सातारा : सातारा जिल्ह्यातील धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह धरणग्रस्तांनी दिला आहे.
धोम व कण्हेर धरणग्रस्तांची कब्जे रक्कम जमा करून जमीन वाटप करणे व इतर महत्वाच्या मागणीसाठी आता धोम व कण्हेर धरण परिसरातील मालादपूर, बोरीव, आसरे, रणावळे, रामनगर, तांबी, पाटेश्वर नगर, वेळे-कामथी, चोरगेवाडी, साय गाव, वाघेश्वर, भणंग, देशमुख नगर, पिंपरी, रिटकवली, मोरावळे येथील धरणग्रस्तांनी मंगळवारी दि २जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून धोम जलाशयात उतरून साखळी आंदोलन करण्याचा इशारा सातारचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आज निवेदन देण्यासाठी धरणग्रस्तांनी गर्दी केली होती.हे धरणग्रस्त गेली पंचेचाळीस वर्ष संघर्ष करीत आहेत. पूर्वी नुकसानभरपाई रक्कमेतून ६५टक्के रक्कम वसूल केली जात नव्हती. तसा पुनर्वसनाचा कायदा ही नव्हता. तरीही आता रक्कम भरून सुद्धा धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. दि १मे १९७३ साली महाराष्ट्र दिनी शासन निर्णय क्र. एच पी ए-१०७१/४१५८/र-नुसार जमिनीची उपलब्धता व वाटपाचे प्रमाणे रक्कम भरून पुनर्वसित जमिनीचा ताबा धरणग्रस्तांना देण्यात आला होता. आता या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यामुळे धरणग्रतांना स्वमालकीची जमीन नाही, पुनर्वसनाचा पत्ता नाही अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या हक्काची जमीन न देता त्यांच्या दुसऱ्या पिढीवर सुद्धा अन्याय होत आहे. पुनर्वसन खात्यात अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. आता सहनशीलता संपली असून सर्व धरणग्रस्त पावसातच धोम जलाशयात उतरून साखळी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी देवराज देशमुख, श्रीहरी गोळे, काशिनाथ बैलकर, रामचंद्र वीरकर, सुभाष सुळके, अमित पोळ, जितेंद्र गोगावले, नामदेव सणस, दत्तात्रय गोगावले यांच्यासह कुटूंब सहभागी होणार असून कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारकर जनता करीत आहे. ठोस उपाययोजना करणे आवश्यक असून आणखी किती परवड धरणग्रस्तांची करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |