01:54am | Aug 29, 2019 |
दहिवडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यात या शासनाने शेतकरी सन्मान योजना नावाने कर्जमाफी योजना सुरु करून कर्जमाफी मात्र केली त्यातून केवळ छत्रपतींच्या नावाची या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी बदनामी केली आहे. तर सोळा हजार शेतकर्यांनी या शासनाच्या राज्यात आत्महत्या केल्या आहेत २०१४ साली तत्कालीन सरकारवर शेतकरी आत्महत्या बाबत ३०२ चे गुन्हे दाखल करा असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर आज गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे असा आरोप आरोप राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केला. दहिवडी ता. माण येथील बाजारपटांगणावर शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, सुभाष शिंदे,जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेंद्र गुदगे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत,जि प माजी अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ भारती पोळ,सोनाली पोळ,शिवाजी सर्वगोड, सभापती रमेश पाटोळे,सभापती कल्पना मोरे, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे,कुमार मगर, डॉ संदीप पोळ, मनोज पोळ, युवराज सूर्यवंशी,संदीप मांडवे,लालासाहेब ढवाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले,मुख्यमंत्री यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढली आहे या यात्रेला माणसांच्या गर्दी पेक्षा पोलिसांची गर्दी जादा झाली आहे. त्यांच्या यात्रेत जनता काळे त्यांना झेंडे दाखवत आहे. मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील या शेतकर्याच्या ६९ वर्षीय वयोवृध्द पत्नीला पोलिसांना स्थानबध्द करायला लावले आहे. या मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरतांना माता भगिनींची भीती वाटायला लागली आहे.त्यामुळे महिलांच्या दारात या भीतीने पोलीस बसवू लागले आहेत. मात्र याच माता भगिनींचा आता शाप लागल्याशिवाय राहणार नाही, एक दिवस हे रंकाचे राव होतील. आघाडी शासनाच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा धाडशी निर्णय घेण्यात आला मात्र या शासनाच्या काळात या स्मारकाला एक वीट लावता आली नाही. तसेच बालेवाडीच्या क्रीडासंकुलाला श्री छत्रपती क्रीडासंकुल हे नाव देण्याचे काम शरद पवार साहेब यांच्या मुख्यमंत्री काळातच झाळे आहे. सोळा हजार शेतकर्यांनी या शासनाच्या राज्यात आत्महत्या करण्याची वाईट वेळ आणली आहे शेतकरी आत्महत्मा प्रकरणी मुख्यमंत्री यांच्यावर ३०२ चे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे असा आरोप डॉ.अमोल कोल्हे यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, युतीचे शासन राज्यात चुकीची धोरणे राबवत आहे,त्यामुळे मंदीची लाट निर्माण झाली आहे.शेतकर्यांच्या शेतीमालाचे भाव वाढले नाहीत, राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली. या शासनच्या काळात सहा लाख उद्योग बंद पडले आहेत त्यामुळे नोकर्या सुरक्षित राहिल्या नाहीत, १ कोटी १० लाखांच्यावर रोजगार गेले आहेत. विमान कंपनी, पार्ले सारखे उद्योग बंद पाडले आहेत, रिलायन्स सारखी खासगी मोबाईल कंपनी तेजीत चालविण्यासाठी बीएसएनएल कंपनी दिवाळखोरीत काढली,खासगीकरणातून भांडवलदार मोठे करण्याचे काम याशासानाने केले आहे. शेतकर्यांकडून कोट्यावधी रुपयांची विम्याची रक्क्कम भरून घेतली मात्र त्याना या सरकारने परतावा दिला नाही.राज्याचे मुख्यमंत्री हे राजकीय व्याभिचार करीत असून त्यांना या व्याभिचाराची उबग येवू लागली आहे. याचा ममात्र जनतेच्या मनात राग निर्माण झाला आहे. भेटेल त्याला राजकीय लालसेने पक्षात भेटेल त्याला ओढू लागले आहेत. शेतकर्यांचे देणे लागणारे साखर कारखानदार, खासगी कारखानदार , जे घोटाळ्यात अडकले आहेत त्यांना धास्ती लागली आहे. ते पक्ष सोडून जात आहेत. मात्र याला पर्याय निर्माण झाला आल्याने आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देत आहोत. शरद पवार नावाचे आमच्याकडे राजकीय विद्यापीठ असल्याने अ गेला तरी ब आमच्याकडे हजर आहे असे पाटील म्हनाले.
आमदार शिंदे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत आमचा विश्वास जरी निराशेत गेला असला तरी जनतेने आम्हाला बरोबरीत मतदान दिले असून माण खटाव मतदार संघातून आगामी आमदार हा राष्ट्रवादी पक्षाचाच असणार आहे.तसेच तरुण व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार आहे. प्रभाकर घार्गे म्हणाले,मटन, पैसा लाचारी दूर ठेवून कामाला लागा, काहीजण निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न आणून दिशाभूल कारित आहेत,त्याला बळी पडू नका . भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असल्या तरी कोणाच्याही पाठीशी जाणार नाहीनाही, प्रसंगी राजकारणातून घरी बसेन पण चुकीच्या प्रवृतींना पाठिंबा देणार नसल्याचे घार्गे यांनी स्पष्ट सांगितले.डॉ. भारती पोळ,प्रा.कविता म्हेत्रे, सतीश मडके,नंदकुमार मोरे,सूर्याजी शिंदे, सागर देवकर, यांची भाषणे झाली सूत्रसंचालन सरपंच अमोल काटकर यांनी केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |