सातारा : साताकरांच्या मानगुटीवर बसलेला टोलचा विळखा गेली दोन दशके सातारकरांच्या मानगुटीवरुन उतरण्याचे नाव घेत नाही. सातारा- पुणे या महामार्गावर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था असताना पुढार्यांपेक्षा सामान्य जनतेने पुढे येत टोलविरोधात एल्गार पुकारलेला होता. परंतू सातारा येथील आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्याबाबत सातार्यातील जनतेच्या जिवावर निवडून येणार्या पुढार्यांनी शेपटी घातल्यामुळे ऍड. द्रविड यांनी सुमारे महिनाभरानंतर आ. शिवेंद्रराजेंसह माजी खासदार उदयनराजेंना वेक अप कॉल देऊन थेट सुरुची बंगल्यावरच लेटर बॉम्ब टाकल्यामुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे.
सातारा नव्हेतर संपूर्ण दक्षिण भारताला देशाशी जोडणारा दुवा म्हणून पुणे-बंगलोर महामार्ग ओळखला जातो. परंतू गेल्या दीड दशकामध्ये सातारा ते पुणे या महामार्गाने आपल्या निकृष्ठतेची सीमा ओलांडून देशातील सर्वात घाणेरडा महामार्ग म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. पूर्वी हा महामार्ग दुहेरी असताना सातार्यातील नागरिक 110 कि.मी. चे अंतर दोन तासांत पार करायचा. परंतू आता हाच महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून सातारा ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी कित्येक तास खर्ची घालावे लागतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यातच रिलायन्स व महामार्ग प्राधिकरणाच्या साटेलोट्यामुळे हा महामार्ग डेथ रोड झाला आहे. सातार्यातील प्रथितयश कायदेतज्ञ राजगोपाल द्रविड तसेच टोलविरोधी सातारी जनता या सोशल मीडियावर कार्यरत असणार्या युवकांनी सातारा-पुणे या महामार्गावर झालेल्या दुर्दशेविरोधात आवाज उठवला होता. या चळवळीला सातारा जिल्ह्यातील जनतेने पाठिंबा दर्शविला होता. परंतू या चळवळीमध्ये सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह माजी खासदार उदयनराजेंनीही उडी घेतल्यामुळे हा विषय प्रतिष्ठेचा बनला होता. 30 नोव्हेंबरचा अल्टिमेटम देऊनही रिलायन्ससह महामार्ग प्राधिकरणाने आ. शिवेंद्रराजेंसह उदयनराजेंनाही ठेंगा दाखवल्यामुळे टोल विरोधी सातारकर जनतेचा फियास्को झाला.
रिलायन्ससह महामार्ग प्राधिकरणानेही सातारच्या राजांचा मुलाहिजा न बाळगता या दोन्ही राजांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे सातार्यातील ज्येष्ठ विधीज्ञ राजगोपाल द्रविड यांनी सातार्याचे आमदार शिवेंद्रराजेंवर लेटर बॉम्ब टाकत सातारा-पुणे महामार्गावरील दुरवस्थेबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत आव्हान करण्यात आले आहे. या पत्रामध्ये 2 नोव्हेंबर 2019 रोजी नॅशनल हायवे ऍथोरिटी ऑफ इंडियाला प्रेषित केलेली नोटीस माहिती आणि योग्य कारवाईकरिता आपणाकडे पाठविली होती, मात्र संबंधित पत्र पोहोचूनही त्यावर आपली कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. आपण मिडिया आणि जनतेला विश्वासात घेऊन असे सांगितले होते की, नोव्हेंबर अखेर जर महामार्गावरील दुरावस्था संबंधित अधिकार्यांनी दूर केली नाही, तर जनआंदोलनाच्या सहाय्याने टोल बंद केला जाईल. मात्र, डिसेंबर मधील दोन आठवडे उलटूनही आपण त्यावर कोणतीच भूमिका घेतलेली नाही. सातार्यातील अग्रगण्य दैनिकांनी देखील आपणाला या विषयी विचारले असता, आपण या बाबत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.
आपणासारख्या लोकप्रिय आणि समाजहित जपणार्या व्यक्तिमत्त्वाकडून सामान्य जनतेची वेगळी अपेक्षा असून आपली याबाबत नक्की कोणती भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुतचे पत्र आपणाला प्रेषित केले आहे. आम्ही सबंधित कंपनीवर जनहितार्थ मा. ना. उच्च न्यायालय सो., मुंबई येथे जनहित याचिका दाखल करणार असून याबाबत आपले सहकार्य आम्हास अपेक्षित आहे. आपल्या भुमिकेबद्दल कोणताही संभ्रम कोणाच्याही मनामध्ये येऊ नये या शुद्ध हेतूनेच आपल्याला प्रस्तुतचे पत्र प्रेषण केले आहे, असा लेटर बॉम्ब टाकून आ. शिवेंद्रराजेंना आपली टोलबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केलेली आहे. एकूणच सातारकर सोशिक झालेले आहेत. त्याचबरोबर सातार्यातील पुढारीही जिल्हा प्रशासन तसेच टोल व्यवस्थापनासमोर नांगी टाकत असल्याचे चित्र यानिमित्ताने उघड झाले आहे. कोल्हापुरातील लोक टोल बंद करु शकतात. मात्र सातारच्या जनतेसह पुढारीही हातघाईच्या लढाईत ऐन क्षणाला कुचकामी भूमिका घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ऍड. द्रविड यांनी धाडस करुन सातारच्या पुढार्यांच्या तोफेला बत्ती देऊन त्यांना चेतवण्याचे काम केले आहे. परंतू या बत्तीमुळे कोण-कोण टोलनाक्याबाबत आपली विस्फोटक भूमिका घेणार, हे मात्र येणार्या काही दिवसांमध्ये दिसणार आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |