कराड : तारळी उपसा जलसिंचन योजनेच्या 50 हेडच्यावरील क्षेत्रासाठी पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज (मंगळवारी) राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पासाठी राज्य शासनाने 1610 कोटी रूपयांची प्रशासकीय मंजूरी दिली असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदार संघाचे आ. शंभुराज देसाई यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते आज बोेलत होते. ते पुढे म्हणाले, 1999 -2004 या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना तारळी उपसा जलसिंचन प्रकल्पाला मंजूरी दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 50 हेडच्या खालील भुसंपादनासह सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण केली आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली होती. कालातरांने 50 हेडच्यावरील क्षेत्रासाठी पाणी देण्याची गरज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. 2009-2014 च्या काळात आपल्या मागणीचा शासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणूकीत आपल्या वचननाम्यात येत्या 5 वर्षात तारळी उपसा जलसिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्याला मान्यता मिळवून देण्याचे आपण जाहिर केले होते. त्यानुसार आपल्या पाठपुराव्याला यश मिळाले. दि. 8 डिसेबर 2016 रोजी या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली. विधीमंडळाच्या अधिवेशनात या प्रकल्पासाठी आपण सभागृहापुढे लक्षवेधी सूचनेत तांत्रिक बाजू मांडली होती. मंत्रीमहोदयांनी आपल्या लक्षवेधीची दखल घेत आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत 50 हेडच्यावर क्षेत्रांसाठी पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी 1610 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी 1057 कोटींची तरतूद केली होती. जुन्या खर्चात 553 कोटींचा वाढीव निधी या प्रकल्पासाठी प्राप्त होणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे 17 गावांमधील 2725 एकर क्षेत्र ओेलीताखाली येणार असल्याचे आ. शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आभार व्यक्त करून आ. शंभूराज देसाई यांनी या निर्णयामुळे हजारो शेतकर्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे नमूद केले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |