07:43pm | Oct 16, 2019 |
सातारा : महाराष्ट्रात शेतीसाठी कोणतेही सक्षम यंत्रणा, यंत्रणा नसल्यामुळे २००६ पासून १ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीवरचा जीएसटी कमी झाला नाही. इरमा कायद्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही. देशात सध्या चौकटीबाहेर विचार करणाऱ्या पक्षाची सत्ता असल्यामुळे उद्या दि. १७ श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बुधाजीराव मुळीक पुढे म्हणाले, गेली अनेक वर्ष शेती चे प्रश्न आहेत असेच आहेत ते सुटले नाहीत. शेती कायद्यापासून वंचित आहे. शेतकऱ्यांना फायदेशीर असा कोणताही कायदा नसल्याने त्यांची अडचण होत आहे. शेतीला पाणी द्यावे, विज वेळेवर द्यावी, शेतकऱ्यांच्या मालाला शेती उत्पादन आधारावर किंमत द्यावी असा कोणताही कायदा नाही. पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाच्या विमा उतरता येत नाही. याउलट अमेरिका, जपान, इस्राईलमध्ये या देशांमध्ये कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला मदत करणे हे तेथील शासन आपली वैज्ञानिक जबाबदारी मानते. याच धर्तीवर भारतामध्ये काही कायदे करण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेती धोरणाबाबत मी समाधानी नाही असे सांगून बुधाजीराव मुळीक पुढे म्हणाले, कोणत्याही सरकारच्या शेतीच्या धोरणाबाबत सुद्धा मी समाधानी नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामध्ये शेती वाहून जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यासंदर्भात मी दि. २६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरामुळे झालेल्या शेतीला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
शेतीवरचा जीएसटी कमी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे २००६ पासून आजपर्यंत राज्यात १ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी आपल्या मृत्यूला कवटाळले आहे. शेतीवरचा जीएसटी शून्य करावा, हा कायदा लागू करावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन दि. १७ रोजी सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते देणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यावेळी म्हणाले, ऑगस्ट महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खास पथक पाठवले होते. पथकाने सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून मुख्यमंत्री त्या अहवालाबाबत सकारात्मक आहेत. पुराचे पाणी दुष्काळी भागाला कसे वळविण्यात येईल यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |