02:00am | Sep 17, 2019 |
कराड : काश्मीरमधील 370 कलम रद्द करून भाजप सरकारने ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. भारतातील कुठल्याही व्यक्तीला काश्मीरमधील सुईच्या टोकाएवढी जमीन विकत घेता येत नव्हती असे असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे 370 कलमच्या बाजूचे आहेत की विरोधातले आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे? असे खडे बोल मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सुनावले.
भाजपाची महाजनादेश यात्रा रविवारी रात्री कराडात दाखल झाली. आज (सोमवारी) यात्रेच्या पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी सकाळी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खा.उदयनराजे भोसले, खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावंकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ऍड. भरत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, भाजपाची महाजनादेश यात्रा महाराष्ट्रात गेल्या 19 दिवसापासून सुरू झाली आहे. तिसर्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर या जिल्हयांचा समावेश आहे. महाजनादेश यात्रेत आतापर्यंत 3190 किलोमीटरचा प्रवास झाला असून महाराष्ट्रातील 112 विधानसभा मतदार संघातून ही यात्रा गेली आहे. या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सातार्यातील यात्रेत उदयनराजे व शिवेंद्रराजे सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हयात या महाजनादेश यात्रेला प्रंचड उत्साह दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, सांगली,कोल्हापूर जिल्हयात प्रचंड हानी झाली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याबरोबरच संभाव्य पुरपरीस्थितीचा सामना करण्यासाठी सरकाराने काही निर्णय घेतले आहे. गत महिन्यात पावसाचा कल पाहता प्रंचड पाऊस झाला आहे. सरासरी आठशे टक्के इतका पाऊस झाला आहे. या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वर्ल्ड बँक व एशियन बँकेच्या सहकार्याने आमचे प्रयत्न सुरू आहेेत. हे पाणी कृष्णा-भीमा स्थिरीकरणासारखे दुष्काळी भागाकडे वळवता येईल का? याचे नियोजन चालू आहे असे त्यांनी नमूद केले.
गेल्या पाच वर्षामध्ये युती सरकारने राज्यात मोठा विकास केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य हे उद्योगात आठव्या क्रमांकावरून 13 व्या क्रमांकावर गेले आहे असा आरोप केला आहे. त्यांनी ही आकडेवारी कोठून आणली आहे हे जाहीर करावे. महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मोठी गुंतवणूक झाली आहे. एकटया महाराष्ट्रात पाच राज्यातील एकत्रित गुंतवणूक केली तर ती एकटया महाराष्ट्राची गुंतवणूक होईल. सरासरी महाराष्ट्रात 29 टक्के गुंतवणूक झाली आहे. देशात जेवढा रोजगार तयार झाला त्यातील 25 टक्के रोजगार एकटया महाराष्ट्रात निर्माण झाला आहे असे असताना जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सुरू ठेवला आहे. त्यांच्या काळातच विकास दर घसरला होता. यावर बोलायचा कॉंग्रेसला अधिकार आहे का? असा सवाल मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
70 वर्षानंतर एखादा पक्ष व एखादा नेता काश्मीरमधील 370 कलम रद्द करून देशाला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करीत असतील तर इतर पक्षातील नेते भाजपात का येवू नयेत? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगावे की आपण 370 कलमच्या बाजूचे की विरोधातले,आपण काश्मीरच्या झेंडयाला महत्व देता का तिरंगा झेंडयाला, देशात आरक्षण आहे आणि काश्मीरमध्ये आरक्षण नाही. तुम्ही आरक्षणाच्या बाजूचे की विरोधातले, भारतातील कुठल्याही व्यक्तीला सुईच्या टोकाएवढी जमीन काश्मीरमध्ये घेता येत नाही असे असताना 370 कलम रद्द केले. तुम्ही 370 कलमाच्या बाजूचे की विरोधातले हे जाहीर करावे अशा प्रश्नांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. चव्हाण यांच्यावर भडीमार केला.
सातारा जिल्हयातील सिंचनाची कामे गेल्या पाच वर्षात सरकारने मार्गी लावली आहेत. बंद पडलेली धोम-बलकवडी, वांग,मोरणा, वसना,जिहे-कठापूर आदी रखडलेल्या योजनांना मोठा निधी दिला आहे. विदर्भाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रालाही आम्ही झुकते माप दिले असे त्यांनी नमूद केले.
माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.
उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ
उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाची मोठी ताकद वाढली आहे. सातारा जिल्हयात भाजपाचा मजबूत किल्ला तयार होत आहे. उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. जिथे शिस्तीची गरज आहे तिथे ते शिस्तबध आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेच्या कॉलर स्टाईलच्या प्रश्नाला उत्तर दिले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |