मुंबई : लॉकडाउनचा सातवा किंवा आठवा दिवस निघून गेला ती कल्पनाही आलेली नाही. लढाई अजूनही सुरु आहे. जसे जसे दिवस जात आहेत तसे आपण आपली पकडही मजबूत करत आहोत. हाच तो काळ आहे ज्या काळात करोनाचा विषाणू गुणाकार सुरु करतो. आपण सगळे त्याला धैर्याने तोंड देत आहेत ही कौतुकाची बाब आहे. आपली लढाई अजून संपलेली नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. आधीच करोनाचं संकट आहे आणि आज दुपारी थोडीशी गडबड झाली, गोंधळ उडाला होता. अनेकांची अशी समजूत झाली की अनेकांचे पगार कापण्यात येतील. मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही हे माझं आश्वासन आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
“आज मी तुम्हाला ग्वाही देतो की कुणाचाही पगार कापला जाणार नाही. फक्त काही टप्प्यांमध्ये त्याची विभागणी होणार आहे. वेतन कपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य सेवेतले अधिकारी यापैकी कोणाचीही पगार कपात केली जाणार नाही. मी परवा नायडू रुग्णालयातील डॉक्टरांशी बोललो. त्यांना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला ते एखाद्या सैनिकासारखे वाटले. करोना नावाच्या व्हायरसशी हे सगळे लढत आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशावेळी करोनाने कितीही टकरा दिल्या तरी त्याचा पराभव होणारच हे लक्षात असूद्या असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच करोनाशी लढण्यासाठी इतके हात पुढे येत आहेत. मग कुणाचाही पगार कसा काय कापला जाईल? करोनाशी लढल्यानंतर आर्थिक संकट येणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यात हा पगार दिला जाईल असं आश्वासन मी देतो” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
थंड पाणी, सरबत न पिण्याचं आवाहन
“सध्या उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे थंड पाणी किंवा सरबत पिणं अगदी घराघरात होत असतं. मात्र शक्यतो ते टाळा, सरबत पिऊ नका. थंड पाण्याची बाटली तोंडाला लावू नका. हे करोनाचा उपाय म्हणून मी सांगत नाही. मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात एसी असेल तर तोदेखील लावू नका. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या” असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |