02:38pm | Dec 28, 2019 |
कराड : जे जे बौध्द झाले आहेत, त्यांची जनगणेमध्ये नोंद होणे गरजेचे असून यावरुनच भारतातील बौध्दांची संख्या स्पष्ट होवून बौध्दांच्या सोयी सुविधा प्राप्त करुन घेण्यास सोपे होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात बदल करण्याचे सुरु असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी प्रत्येकांनी जागृत रहावे, असे आवाहन भारतीय बौध्द महासभाचे कार्याध्यक्ष अॅड.भीमराव आंबेडकर यांनी केले.
कराड येथे भारतीय बौध्द महासभेच्या सातारा जिल्हा व कराड तालुका यांच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण येथे आयोजित 20 व्या बौध्द धम्म परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे होते. यावेळी मुंबई चैत्य भूमीचे पूज्य भन्ते सुमेध बोधी, भारतीय बौध्द महासभाचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई, सचिव एन.एम.आगाणे, भिकाजी कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष डी.एम.कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष साहेबराव लोखंडे, सुदाम ढापरे, दिलीपराव थोरवडे, चंद्रकांत खडाईत, व्ही.एस.गायकवाड, डॉ.मीनाताई इंजे, प्राचार्य सुरेश खराते, अरुण गायकवाड, उत्तम मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड.भीमराव आबेडकर म्हणाले, 1956 पुर्वी भारत देशात बौध्दांची संख्या दीड ते दोन लाख होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा दिल्यानंतर पाच लाख संख्या बौध्दांची झाली आणि आज जवळ 25 लाखांहून जास्त आहेत. खर्या अर्थाने या देशात बौध्दांची संख्या 25 लाखांहून जास्त असली तरीही जनगणेवेळी त्यांची नोंद बौध्द असे न लिहिल्याने होत नसल्याने बौध्दांची प्रत्यक्ष संख्या स्पष्ट होत नाही, याची बौध्द बांधवांनी नोंद घेवून जनगणेवेळी आपली नोंद बौध्द अशी करुन घ्यावी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधनामध्ये बदल करण्याचे धोरण सत्ताधार्यांकडून चालू असून ते हाणून पाडण्यासाठी प्रत्येकांनी संविधानाबाबत जागृत असणे आवश्यक आहे. बौध्दांच्या पवित्र स्थळांवर इतर धर्मियांनी त्यांच्या प्रतिमा मांडून अतिक्रमण केल्याने मुळ बौध्द संस्कृतीचा विपर्यास करुन ती संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणून पुरातन विभागातून माहिती घेवून ती पवित्र स्थळे बौध्दांचीच आहेत, ही कायम करण्यासाठी बौध्दांनी पुढाकार घेवून सरकारला आपल्या मागणीसाठी भाग पाडले पाहिजे. त्यासाठी भारतीय बौध्द महासभेमार्फत पत्र व्यवहार झालेला आहे. प्रत्येक बौध्दांकडे बौध्द असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
व्ही.आर.थोरवडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपणा सर्वांना धम्म प्रचार व प्रसाराचे काम करायचे आहे. धम्माचे काम वाढविण्यासाठी विविध श्रामणेर शिबीरे व बालसंस्कार शिबीरात सहभाग वाढणे गरजेचे आहे. बौध्दांचे राजपत्र धम्मयान मासिकांचे वाचन करणेचे आवश्यक आहे.
संस्थेच्या वतीने दि.14 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत विविध शिबिरांचे आयोजन केले होते. त्या सर्व शिबिरांचा समारोप या परिषदेमध्ये करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांना मानवंदना देण्यात आली. परिषदेच्या प्रारंभी केंद्रीय शिक्षीका नंदाताई तुकाराम आढाव (मुंबई) यांचे वडुज याठिकाणी ज्ञानदान करताना निधन झाल्याने त्यांना श्रध्दाजली वाहण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल तानाजी बनसोडे, भिमराव गायकवाड, यशवंत अडसुळे, यशवंत कुंटे यांचा सन्मान करण्यात आला. अविनाश बारशिंग यांनी प्रास्ताविक केले. विद्याधर गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. भीमराव गायकवाड यांनी आभार मानले. ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी सर्व केंद्रीय शिक्षक व बौध्दाचार्य, श्रामणेर व सैनिकांनी परिश्रम घेतले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |