02:35pm | Oct 05, 2018 |
सातारा : शिक्षणाला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाहून घेणाऱ्या "रयत'चे विद्यापीठ झाले पाहिजे. त्यासाठी सर्व सहकार्य करणार असे मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहिर केले.
शोधातूनच देश समृद्ध होतात. गरीबी हटते. नवा विचार केल्याशिवाय शोध लागत नाहीत. म्हणूनच अटल रिकरींगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेला वाव द्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज कर्मवीर समाधी परिसरात आज झाला. त्यावेळी मंत्री जावडकेर बोलत होते. यावेळी माजी केंद्रिय कृषी मंत्री खा. शरद पवार, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार विश्वजित कदम, टाटा टेक्नॉलॉजीचे दिलीप बंड, डॉ. राजेंद्र जगदाळे, डॉ. आनंद भदे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपकार्याध्यक्ष डॉ. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, इतर पदाधिकारी, आजी माजी रयत सेवक उपस्थित होते.
जावडेकर यांनी कर्मवीरांचे कार्य, सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी केलेला त्याग आणि संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. संस्थेने 99 वर्षात शिक्षणाचा प्रसार करून गुणवत्तीही मिळविली आहे. रयत विद्यापीठी झालेच पाहीजे. त्यासाठी सर्व सहकार्य करणार असे सांगून ते म्हणाले, ""ब्रिटीशांना शिक्षण मर्यादीतच ठेवायचे होते. स्वातंत्र्य चळवळीत सामाजिक कार्यकर्तेही होते. फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, नामदार गोखले, टिळक आगरकर यांनी शिक्षणाची चळवळ सुरु केली. कर्मवीरांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. चांगले विद्यार्थी आणि चांगले शिक्षक तयार केले. आता संस्थेने गुणवत्तेला महत्व दिले आहे. त्यामुळेच सायन्स टेक्नॉलॉजी सेंटर सुरु होत आहे. हे अतिशय महत्वाचे आहे.शिक्षणातील परिवर्तन हेच देशाचे परिवर्तन आहे.'' प्रगती केली तरच गरीबी हटते. समृद्धी निर्माण करून ती गरीबांत वाटायची असते. म्हणूनच नवनवे शोध घेतले पाहिजे. शोधांचे आपण मालक असले पाहिजे. त्यामुळेच केंद्राने अटल रिकरींग लॅब शाळांतून सुरु केल्या आहेत. त्यातून उद्याचे संशोधक तयार होणार आहेत. आता पुढे जाऊन आयआयटी मुंबई येथे सहा रिसर्च पार्क सुरु करणार आहे. शिक्षकही ज्ञानाने समृद्ध असला पाहिजे. तज्ज्ञ असला पाहीजे. त्यासाठी आता बीएड पदवी चार वर्षाची करणार आहे. शिक्षक व्हायचे आहे, त्यानेच बीएडला गेले पाहिजे, असे सांगून श्री. जावडेकर यांनी नव्या तंत्रज्ञानाने शिक्षणाची गरज सांगताना आता ऑपरेशन ब्लॅकबोर्ड नाही तर "ऑपरेशन डिजीटल बोर्ड सर्व शाळांत राबविणार आहे. नवा विचार केला तरच नवे शोध लागतात. शोधातूनच देश समृद्ध होणर आहे. त्यासाठी मन तरूण असावे लागते, असेही श्री. जावडेकर यांनी नमुद केले.
खा. पवार म्हणाले, सस्थेने शिक्षणाचा प्रसार केला. गुणवत्ता मिळविली. त्याही पुढे जाऊन आता नव्या पीढीत संशोधक वृत्ती वाढवायची आहे. नव निर्मितीत युवक कसे सहभागी होतील हे पहायचे आहे. टाटा टेक्नॉलॉजी येथी आणली त्याचा उपयोग नव्या पिढीला होणार आहे. शताब्दी कार्यक्रमात याचा प्ररंभ होत आहे हे महत्वाचे आहे.'' डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेचा इतिहास आणि प्रगतीची माहिती दिली. प्राचार्य डॉ. कराळे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव विजय सावंत यांनी आभार मानले.
यावेळी विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांचे चित्र असलेल्या पोष्टाचे पाकीट व तिकीटाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |