12:29am | Sep 26, 2019 |
मुंबई : कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान हे महत्वाचे असते. यावरूनच विकासाचे मोजमाप ठरत असते. त्यामुळे आमचे राज्य सरकार गेली 50 वर्षे या देशामध्ये यशस्वीपणे वाटचाल करणार्या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथील माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात दिली.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडींचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 86व्या जयंती निमित्त आणि माथाडी युनियन,माथाडी कायदा व माथाडी पतपेढीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नवी,मुंबई येथील कांदा-बटाटा लिलावगृह येथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रमुख अतिथी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ना. एकनाथ शिंदे, रविंद्र चव्हाण, नवीमुंबई महापौर जयवंत सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले कि, माथाडी कामगार चळवळीचे हे व्यासपीठ असेच यापुढेही चालू राहिले पाहिजे, आम्ही या चळवळीमध्ये कधीही फुट पडणार नाही, उलट यापुढे या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी उभे राहून माथाडींचे सर्व प्रश्न सोडविले जातील, त्यांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेतून ते शक्य होणार असल्याची त्यांनी सांगितले. प्रारंभी माथाडी नेते आणि युनियनचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात संपूर्ण कामगार चळवळीच्या कामाचा आढावा घेतला. ते आपल्या भाषणात म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माथाडीसाठी फार मोठे योगदान दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अण्णासाहेब या दोनच नेत्यांनी त्या काळात मराठी माणसाच्या एकजुटीसाठी अथक प्रयत्न केले आहेत. बाळासाहेबांच्या प्रयत्नातूनच आजचे अण्णासाहेबांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ उभे आहे. खरे तर माथाडींचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारची मदत घ्यावी लागते. ज्या वेळी सरकारे बदलली त्या त्यावेळी सरकारची प्रमुख मंडळी माथाडी कामगारांच्या कार्यक्रमाला हजर रहायची, आज त्याच नेमाने राज्यातील युतीच्या सरकारची प्रमुख मंडळी व्यासपीठावर दिसत आहेत. 2016 नंतर खर्या अर्थाने महाराष्ट्र आणि माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक होऊ लागली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माथाडींवर केलेले प्रेम हि चळवळ कदापि विसरणार नाही, आजचा मेळावा कामगार चळवळीचा निव्वळ ट्रेलर आहे यापुढचे चित्रही असेच भव्य स्वरूपाचे असेल असे पाटील म्हणाले. नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरकुलासाठी वाढीव एफ.एस.आय द्यावा व तोलाई कामगारांना बाजार समितीमध्ये समाविष्ट करून घ्यावे या व इतर मागण्या केल्या. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये आम्ही कधीही माथाडी कामगार चळवळीच्या बळकटीला नख लावण्याचे काम करणार नाही. आमची पुर्ण ताकद या चळवळीच्या पाठीशी लागेल. शिवसेना कधीही या चळवळीच्या तंगड्यात तंगडे घालण्याचे काम करणार नाही हि महाराष्ट्राची माती देशाला दिशा देण्याचे काम करते. माथाडी हा ताठ मानेने जगला पाहिजे यासाठी आम्ही कामगारांच्या पाठीशी उभे राहू असे ठाकरे म्हणाले.
माथाडी कामगार नेते व युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आपल्या भाषणामध्ये माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर आणि भवितव्यावर सडेतोड विचार मांडले. शिंदे म्हणाले अण्णासाहेबांची हि चळवळ मोठ्या संघर्षातून उभी राहिली आहे. त्यासाठी अनेक आंदोलने, लढे द्यावे लागले. या चळवळीला कोणाचीही दृष्ट लागू नये हे आणि त्यात फुट पडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या छोटेखानी भाषणात माथाडी कामगारांसाठी किमान वेतन आणि हक्काचे घरकुल मिळण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील राहील कारण कोणत्याही कामगारांच्या अपेक्षा या साध्या असतात त्या सोडविण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून केले जाईल असे ते म्हणाले. आभार प्रदर्शन माथाडी नेते व युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले. या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे,संदीप नाईक, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, भाजप नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार विजय सावंत, रमेश शेंडगे, माथाडी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीधर नाईक, डॉ.हणमंतराव अण्णासाहेब पाटील, शिवसेना नेते विजय नाहटा, व्यापारी मोहन गुरुनानी, माथाडीचे सल्लागार सुरेशभाई कोपरकर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक व जि.प.सदस्य रमेश अण्णासाहेब पाटील, युनियनच्या कायदेशीर सल्लागार ड.भारतीताई पाटील,युनियचे अध्यक्ष एकनाथ जाधव व युनियनचे सर्व पदाधिकारी व माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्याच्या हस्ते 17 माथाडी कामगारांना माथाडी पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच माथाडी कायद्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या तेजोमय संघर्षाची सुर्वण वाटचाल या पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. कायर्क्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख व रचना बोराडे यांनी केले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |