04:23am | Jun 06, 2019 |
फलटण : नीरा-देवघर धरण ज्या भोर, खंडाळा, फलटण, माळशीरस तालुक्याच्या दुष्काळी जनतेची तहान भागविण्यासाठी बांधले, त्या जनतेच्या हक्काचे पाणी बारामतीकरांनी जबरदस्तीने पळविले आहे, हे पळविलेले आमच्या हक्काचे पाणी आम्ही परत आणीत आहोत यात कसले राजकारण असा सवाल करीत, उगाच जनतेची दिशाभूल करुन राजकारण करु नका, आमच्या पाण्यावर आमचा हक्क आहे असा पलटवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खा.शरद पवार यांच्या वक्तव्यावर केला आहे.
नीरा-देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनानंतर दिला आहे. त्यामुळे नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटू लागले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांनी पाण्यावरुन कोणी राजकारण करु नये राजकारण कोठे करायचे याचे भान ठेवा अशा प्रतिक्रिया दिल्यावर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार करीत पाण्यासाठी कोणी राजकारण केले, कोणी पाणी पळविले, हे पाणी कोणासाठी होते याबद्दल बोला असे आवाहन करुन हे पाणी परत वळवून दुष्काळी तालुकयांची प्रथमत: तहान भागविणार आहोत निधी उपलब्ध होताच कालव्याची कामे सुरु केली जातील, जवळपास पूर्ण ११.५ टीएमसी पाणी मिळाल्यास कालवे बारमाही सुरु राहतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही पाण्यावरुन राजकारण करु नये असे म्हटल्याचे निदर्शनास आणून देताच त्यांचा बारामतीच्या पाण्याबाबत काही तरी गैरसमज झाला असेल बारामतीकरांनी पाणी कसे पळवून नेले आणि तीन दुष्काळी तालुक्यावर कसा अन्याय केला याची वस्तुस्थिती आणि पूर्ण कागदोपत्री माहिती पुराव्यानिशी आम्ही त्यांना देउ त्यानंतर ते आमच्या पाठीशी निश्चितच राहतील असा आशावाद खा. रणजितसिंह यांनी व्यक्त केला. फलटण तालुक्यातील रोजगार, रेल्वे, शेतीचे अन्य प्रश्न कोणत्याही परिस्थितीत येत्या पाच वर्षात मार्गी लावणार आहे, मी मतदाराना दिलेला प्रत्येक शब्द पाळणार आहे मला खुप काही कामे करायची आहेत मात्र आत्ताच यावर बोलणार नाही, अगोदर करुन दाखवीन नंतर बोलेन असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्याना नीरा-देवघर धरणाचे पाणी आणून आणि कालवे बारमाही करीन असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला सन २०१७ मध्ये कराराची मुदत संपल्यापासून नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहिर केला असून याबाबतचा आदेश येत्या काही दिवसात काढावा असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले आहे. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील नीरा-देवघर धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायम स्वरुपी बंद होवून त्याचा फायदा भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्यांना १०० टक्के होणार असल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.वास्तविक पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसित गावठाणे, आणि प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात जमिनी फलटण-खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वखुशीने दिल्या त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी न देता, ज्यांचा या पाण्याशी काडीमात्र संबंध नाही, एक गुंठ्याचे योगदान नाही त्या बारामती-इंदापूर तालुक्यांना हे पाणी देणे राजकारण नव्हे का ? असा सवाल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |