04:47pm | Jul 28, 2018 |
सातारा : राज्यातील उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काल रात्री जारी करण्यात आला. या बदल्याअंतर्गत सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. चांगले काम करुनही बदली केल्याच्या निषेधार्थ तसेच बदली रद्द करावी या मागणीसाठी रविवार दि. 29 जुलै रोजी पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शांतीदूत पुतळयाजवळ सकाळी 11 वाजल्यापासून एकदिवसाचे मूक धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाव्दारे पोलीस महासंचालकांना दिला आहे. जिल्हयातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी जिल्हयातील सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था, मान्यवर व्यक्ती, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही श्री. मोरे यांनी केले आहे.
निवेदनात, एसपी संदीप पाटील यांनी जून २०१६ मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार घेतला. त्याअगोदर ते संवेदनशील असणाऱ्या गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक होते. गडचिरोलीतून साताऱ्यात हजर होत असताना त्यांनी "बुके नको बुक आणा" असे सातारकरांना आवाहन केले आणि जिल्हावासियांनीही त्यांची एक पुस्तक देऊन भेट घेतली. जमा झालेली ही सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील नागरिकांना वाचण्यासाठी पाठवून एक नवा पायंडा घातला. अशा पद्धतीने त्यांनी 'पुस्तकप्रेमी' म्हणून आगमन केले आणि दोन वर्षाच्या कालावधीत सातारा शहरासह जिल्ह्यातील सावकारी, खंडणीखोर, गुंडगिरी, पर्यटनस्थळी लुटणारी टोळी या गुन्हेगारीचा अक्षरशः बिमोड केला. जवळपास 100 हून अधिक जणांना मोक्का लावला. एसपी संदीप पाटील यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे नामचीन गुंडापासून गल्लीबोळातील हुल्लडबाजापर्यंत भले भले दबकून होते. थोडी जर गडबड झाली की मोक्का लागणार किंवा तडीपार होणार अशी पोलिसांची गुन्हेगारांवर दहशत निर्माण झाली होती. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच सातारा जिल्ह्यातील क्राईमरेट कमी झाला. एसपी संदीप पाटील यांच्या या ठोस कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. केवळ गुन्हेगारांचाच नाही तर पोलीस दलातील कामचुकार, बेशिस्त वागणा-या आणि गुन्हेगारांचे खबरी म्हणून काम करणा-या कर्मचा-यांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उचलला होता. त्यामुळे पोलीस दलामध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा निर्माण झाला होता. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमध्ये जखमी होऊनही ते कार्यरत राहिले आणि दंगल पसरणार नाही याचीही त्यांनी काळजी घेतली होती. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ दिला नाही. जिल्हयातील गुन्हेगारी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्यांची बदली रद्द करुन त्यांना आणखी एक वर्षे मुदतवाढ देण्यात यावी. त्यांच्या बदलीला समाजातील सर्वच क्षेत्रातील घटकांचा विरोध असून त्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. तरी लोकभावनेचा विचार करुन आपण त्यांची बदली तातडीने रद्द करण्याचे आदेश काढावेत अशी मागणीही श्री. मोरे यांनी केली आहे. या मागणीबरोबरच चांगले काम करुनही बदली केल्याच्या निषेधार्थ आणि बदली तातडीने रद्द करावी या मागणीसाठी रविवार 29 जुलै रोजी सकाळी 11 पासून सातारा पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शांतीदूत पुतळयाजवळ एक दिवसाचे मूक धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, गृहसचिव यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हयातील गुन्हेगारी नष्ट होण्यासाठी आणि चांगल्या अधिका-याला पाठिंबा देण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था, मान्यवर व्यक्ती, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा. सर्वांनी आपआपसातील मतभेद विसरुन गुन्हेगारी नष्ट करण्यास हातभार द्यावा असे आवाहनही श्री. मोरे यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |