05:56pm | Mar 26, 2020 |
सातारा : कोरोना (कोविड-19)च्या संसर्गामुळे सातारा जिल्हाच नव्हेतर संपूर्ण देशामध्ये अभूतपूर्व अशी संचारबंदी अनुभवयास मिळत आहे. नवीन पिढी प्रथमच अशी संचारबंदी पाहत आहे. मात्र, कधीकधी अक्कल नसलेले गाढवपणा करतात, त्यामुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा हातात घेवून लोकांना सरळ करावे लागत आहे. कालच पोलिसांना नडलेल्या एका जवानाला पोलिसांनी फोडून काढले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, वस्तुस्थिती माहित नसलेल्या नागरिकांनी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करुन त्यांच्या नावाने खडे फोडले. परंतू जवानांवर हात उचलण्याची परिस्थिती उद्भवू द्यायची नसेल तर सुट्टीवर आलेल्या जवानांना बरोबर घेवून पोलिसांनी आपली ताकद वाढवावी, अशी मागणी होवू लागली आहे.
काल दि. 25 रोजी पळसावडे, ता. माण येथे सुट्टीवर आलेल्या जवानाने आपल्या घरासमोरच दोस्त-यारांचा गोतावळा जमवून जमाव व संचारबंदी आदेशाची पायमल्ली केली होती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित जवानाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कॅन्टिनमधून मिळालेल्या ‘स्टॉक’मुळे संबंधित जवानाचे चित्त थार्यावर नव्हते. त्यामुळे त्या जवानाच्या अंगामधील सुट्टीमध्ये असतानाही लष्करातील जवान जागा झाला. त्यामुळे त्याने समजवायला आलेल्या पोलिसांनाच मी कोण आहे? 18 वर्षे देशसेवा नाहीतर गोट्या खेळल्या का? असे म्हणत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या अंगावरच धावून जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हातघाईवर आल्यानंतर पोलिसांनी त्या जवानाला फोडून काढले. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ सर्वांनीच बघितलेला आहे. या घटनेनंतर काल संध्याकाळी सातार्यातील तालुका पोलीस ठाण्यासमोरील राधिका रोडवर एटीएममध्ये पैसे काढण्यास निघालेल्या एका नागरिकाला पोलिसांनी हटकले असता त्या नागरिकाने पोलीसाच्या हातातील काठी हिसकावून घेत त्या पोलिसालाच चोपून काढले होते. हे दोन्ही परस्परविरोधी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा पोलिसांचे नक्की चालले तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला होता.
सातारा जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या हिशोबाने पोलीस दलाची ताकद निश्चितच कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जमाव व संचारबंदी हाताळत असताना पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलेला आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांसह अधिकारीही रस्त्यावर उतरल्यामुळे पोलीस ठाणी अक्षरश: ओस पडलेली आहेत. रात्रंदिवस कर्तव्य असल्यामुळे पोलिसांच्याच आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यातच इतरवेळी पोलिसांच्या हातात हात घालून कर्तव्य बजावणारे गृहरक्षक दल (होमगार्ड)चे स्वयंसेवकही पोलिसांच्या बरोबर नाहीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करता करता पोलीस अगदी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करीत सुमारे 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. या 21 दिवसांतील केवळ 2 दिवस सरले आहेत. अजून 19 दिवस बाकी आहेत. असे असताना पोलिसांच्या स्टॅमिनाचा टेम्पो असा किती काळ टिकणार आहे? त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी होमगार्डसह जिल्ह्यात सध्या सुट्टीवर आलेल्या जवानांचीही मदत घेतल्यास सातारा जिल्हा पोलीस दलाची ताकद वाढणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान, रेल्वे, बससेवा बंद करण्यात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या जवानांना आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. दळणवळणाची साधनेच उपलब्ध नसल्यामुळे कर्तव्यावर हजर होण्यासाठी नक्की जायचे कशाने? असा प्रश्न लष्करी तसेच निमलष्करी दलातील जवानांना पडला आहे. याबाबतची कैफियत या जवानांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आपल्या वरिष्ठ अधिकार्यांच्या कानी घातल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे येथील लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व निमलष्करी दलातील कमांडंट दर्जाच्या अधिकार्यांशी चर्चा झाल्यानंतर जिल्ह्यातील कर्तव्यावर निघालेल्या जवानांना 15 एप्रिलपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सातारा जिल्हा हा जवानांचा जिल्हा म्हणून देशभरात ओळखला जातो. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एकतरी मुलगा लष्करी सेवेत असतो. जेवढे कर्तव्यावर असतात, तेवढेच गावी सुट्टीवरही येत असतात. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये शेकडो लष्करी जवान गावाकडे सुट्टीसाठी आले होते. परंतू देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दळणवळणाच्या अनुपलब्धतेमुळे जवानांना नियुक्तीच्या ठिकाणी जाता आले नाही. परिणामी हे जवान संचार व जमावबंदीच्या अनुषंगाने घरातच बसून आहेत. रोज काही किलोमीटर फिरण्याची सवय असलेल्या या जवानांना घरात बसून राहणे मुश्किल वाटत आहे. त्यामुळे संचार व जमावबंदी असतानाही ते घराबाहेर पडत आहेत. काल पळसावडे, ता. माण येथे याच भानगडीतून लष्करी जवानाला मारहाण झाली होती. एका लष्करी जवानाला अशापद्धतीने मारहाण केली गेल्यामुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली गेली. वास्तविक त्या पाठिमागचे कारण वेगळे होते. परंतू येणार्या काही दिवसांमध्ये हे वाद नित्याचेच होणार आहेत. पोलीस विरुद्ध आर्मी हा सामना बघायचा नसेल तर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहत असलेल्या आजी-माजी जवानांची यादी काढून योग्य मानधनाच्या मोबदल्यात किंवा भत्त्यांवर पोलिसांच्या बरोबरीने जवानांनी आपल्या वर्दीसह कर्तव्यावर घ्यावे. जेणेकरुन सातारा पोलिसांचीही जमाव व संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करताना ताकद वाढणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र पोलिसांना अशाप्रकारच्या जमाव व संचारबंदीची सवय नाही. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना पोलिसांना आरोपांसह सामान्य नागरिकांच्या माराचाही फटका बसत आहे. जिल्ह्यातील जवानांनी देशातील विविध भागांमध्ये कर्तव्य बजावले आहे. पैकी 90 टक्के जवानांनी जम्मू-कश्मिर, उत्तर पूर्वेतील आसाम, नागालँड यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये कर्तव्य बजावून जमाव व संचारबंदी काय असते व त्याची अंमलबजावणी कशी करावी, हे अनुभवलेले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबर हे लष्करी जवान रस्त्यावर उतरल्यास लष्करी जवानांच्या अनुभवाचा फायदाही जिल्ह्यातील पोलिसांना निश्चितपणे मिळणार आहे. कोरोनाशी लढण्यासाठी एक महिना काय, पुढील काही महिने गेले तरी बेहत्तर. पण पोलिसांबरोबर लष्करी जवान असल्यानंतर टाईमपास करण्यासाठी रस्त्यावर उतरणार्या महाभागांना पोलिसांबरोबर जवानांचाही डंडा बसल्यानंतर निश्चितपणे जिल्हाही ठंडा होणार आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ज्यापद्धतीने जवानांच्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने प्रश्न निकाली काढला, त्याच पद्धतीने सुट्टीवर आलेल्या जवानांची मदत घेण्याबाबत लष्करातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करुन याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
- संग्राम निकाळजे
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |