03:42pm | Jul 08, 2019 |
सातारा : सातारा हे जिल्ह्याचे हेडक्वार्टर आहे. पुण्यापासून बंगलोरपर्यंत जाण्यासाठी सातारा मार्गेच जावे लागते. जिल्ह्यात 11 तालुके येतात. तालुक्यातील लोकांना न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजासाठी सातारा शहरात यावे लागते. मात्र, या पावसाळ्यात सातारा शहराची दैना झाली असून उखडलेले रस्ते आणि खचलेल्या पुलामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरुन आलेल्या लोकांनाही द्राविडी प्राणायाम घालावा लागत असल्यामुळे सातार्यात जायलाच नको रे बाबा, अशी लोकांची मानसिकता झालेली आहे.
सातारा शहरात बारा महिने तेरा काळ उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झालेले असतात. नवीन तयार झालेला रस्ता काही दिवसांतच पूर्वपदावर येतो. सातार्यातील एकही रस्ता विनाखड्ड्याचा नसतो. त्यात प्राधिकरणाच्या खुदाईमुळे रस्त्यांची पूर्णत: वाताहत झालेली आहे. सातारा पालिकेतील रस्ते कंत्राटदार रस्ता तयार करतात, मात्र रस्ता खराब झाल्यानंतर ते याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. वास्तविक पाहता रस्ता तयार झाल्यानंतर दोन वर्षे त्या रस्त्याची डागडुजी करणे त्या ठेकेदाराला बंधनकारक आहे. मात्र, एकदा ‘बिल’ निघाल्यानंतर व कमिशन घशात घातल्यानंतर संबंधित ठेकेदार नामानिराळा होतो. गेल्या वर्षापासून पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण सातार्याचीच नाकाबंदी झालेली आहे. नक्की जायचे कुठून हा प्रश्न स्थानिक नागरिकांनाच पडत असल्याने बाहेरुन येणार्या नागरिकांची तर परिस्थिती विचारायलाच नको! जे रस्ते 50 वर्षांपूर्वी होते, तेच रस्ते आताही आहेत. त्या रस्त्यांचे रुंदीकरणही अद्याप झालेले नाही. त्यात गेल्या 15 वर्षांमध्ये चारचाकी व दुचाकींची संख्याही वारेमाप वाढली. परंतू रस्ते मात्र जैसे थे च राहिल्याने सातारच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. त्यात पोलिसांच्या एकेरी वाहतुकीमुळे भर पडली आहे. परवा कूपर कॉलनीतील सातारा- लोणंद रस्त्यावरील कण्हेर कालव्यावरील पुलाचा मुख्य पायाच खचल्याने सातारा, लोणंद, फलटण व पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. ही वाहतूक रिमांड होम, सदर बझार मार्गे वाढे फाट्याकडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या छोट्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याठिकाणी वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी नसल्यामुळे वाहनधारकांवर कोणताही निर्बंध राहिलेला नाही.
जिल्ह्यातून सातार्यात प्रशासकीय व इतर कामांसाठी येणार्या लोकांनी सातार्याकडे पाठ फिरवली आहे, तसेच ठोसेघर व कास येथे पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांनी सातारा नको रे बाबा, असे म्हणत सातार्याकडे पाठ फिरवली आहे. सातारा शहरात परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा बसेसवरील चालक नव्याने सुरु करण्यात आलेल्या मार्गांमुळे गांगरुन गेले आहेत. सातारा मध्यवर्ती बसस्थानकास जायचे कसे हे स्थानिकांना विचारुन मेटाकुटीस आलेले आहेत. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे सुरु असलेले काम, कूपर कॉलनीतील कालव्यावरील खचलेला पूल आणि भरीस भर म्हणून सातारा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या गुडघ्याएवढील खोल खड्ड्यांमुळे सातारकरांची दैना झालेली आहे. उशीरा आलेल्या मान्सूननेही आपला निर्दयीपणा सातारच्या रस्त्यांवर दाखवायला सुरुवात केलेली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा नगरपालिका प्रशासनाच्या खाबुगिरीची जबर किंमत मात्र सामान्य सातारकरांना मोजावी लागत आहे. सातार्यातील रस्त्यांची डागडुजी चांगल्याप्रकारे करण्याची मागणी सातार्यातील त्रस्त वाहनचालक व ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |