06:59pm | Jul 17, 2019 |
सातारा : खंडाळा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाणी परिषदेमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेक करुन ही पाणी परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न फलटणमधील एका ज्येष्ठ नेत्याने (फलटण नरेश) केलेला होता. मात्र, अगोदरच या दगडफेकीची कुणकुण लागल्याने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर या पाणी परिषदेस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी खळबळजनक माहिती फलटण येथील स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गेली 19 वर्षे सातारा जिल्ह्याच्या हक्काचे 70 टीएमसी पाणी बारामतीला केवळ आपले पद वाचविण्यासाठी फलटणमधील काही नतद्रष्टांनी खंडाळा व फलटण तालुक्यातील जनतेची मोठी प्रतारणा केली आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी खंडाळा येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षपदी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे होते. तसेच माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, पाणी पंचायतीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब बागवान, उपाध्यक्ष एस. वाय. पवार, शंकरराव गाढवे, नानासाहेब राणे, बकाजीराव पाटील, पुरुषोत्तम जाधव, नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, रमेश धायगुडे, उपसभापती वंदना धायगुडे, राजेंद्र नेवसे, डॉ. विजय शिंदे, कॉंग्रेस युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रदीप माने या परिषदेला उपस्थित होते. मात्र, पाणी परिषदेचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मात्र ऐनवेळी या पाणी परिषदेला अनुपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे पाणी परिषदेला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित राहिले नाहित म्हणून संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र फलटण नरेश अशी ओळख असलेल्या फलटण तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्याने पुणे जिल्ह्यातील काही गुंडांना सुपारी देवून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ही परिषद उधळून लावण्याची सुपारी दिली होती. मात्र, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना याबाबत होणार्या दगडफेकीची पूर्वसूचना मिळाल्यामुळे पाणी परिषद व्यवस्थित पार पडावी तसेच पाणी परिषदेला उपस्थित राहिलेल्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी खंडाळा येथे झालेल्या पाणी परिषदेला उपस्थिती लावली नाही, अशी खळबळजनक माहिती युवानेते दिगंबर आगवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटणमधील वातावरण दूषित करण्यात येत आहे. आपले पद आणि खुर्ची टिकवण्यासाठी फलटणमधील काही ज्येष्ठ नेत्यांचे राजकारण खालच्या पातळीवर उतरलेले आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून नीच पातळीवर जावून राजकारण केले जात आहे. खंडाळा येथेसुद्धा फलटण नरेश नावाने ओळखल्या जाणार्या ज्येष्ठ नेत्याकडून माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेक करुन पाणी परिषद उधळून लावण्याचा कट रचला गेला होता. मात्र, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पाणी परिषदेला अनुपस्थिती दर्शविल्याने होणारा अनर्थ टळला आहे. मात्र, अशी नीच कृत्ये करणार्या फलटण नरेशांना पोलीस प्रशासनाने हिसका दाखवून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी आगवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |