सातारा : (प्रकाश राजेघाटगे) नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात कोरेगांव मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते व माजी पालकमंञी श्री.शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.या पराभवाची अनेक कारणे आहेत.पण गेल्या साठ वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच कोरेगांव तालुक्याने खऱ्या अर्थाने काँग्रेसी विचारसरणी डावलून एक उजव्या विचारसरणी असलेल्या शिवसेनाचा आमदार निवडून दिला.श्री.महेश शिंदे जायंट किलर ठरले.स्थानिक स्वराज्य संस्थेतून थेट विधानसभेत त्यांनी धडक मारली.कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राष्ट्रवादी सारख्या सातारा जिल्ह्यातील एक मजबूत पक्षाच्या एका प्रमुख नेत्याला पराभूत करणे हे त्यांचे यश विशेष आहे.पण या यशात ते ज्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेत त्या पक्षाच्या कार्यकर्तेचेही कष्ट आहेत हे सध्या विद्यमान आमदार विसरलेत की काय अशी शंका तालुक्यातील शिवसैनिकांच्यात आहे व त्यास श्री.महेश शिंदे यांची गेल्या दोन महिन्यातील कार्यपध्दतीच कारणीभूत आहे असेच दिसून येत आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपात असलेले श्री.महेश शिंदे यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.यामध्ये एक कारण असेही आहे की,कोरेगांव मतदारसंघ युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेलाच सुटणार आहे अशी खाञीलायक माहिती असल्याने त्यांनी सेनेची वाट धरली.सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आपले तिकीट फिक्स करून घेतले.निवडणूकीच्या तोंडावर जरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरीही मतदारसंघातील शिवसैनिकांनी कुठलाही विरोध न करता मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य मानून प्रचारात झोकून दिले,आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अतोनात कष्ट घेतले.यात श्री.महेश शिंदे यांनी गेल्या चार वर्षात भाजपात असतानाचा संघर्षाकडे डोळेझाक करूनही चालणार नाही.गेल्या चार वर्षात कोरेगांव तालुक्यामध्ये दोन-चार जणांच्या पर्यंत मर्यादित राहिलेला भाजपा पक्ष त्यांनी वाडी-वस्तीवर पोहचवला. तरीही निवडणूक जिंकण्याच्या गणितात ते भाजपाच्या तिकीटावर निवडून येऊ शकत नाहीत हे ते पुरेपूर जाणून होते. कारण कोरेगांव तालुक्याचा मागील दोन निवडणुकीचा इतिहास पाहता येथील शिवसेनेच्या उमेदवाराला कमीतकमी पंधरा हजार मते पडतात हे सिध्द झाले आहे.आणि याच आयत्या मिळालेल्या मतावर त्यांनी विजयाचा कळस बांधला असेच म्हणावे लागेल.
निकाल लागल्यानंतर पहिला महिना सत्ता संघर्षात गेला.नंतर महाविकास आघाडीचे सरकार शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले.आणि सातारा जिल्ह्यातील विशेषतः कोरेगांव तालुक्यातील शिवसैनिकांना दुहेरी आनंद झाला कारण मुख्यमंत्री सोबत आमदारही सेनेचा झाला पण गेल्या महिन्याभरातील घटनाक्रमावरून अनेक शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे.कारण सत्ता व आमदार शिवसेनेचा असतानाही आमदारांच्या बरोबर जुन्या मिञ पक्षाच्या कार्यकत्यांचे कोंडाळे दिसून येत आहेत.निवडून आल्यानंतर चालू केलेल्या आभार दौऱ्यात सेनेचा एकाही स्थानिक पदाधिकारी दिसून येत नाही किंवा त्यांना साधे आमंत्रण देण्याचे सोपस्कर ही विद्यमान आमदारांकडून पार पाडले जात नाही.गेल्या महिन्याभरात त्यांनी दोन-तीन विकासकामाचे उध्दघाटने केले त्यात फक्त भाजपाचे पदाधिकारी दिसून येत आहेत.सातारा खावली येथे झालेल्या कार्यक्रमात सातारा भाजपा तालुकाध्यक्ष व कोरेगांव शहराध्यक्ष उपस्थिती सर्व काही सांगून जात आहे.निवडून आल्यानंतर श्री.महेश शिंदे विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची बैठक घेऊन अडीअडचणी वर चर्चा करतील असे वाटत होते पण ती ही गोष्ट आजपर्यंत झाली नाही.त्यांच्या पेक्षा जिल्ह्यातील निवडून आलेले सेनेचे दुसरे आमदार व विद्यमान गृहराज्य मंञी श्री.शंभूराजे देसाई चांगले असेच म्हणावे लागेल.कारण कधीही तालुका सोडून न पाहणाऱ्या शंभूराजेनीं मंञी झाल्यापासून शिवसेना पदाधिकारी यांच्या दोन बैठका घेतल्या.व शिवसेना पदाधिकाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासनही दिले.यातील एका बैठकीत तर श्री.महेश शिंदेही उपस्थित होते.पण यावरूनही त्यांनी बोध घेतला नाही हे विशेष !
आता कुठे श्री.महेश शिंदे यांच्या कारकीर्दीला सुरूवात झाली आहे.पण सुरुवातीलाच त्यांच्या शैलीवर शिवसैनिक शंका घेऊ लागले आहेत.असेच जर चालू राहिले तर सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल.आणि एवढया मोठ्या विजयाचे यश ते निर्विवाद पणे पुढे राखू शकणार नाहीत.कारण ज्या सामान्य शिवसैनिकांच्या मतांच्या जोरावर ते विजयाच्या पालखीत बसले आहेत त्या विद्यमान आमदारांची भोयासहीत पालखी करण्यांची ताकद सामान्य शिवसैनिकात अजूनही शिल्लक आहेत हे त्यांनी विसरू नये. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो.तुर्तास एवढेच.
जिहे-कठापुर योजनेला शिवसेनाप्रमुखांचे नांव देण्याचे काय झाले?
कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील विशेषतः खटाव तालुक्यातील शिवसैनिकांची जिहे-कठापूर योजनेला शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे नांव देण्याची मागणी फारच तीव्र आहे.गेल्या काही वर्षात यासाठी आंदोलने ही झाली.गेल्या सरकारच्या काळात भाजपा वाल्यांना या योजनेला पंतप्रधान मोदींचे राजकीय गुरू श्री.लक्ष्मणराव इनामदारांचे नांव देण्याबाबत घाट घातला होता.यात विद्यमान आमदारांची भूमिका महत्त्वाची होती.आत पक्ष बदलला तरी त्यांच्या भूमिकेत फरक पडलेल्या दिसून येत नाही.कारण परवा पुसेगांव येथे सेवागिरी महाराजांच्या रथोत्सव कार्यक्रमात उपनेते तथा कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.नितीन बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत श्री.महेश शिंदेनी जिहे-कठापूर योजनेचा उल्लेख श्री.लक्ष्मणराव इनामदार उपसा योजना असा केल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.पक्षांतर करूनही महेश शिंदे भाजपाचीच भूमिका कसे मांडू शकतात, सेनेच्याच आमदारांना शिवसेनाप्रमुखांचा विसर कसा पडला?याचीच चर्चा जास्त रंगली होती.हा सारा प्रकार म्हणजे खाल्ल्या घराचे वासे मोजणे असाच होतो असेच म्हणावे लागेल.अशी प्रतिक्रिया एका जुन्या शिवसैनिकाने नांव न छापण्याच्या अटीवर आमच्यापाशी व्यक्त केली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |