पुणे : ॲट्रोसिटी कायद्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आणि केंद्र सरकारची भूमिका यांचा काडीचाही संबंध नाही. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे गैरसमज पसरवून दलित समाजाच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशातील शांततेला व सामाजिक समतेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप खासदार अमर साबळे यांनी केला आहे.
देशभरातील दलित संघटनांनी अट्रोसिटीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. याबाबत खासदार अमर साबळे यांनी खेद व्यक्त केला. यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
अमर साबळे म्हणाले, राहुल गांधी यांनी ट्विट करून दलितांच्या शांततेत चालणा-या आंदोलनात ठिणगी टाकण्याच्या प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या डीएनडीबद्दल त्यांनी भाष्य केले. परंतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबविलेले सामाजिक सेवा प्रकल्प, दलित उद्धाराचे उपक्रम आणि समरसतेचे प्रयोग हे जाऊन एकदा पाहावे. या प्रयत्नामुळे दलित समाजातील विद्यार्थी घडत आहेत, परिस्थिती सुधारते आहे, हे पाहिल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डीएनए राहुल गांधी यांना दिसून येईल.
पराभवाचे वैफल्य राहुल गांधींच्या जिव्हारी
ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे सध्या ट्विटरपुरतेच शिल्लक उरले आहेत. देशातील अनुसूचित जाती जमातीच्या खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी यामध्ये सर्वाधिक संख्या भाजपामध्ये आहे. त्यामुळे दलित वर्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला स्वीकारलेले आहे. हा दलित वर्ग जो पारंपरिक काँग्रेस कडे होता तो आता तुटला आहे. आणि पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर दलित समाज आपल्यासोबत असल्याशिवाय पर्याय नाही. या अपरिहार्यतेतून राहुल गांधी दलित समाजाच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप खासदार साबळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.
दलितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध
साबळे म्हणाले, महाराष्ट्रातील महाजन नावाच्या व्यक्तीने अट्रोसिटीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र दलितांच्या आरक्षण, सुरक्षा, हित, कल्याणासाठी कटिबद्ध असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने त्यासंदर्भात री-पिटीशन दाखल करणार आहे. केंद्राने या निर्णयासंदर्भात असहमती दर्शवली आहे. या विषयासंदर्भात आम्ही १८ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दलितांच्या सर्व मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी दलितांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याचे खासदार साबळे यांनी सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |