02:26am | Nov 27, 2019 |
कराड : उत्तम प्रशासक आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधी या दोन्ही भूमिकेत खासदार श्रीनिवास पाटील यशवंत विचारांचे सच्चे पाईक ठरले आहेत. श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी खा. पाटील यांची निवड त्यांच्या कार्यामुळे सार्थ आहे, असे प्रतिपादन डॉ. इंद्रजीत देशमुख यांनी केले.
येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थाच्यावतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांना इंद्रजीत देशमुख, डॉ. रवींद्र बेडकिहाळ, मुनीर बागवान-सावकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. जयवंत सातपुते, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अशोक चव्हाण, अरुण जाधव, बाळासाहेब मोहिरे, संतोष मोहिरे, व्यवस्थापक विवेक वेळापुरे व्यासपीठावर उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब ही एक व्यक्ती नव्हे तर समृद्ध विचारांचा वारसा होता. हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले होते. त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा प्रशासकीय अधिकारी अपेक्षित होता. तर लोकप्रतिनिधी जनतेला आपल्यातीलच व्यक्ती आहे, ही भावना निर्माण करणारा अभिप्रेत होता. या सर्व निकषांमध्ये नव्हे तर यशवंत विचारांना बांधील राहून श्रीनिवास पाटील यांनी सनदी अधिकारी म्हणून आपली कारकीर्द अधोरेखित केली. प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश करताना त्यांनी लोकांशी बांधीलकी जोपासत सतत बेरजेचे राजकारण करून यशवंत विचारांचा वारसा अंगीकारला. श्री कालिकादेवी पतसंस्थेने श्रीनिवास पाटील यांना चव्हाणसाहेबांच्या नावाच्या पुरस्कारासाठी निवड करून या पुरस्काराचा उद्देश सार्थ ठरविला आहे.
सत्काराला उत्तर देताना खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळण्याची संधी मला माझ्या बालपणी मिळाली होती. त्यांच्याकडून प्रशासन राजकारण आणि समाजकारण यांचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत विविध क्षेत्रात कार्यरत असताना समाधानाची वेगळीच अनुभूती ही आयुष्याची शिदोरी म्हणून मिळाली. आज त्यांच्या नावाचा पुरस्कार तोही त्यांच्या व माझ्या कर्मभूमीत स्वीकारताना अत्यानंद होत आहे. खरंतर कालिकादेवी नागरी पतसंस्थेने माझी या पुरस्कारासाठी निवड केली हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेले एक लाख रुपये मी समाजातील दुर्बल वंचित घटकांच्या उन्नतीसाठी देत आहे. हा धनादेश मी माझे सुपुत्र सारंगबाबा पाटील यांच्याकडे देत असून आपल्या माध्यमातून या रकमेला दुर्बल व वंचित घटकांच्या उपयोगात आणण्यासाठी योग्य मार्ग सुचवावा.
यावेळी पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त रवींद्र बेडकिहाळ यांनीही यशवंत कार्याचा गौरव केला. प्रा.अशोक चव्हाण यांनी अतिथींचा परिचय करून दिला. मानपत्राचे लेखक ऍड संभाजीराव मोहिते यांनी मानपत्राचे वाचन केले.
यावेळी शिरोळ तालुक्यातील कुरुंडवाड परिसरात महापुरामध्ये आलेल्या आपत्तीमध्ये यांत्रिक बोटी व नावेच्या सहाय्याने जीवाची बाजी लावून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविणार्या रौङ्ग पटेल, सदाशिव आंबी, अरुण गावडे, राजू बैेले, बाबासाहेब कोळी, निसार पटेल यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याच समारंभात ऍड.संभाजीराव मोहिते व स्वरगंधारचे गिजरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.डॉ संतोष मोहिरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन राजन वेळापुरे, श्याम वेळापुरे, शरदचंद्र देसाई, डॉ. संतोष मोहिरे, अनिल सोनवणे, सुरेश भंडारी, श्रीमती जयाराणी जाधव, सौ. सीमा विभुते, औंदुबर कासार, मारुती सावंत, किरण लखापती, शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, मुकुंदराव कुलकर्णी, सारंग पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, शिरीष गोडबोले, प्रा. सुभाष शेळके, राजेंद्र साठे, माजी नायब तहसीलदार गायकवाड, सुभाष डोळ, जितेंद्र डुबल, नगरसेवक सौरभ पाटील, पोपटराव साळुंखे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |