01:35am | Dec 11, 2019 |
पाटण : पालच्या खंडोबा देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून लाखो भाविक येतात. त्यांच्या सोयी.सुविधांसाठी सर्व विभाग, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन काम करावे लागणार आहे. कामात कुचराई करणार्या अधिकार्यांना नोटीस काढून खुलासा मागवला जाईल. पुढील आढावा बैठकीपर्यंत सर्व विभागांनी आपापली कामे पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केल्या.
पाल (ता.कराड) येथील खंडोबा. म्हाळसाकांत यात्रेचा आठ जानेवारी 2020 हा मुख्य दिवस असून, त्या पार्श्वभूमीवर आयोजित पहिल्या नियोजन आढावा बैठकीत श्री. दिघे बोलत होते. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, देवस्थान ट्रस्टचे प्रमुख मानकरी तथा कराड पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, परिवहन अधिकारी अरविंद देसाई, सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्यासह जगन्नाथ पालकर, ट्रस्ट संचालक संजय काळभोर, रघुनाथ खंडाईत, मानकरी व नागरिक उपस्थित होते. श्री. दिघे म्हणाले, ‘‘सध्या डेंगीचा मोठया प्रमाणावर फैलाव होत असून, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने नदीपात्रात औषध फवारणी करावी‘‘. त्यांनी प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा जाणून घेतला. ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत, त्या करुन जिल्हाधिकार्यांना यात्रेचा आराखडा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
सूजर गुरव म्हणाले, ‘‘यात्रा कालावधीत दोन पोलिस उपअधीक्षक, 35 पोलिस अधिकारी, 400 पोलिस कर्मचारी, 200 होमगार्ड यांसह स्वयंसेवक असा मिळून 700 लोकांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.’’
यावेळी महावितरण, अन्न व औषध, बांधकाम, आरोग्य, पशुवैद्यकीय विभाग यांच्या उपस्थितीत अधिकार्यांनी करावयाची कामे, ग्रामस्थ, मानकरी यांनी सुचवलेल्या प्रत्येक कामाचे पालन करुन कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही उपस्थित विभागाच्या अधिकार्यांनी प्रांताधिकारी दिघे यांना दिली. यावर जो कोणी विभाग यात्रा कालावधीत आपले काम पूर्ण करणार नाही, तसेच कामात कुचराई करले, त्या अधिकार्यांना नोटीस काढून त्याचा खुलासा मागवण्याचा सज्जड दमही भरला. परिवहन अधिकारी अरविंद देसाई म्हणाले, ‘‘यात्रा कालावधीत परिवहन विभागाची दोन पथके तैनात करण्यात येणार आहेत.’’
देवराज पाटील म्हणाले, ‘नदीपात्रात असणार्या रथमार्गावरील पुलाचे काम निधीअभावी अद्याप झालेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीस दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन रथमार्गावर तात्पुरता पूल उभारावा लागत आहे. यासाठी कायमस्वरुपी पूल व्हावा. सुसज्ज बस स्थानक व्हावे ही मागणी गेल्या 15 वर्षांपासून करत असून, प्रशासन लक्ष देत नाही,’ संदीप चव्हाण यांनी आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |