04:15pm | Jun 28, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण या महत्त्वाच्या दोन शहरांना जोडणारा मुख्य रस्ता गेल्या काही वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या रस्त्यावर गेल्या काही वर्षात शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. मात्र, या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी असणारे सार्व. बांधकाम खाते मात्र खाबुगिरीमध्ये व्यस्त असल्यामुळे अनेकांना या रस्त्यावर नाहक जीव गमवावा लागत आहे.
सातारा-लोणंद रस्ता कोकणापासून व्हाया सातारा विदर्भ-मराठवाडा, हैद्राबाद, तेलंगाणा, तमिळनाडू या राज्यांना जोडला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गावरील टोल वाचविण्यासाठी मोठमोठी वाहनांची रहदारी या रस्त्यांवर वाढलेली आहे. पन्नास टन वजनाची शेकडो वाहने या रस्त्यावरुन ये-जा करीत असतात. या रस्त्याची तेवढा भार पेलण्याची क्षमताही नाही. तसेच नोकरदार, व्यवसायाच्या निमित्ताने सातार्यात येणारे जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्र याच रस्त्यावरुन मार्गक्रमण करीत असतात. या भूमिपुत्रांना परप्रांतीय वाहनांच्या अवास्तव गतीमुळे हकनाक जीव गमवावा लागत आहे. मुश्किलीने या रस्त्यावरुन दोन मोठी वाहने पास होतात. कित्येक किलोमीटरनंतर मोठ्या महत्प्रयासाने एखादे मोठे वाहन ओव्हरटेक केले जाते. रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे व साईडपट्ट्या खचल्यामुळे याठिकाणी वाहनांचे छोटे-मोठे अपघात दररोजचे ठरलेलेच आहेत. त्यात रेल्वेच्या देऊर येथील गेटमुळे मोठ्या अडचणी निर्माण होतात. कोल्हापूर-पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या फेर्या वाढल्यामुळे देऊर येथील रेल्वेगेट दिवसातून किमान पंधरावेळा वाहतुकीसाठी बंद केले जाते. त्यामुळे वाठार स्टेशन ते आंबवडे सं.वाघोली पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहनचालकांना या रेल्वेगेटचा नाहक त्रास सहन करावा लागतो. देऊर येथील रेल्वेगेटवर उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी अनेक वर्षापासूनची आग्रही मागणी आहे. असे असूनसुद्धा रेल्वेने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. त्यात सार्व. बांधकाम विभागाच्या निष्क्रीयतेमुळे हा महत्त्वाचा प्रश्न आजपावेतो मार्गी लागलेला नाही. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल दोन वर्षापूर्वी वाहून गेला होता.या अपघातात एक एसटी बसही वाहून गेली होती. त्या बसमधील अनेक प्रवासी या अपघातात ठार झाले होते. यानंतर राज्य शासन खडबडून जागे झाले होते. राज्यातील जुन्या ब्रिटीशकालीन पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश शासनाने यापूर्वी दिले होते. परंतू जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापपर्यंत याबाबत कोणताही ठोस अहवाल राज्य शासनाकडे दिलेला नाही. जिल्ह्यातील संगम माहुली, आरळे येथील पूलांची कालमर्यादा संपलेली आहे. हे पूल कोणत्याही क्षणी ढासळू शकतात. या दोन्ही पुलांना पर्यायी पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले नाहीत. सुमारे दोन वर्षापूर्वी आरळे येथील पुलाला भगदाड पडले होते. यामुळे सुमारे तीन महिने या पुलावरील वाहतूक कोरेगाव व शिरगाव घाटामार्गे साताराकडे वळविण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. यापासून कोणताही बोध न घेता सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र खाबुगिरीत व्यस्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांच्या पैशावर परदेशवारी करीत आहेत. मात्र, लोणंद-सातारा रस्त्यावर होत असलेल्या अपघाताची मालिका रोजच सुरु आहे. जिल्हा प्रशासनही याबाबत मूग गिळून गप्प बसले आहे. सातारा-लोणंद मार्गावर प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. कोकणातील मंडनगड ते तेलंगणातील सिकंदराबाद असा हा मार्ग आहे. परंतू याबाबत अजूनही भूसंपादनाचे काम सुरु झाले नाही. प्रत्यक्ष महामार्ग होण्यासाठी अजून काही वर्षे जाणार आहेत. सातारा-लोणंद रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे काही तक्रारी गेल्यास या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखवून सातारा बांधकाम विभागातील अधिकारी आपली जबाबदारी झटकताना दिसून येतात. गेल्या काही वर्षापासून लोणंद-सातारा मार्गावर शेकडो अपघात झालेले आहेत. या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग सुरु होण्यासाठी अजून काही वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंत या मार्गावरील अपघात कमी होणार आहेत काय? भविष्यात राष्ट्रीय महामार्ग सुरु होईलही. तोपर्यंत सातारा-लोणंद रस्ता अजून किती बळी घेणार, याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावे लागणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |