01:25am | Apr 09, 2019 |
सातारा : सातारा शहर व सातारा औद्योगिक वसाहतीसाठी कूपर उद्योग समुहाची अग्निशामक सेवा वरदान ठरली आहे. आगीच्या तांडवावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून या सेवेतील कर्मचारी देवदूतासारखे तात्काळ धावून जातात आणि अनेकांचे जीव वाचवतात, बहुमूल्य मालमत्तेचेही रक्षण करतात. मात्र ज्यांच्या जीविताचे व वित्ताचे संरक्षण झाले, तेच संकटाचे निवारण झाल्यानंतर सोयिस्करपणे उपकार विसरून कृतघ्नपणा करतात असा अनुभव या देवदूतांना येत असल्याने त्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
उपकारकर्त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव जपला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही अग्निशामक यंत्रणा कंपनीने स्वत:साठी उभारली आहे. अन्य ठिकाणी आगी लागतात, तेव्हा धावून जाणे ही कूपरच्या अग्निशामक वाहनाचे चालक व आग रक्षक (फायरमेन) यांची ड्यूटी नाही. पण केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून हे देवदूत संकटसमयी धाव घेतात. त्यांनी बजावलेल्या या कामगिरीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरे तर ज्यांच्यावरील संकट निवारण झाले त्यांनी खुशीने बक्षिसे दिली पाहिजेत. पण तसे होताना दिसत नाही हे चीड आणणारे आहे. सातारा औद्योगिक वसाहतीत अलीकडेच औद्योगिक सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण याप्रसंगी प्राणांवर उदार होऊन आगीच्या तांडवातून जीवित व मालमत्तेची सुरक्षा करणाऱ्या या देवदूतांबद्दल क्वचितच कोणी जाणीव ठेवली असेल.
साताऱ्यातील औद्योगिक परिसर आकाराने मोठा असला तरी आग प्रबंधक व अग्निशामन करणाऱ्या सुविधांच्या बाबतीत जवळपास सर्वच औद्योगिक आस्थापनांमध्ये वानवा आहे. कितीतरी दिवसांपासून सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशामन केंद्राची मंजुरी झाली असली तरी शासनाच्या लाल फितीतून अजून तरी ती बाहेर पडलेली नाही. आगीच्या घटनेच्या वेळी येथील उद्योजकांना प्रामुख्याने कूपर कार्पोरेशन अथवा सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलावरच विसंबून रहावे लागते. खरे पाहता कूपर कार्पोरेशनची अग्निशामक सेवा ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे साताऱ्यातील उद्योजकांना तसेच सातारा शहरातील वसाहतीला वरदान ठरली आहे. कूपर कार्पोरेशन सुरक्षा विभागातील अग्निशामक दलातील दोन सुरक्षा अधिकारी, बंबाचे तीन चालक व चार अग्निशामक कर्मचारी दिवस असो किंवा रात्र, सुट्टी असो किंवा सण; संकटसमयी स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीच्या ठिकाणी तत्परतेने धाव घेतात. अशा सेवेला शासनाच्या वतीने कुठलाच कायदेशीर आधार मिळत नाही.
कंपनीचे किमती वाहन व कर्मचाऱ्यांचे जीव पणाला लावून हे लोक माहिती नसलेल्या तिरायित माणसाची मालमत्ता व जीव वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न करतात. आग विझवताना कर्मचाऱ्यांना अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कूपर कार्पोरेशनवरच राहते. तसेच घटनास्थळी जाताना काही अपघात झाल्यास कायद्याने चालक व कंपनीच जबाबदार राहणार. आग विझवताना अग्निशामक वाहनाचे काही नुकसान झाल्यास ते वंâपनीलाच सोसावे लागणार. कर्मचाऱ्यांचे पगार, वाहनाची देखभाल, मास्क, फोम यासारख्या गोष्टी या सर्वाचाच भार कंपनी पेलत असते. आतापर्यंत टॉप गिअर, यश इंडस्ट्रीज, परफेक्ट हाऊस, शहरातील मुथा आर्वेâड्स, जुन्या औद्योगिक वसाहतीतील आकर्षण फर्निचर, जनरल रबर प्रॉडक्ट, नारायण मिल, रमेश साळुंखे डेकोरेटर्स या ठिकाणी कूपरच्या बहाद्दर सुरक्षा अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वेळेत धावून जावून लोकांच्या बहुमूल्य जिवांचे व संपत्तीचे रक्षण केले आहे. बऱ्याच वेळेला शहराच्या लगत असलेल्या शेतातील ऊसाच्या पिकाला तसेच वीज वितरणच्या कोडोली उपकेंद्र परिसरातील गवताला लागलेल्या प्रचंड आगीपासून या कर्मचाऱ्यांनी रक्षण केले आहे. दुर्दैवाने याच लोकांना मदत करण्याची जाणीव ज्यांच्यावर संकट आलेले असते अशांना नंतर रहात नाही. वाचलेल्या लाखोंच्या मालमत्तेचा विचार करता योग्य त्या बक्षिसाने अग्निशामक दलातील कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली गेली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. पण आजकाल कृतज्ञतेची भावना राहिलेली नाही असेच यातून दिसते.
संकटावेळची मदत विसरणे दुर्दैवी !
कूपरच्या अग्निशामक दलात अजिंक्य स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था यांच्या वतीने पियुश माने, राजाराम शिंदे व मधुकर माने हे अग्निशामक चालक तर यशवंत क्षीरसागर, हेमंत काळंगे, सागर पवार व पंकज साबळे हे अग्निशमन कर्मचारी म्हणून तिन्ही पाळीत काम करतात. त्यांच्या व्यथा बोलून दाखवताना मधुकर माने म्हणाले, सातारा एमआयडीसीतील एम ब्लॉकमधील परफेक्ट हाऊसच्या लगत आतापर्यंत आम्ही दोन वेळेला दोन - दोन तासापेक्षा जास्त वेळ काम करुन आग आटोक्यात आणली. परफेक्ट हाऊस ही कंपनी साताऱ्यात जनसेट बनवून लाखो रुपयांचा नफा कमवित असेल, पण आम्ही जीवाशी खेळून कंपनीचे संभाव्य नुकसान रोखले त्याची कंपनीने तसुभरही कदर केली नाही. ही काही खरी साताऱ्याची संस्कृती नाही. यावेळी बोलताना कामगार संघटनेचे सचिव सुनिल इंगवले म्हणाले, परफेक्ट हाऊसच्या उदाहरणावरुन श्रीमंत लोक त्यांच्यावर आलेल्या संकटाच्या वेळी गरीब कामगारांनी केलेली मदत लगेच विसरुन जातात हे दुर्दैव आहे. खरे पाहता परफेक्ट हाऊससारख्या उद्योगाला या आगीचा फटका बसला असता तर संभाव्य नुकसान करोडो रुपयात गेले असते. त्याची जाणीव ठेवून पाच - पन्नास हजार रुपये बक्षिस जीव धोक्यात घालणाऱ्या आमच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांना मिळायला हवे. पण काम झाले की लोक विसरुन जातात.
- गजानन चेणगे
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |