सातारा : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात महापूर आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात १६ जणांचे बळी गेले असून आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या चारही जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान, टेरिटोरियल आर्मीची पथके आणि नौदल दाखल झालं आहे. गोव्याहूनही एनडीआरएफची चार पथके कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत. तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये आणखी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौदलाच्या दोन विमानातून एका बोटींसह २२ जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह कोल्हापुरात दाखल झाले. सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. काल जिल्ह्यातील २०४ गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. काल रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटींसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह कोल्हापुरात दाखल झाले. परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे त्यांनाही मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह ही पथकं रवाना झाली. तर कोल्हापुरात दोन बोटींच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात येत आहे. आज सकाळी नौदलाच्या दोन विमानांमधून एका बोटीसह २२ जणांचे पथकही कोल्हापुरात दाखल झाले. त्याशिवाय मुंबई-पुण्याहून नौदलाच्या १४ बोटीही कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. प्रयाग-चिखलीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू करण्यात आली आहे.
कोल्हापुरात एकूण २०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. काल या गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांमधील ५१ हजार ७८५ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येत आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे. तर पाण्याची पातळी कमी करण्यासाठी कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून चार लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, या धरणाच्या प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत आहे.’ अशी माहितीही पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात सहा गावांचा संपर्क तुटला
सातारा जिल्ह्यातही पूरस्थिती कायम असल्याने येथील सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पूरस्थितीमुळे साताऱ्यातील काही शाळा आजही बंद ठेवण्यात आल्या आहेत. साताऱ्यातही शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून या ठिकाणीही मदतकार्य मोठ्याप्रमाणावर सुरू आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |