दरम्यानच्या पुलाबाबत दि. 18 जानेवारी 2019 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले होते की, आरळे येथील कृष्णा नदीवरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या पुलाला उणीपुरी दोनशे वर्षे पूर्ण झालेली आहेत. या पुलाचा एकजरी चिरा निखळला तरी महाड जवळील सावित्री नदीवर झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होवू शकते. याच पुलावरुन 50 टनांपेक्षा जास्त वजनाची असलेली वाहतूक होत आहे. अनेक अवजड वाहने राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील टोल वाचविण्यासाठी लोणंद-सातारा मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. सुमारे सात महिन्यांपूर्वी अशा आशयाचे निवेदन निलेश नलावडे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले होते. परंतू सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही. सध्या अतीवृष्टी झाल्यामुळे आजच सातारा जिल्हाधिकारी यांनी वाढे, ता. सातारा व वडूथ येथील पुलांची पाहणी करुन या दोन्ही पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. मात्र याबाबत गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करणारे भाजयुमो चे निलेश नलावडे तसेच वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी वारंवार वडूथ-आरळे तसेच वाढे येथील पुलांबाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला होता.
मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला. परंतू धुवॉंधार पडणार्या पावसाने जिल्हा प्रशासनाची अक्कल ठिकाणावर आणली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. वडूथ आरळे येथील पुलांना पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. उशीरा का होईना पावसाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन ऍलर्ट झालेले आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून प्रतीसेकंद 13 हजार 527 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. त्यामुळे संगमनगर, मुळगाव पूल पाण्याखाली गेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीकाठच्या 238 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र इशारा देणार्या प्रशासनाकडे आपत्ती निवारण व्यवस्थापन आहे काय? याबाबतही जिल्ह्यातील जनतेला शंका आहे. अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नाही. तहान लागल्यानंतर विहीर खोदणार्या प्रवृत्तींमुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होत आहे. मात्र असे असूनही जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी मात्र खाबुगिरीत व्यस्त आहेत. अतीवृष्टीमधून मला किती मिळेल, याचाच विचार जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी करीत आहेत. त्यामुळे अतीवृष्टीनंतर का होईना जिल्हा प्रशासन नुसता आवाहनांचा फार्स करणार की काय, याबाबत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |