सातारा (अजित जगताप): संपूर्ण जगभर कोरोना व्हायरस मुळे अघोषित असे कोरोनाशी युद्ध सुरु झाले आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी स्वत:वर नियंत्रण राखून लोकांची काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी सातारा जिल्ह्यातील जनतेने संयम पाळून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे नम्र आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. सहकारमंत्री असल्यामुळे राज्यातून लोक भेटायला येतात. निदान 31 मार्चपर्यंत लोकांनी लेखी सूचना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकार सध्या देशातील कोरोना व्हायरस थोपविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. महाराष्ट्रात नागरी भागात 144 कलम लागू करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळून इतर गोष्टी 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. ही उपाययोजना असून जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही. आपापल्या घरी थांबून शक्यतो कोरोना व्हायरसशी संपर्क येवू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सुदैवाने सातारा जिल्ह्यातील अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणा दिवसरात्र जनतेच्या सेवेसाठी आपल्या परिवारापासून दूर आहेत. त्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्गक्रमण करणे ही जनतेची जबाबदारी आहे. काल सायंकाळी पाच वाजता घंटानाद केल्यानंतर काही सुशिक्षित वर्ग घोळक्याने रस्त्यावर उतरुन आनंदोत्सव साजरा करीत होता. यामुळे लोकांचा संपर्क आला असून असे पुन्हा घडू नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अनेक लोक नियमितपणे भेटत असतात. त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातात. सध्या कराड याठिकाणी घर व कार्यालय येथे लोक भेटण्यासाठी येतात. आवश्यक बाबी तसेच अत्यावश्यक सेवा देणे हे सरकारचे काम आहे. परंतू काहीजण हे सुरक्षित अंतर न ठेवता किंबहुना मास्क अथवा सेनेटायझर चा वापर न करता कार्यालयात येतात. त्यामुळे याठिकाणी आलेल्या लोकांना ही बाब खटकू लागली आहे. सर्वांनीच सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, अशा आरोग्याबाबतच्या सूचना आहेत.
सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा सक्षमरित्या आपली जबाबदारी पार पाडत असून सातारकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. लोकांनी संयम राखून आपल्या घरातूनच कोरोना व्हायरसविरुद्ध लढाई लढली पाहिजे. बाहेर फिरण्याचा मोह टाळणे हेच मोठे शस्त्र आहे. त्याचा आता वापर झाला पाहिजे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. ज्यांना आपली कामे व्हावीत असे वाटत आहे, त्यांनी लेखी स्वरुपात आपले निवेदन, सूचना, प्रस्ताव सादर करावा. व्यक्तिश: त्याची पडताळणी केली जाणार आहे. सध्या प्रत्येकाच्या भावना तीव्र असल्या तरी सार्वजनिक ठिकाणी जाणे आपल्या व इतरांच्या आरोग्यास योग्य नसल्याने आता लोकप्रतिनिधींनीही सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळले आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार लोकांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |