नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील आणि हरियानातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज झाली. महाराष्ट्रात २८८ जागांवर ही निवडणूक होणार आहे. हरियानात ९० जागांसाठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात २०१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. पण यावेळी उशिराने आचारसंहिता लागू होत आहे. राज्य विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र होणार आहे. हरियाणामध्ये २ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात यायला हवे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वीच मतदान घ्यावे लागणार आहे. निवडणूक कायद्यानुसार निवडणूक प्रक्रिया ही किमान ३० दिवसांची असणे बंधनकारक आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा असेल :
२७ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
४ ऑक्टोबर - उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर - उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर - अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर - मतदान
२४ ऑक्टोबर - मतमोजणी
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |