04:48pm | Oct 17, 2019 |
सातारा : येरवडा येथील ३२६ एकर जमीन संगनमताने बिल्डरच्या घशात घालून राज्य शासनाची फसवणूक केल्याचा आरोप पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बराटे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली. बराटे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे केले. या सर्व प्रकारात पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. येरवड्यातील १० हजार कोटींचा जमीन घोटाळा उघडकीस आणला आहे. यानिमित्ताने म्हणजे पवार कुटुंबीयांचे शाहीद बलवाशी व मुकंद भवन ट्रस्टचे गुरू प्रसाद चोरडिया व्यावसायिक संबंध असल्याचा बराटे यांनी केला आहे.
१९८९ मध्ये पुण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी मुकुंद भवन ट्रस्ट बरोबर न्यायालयात तडजोड केली. ही तडजोड बेकायदेशीर होती, असाहीआरोप आहे. मंत्रिमंडळाची मान्यता न घेता २००३ मध्ये त्याच जागेवरचे क्रीडांगण आणि रुग्णालयाचे आरक्षण बदलण्यात आले. त्यानंतरच पंचशील टेकपार्क आणि शाहीद बलवाच्या पंचतारांकित हॉटेलसाठी जागा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला, असेही बराटे म्हणाले.येरवड्यातील याच जमिनीवरच्या ९ एकरच्या भूखंडावर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचं पंचशील टेकपार्क उभारलं जातंय. तसेच ८ एकरच्या भूखंडावर शाहीद बलवा यांची डीबी रिअलिटी कंपनी ग्रँड हयात नावाचं फाईव्ह स्टार हॉटेल उभारतेय. पंचशील टेकपार्क आणि ग्रँड हयात हॉटेलसाठी वेगवेगळ्या विभागाची परवानगी घेताना शाहीद बलवांच्या कंपनीने पत्रव्यहार केल्याचे स्पष्ट झालं आहे. पंचशील टेकपार्कच्या कंपनी डीड अर्थात करारनाम्यात बिल्डर अतुल चोरडिया यांच्या बरोबरीने सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचे प्रत्येकी ९०९ शेअर्स असल्याचं स्पष्ट झालं. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीबराटे यांनी केली. ३.३६ ऐवजी ३२६ एकर !पुण्याचं नाव सध्या भूखंडाच्या घोटाळ्यांनी गाजतंय. आजवरचा पुण्यातील सर्वात मोठा घोटाळा येरवड्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. येरवड्यातील बहुतेक जमीन ही वतनाची आहे. त्यातली काही जमीन ही १८८४ च्या आधीपासून संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. याच जमिनीतली ३.२६ एकर जमीन सरकारने मुकुंद भवन ट्रस्टला रॉयल्टी म्हणून दिली. १९८९ साली या ना त्या कारणाने या जमिनीचा वाद निर्माण झाला. आणि हे प्रकरण पुणे जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात गेलं. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी तडजोड पत्र करून ३.२६ ऐवजी ३२६ एकर जमीन मुकुंद भवन ट्रस्टच्या नावे केली. ही तडजोड बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केला. २००३ मध्ये विलासराव देशमुख सरकारने मंत्रिमंडळाची परवानगी न घेता ३२६ एकरातल्या काही भूखंडाचे आरक्षण बदललं. रूग्णालय आणि क्रीडांगणासाठी आरक्षित असलेली जमीन रहिवासी विभागासाठी खुली करण्यात आली. त्यामुळे ९ एकर जमिनीवर पंचशील टेकपार्कचे आयटी सेंटर आणि डीबी रिऍल्टीच्या ग्रँड हयात या फाईव्ह स्टार हॉटेलच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. या दोन्हीही प्रोजेक्टसाठी शाहीद बलवा यांच्या सहीनिशी डीबी रिऍल्टीनं पर्यावरण खातं आणि पर्यटन खात्याची परवानगी घेतली. विशेष म्हणजे पंचशील टेकपार्कमध्ये बिल्डर अतुल चोरडिया यांच्याबरोबर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांची भागीदारी असल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.पण पवार कुटुंबीयांवर जाणूनबुजून आरोप केले जाताहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.संरक्षण खात्याची जमीन परस्पर पद्धतशीरपणे लाटली जाते.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |