सातार्याचे भूमिपुत्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येनंतर सातार्यासह देशभरात खळबळ उडाली होती. सुमारे तीन दशके डॉ. दाभोलकर आणि त्यांचे सहकारी अंधश्रद्धेविरोधात लढत होते. अंधश्रद्धा विरोधी कायदा संसदेत पारित करावा व त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी डॉ. दाभोलकर हे सरकार दरबारी आग्रही होते. मात्र, दुर्दैव असे की शेवटी डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूपश्चात हा कायदा सरकारला पारित करावा लागला. ज्या माणसाने या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, मात्र त्यांच्या हत्त्येनंतर गुन्ह्याचा छडा लावण्याचे पुणे पोलीस, राज्य दहशतवादी विरोधी पथक, सीआयडी आणि देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा असणार्या सीबीआयला तपासाच्यादृष्टिने अद्याप ठोस असे हाती काही मिळालेलेच नाही. असे असताना मुंबई येथील उपनगर असलेल्या नालासोपार्यात राज्य दहशतवादी पथकाने सनातन चा साधक असलेला वैभव राऊत याच्या घरातून विस्फोटकाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी खोलात तपास केल्यानंतर शरद कळस्कर व सातारा येथील करंजे पेठेतील सुधन्वा गोंधळेकर या युवकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सातार्यात एकच खळबळ उडाली आहे.
देवद ता. पनवेल येथील आश्रमानंतर सातार्यात सनातन संस्थेची मोठी 'अँक्टीव्हीटी' आहे. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात संशयित म्हणून अटक केलेल्या डॉ. विरेंद्र तावडेचे दीर्घकालीन वास्तव्य सातार्यात होते. त्यामुळे डॉ. विरेंद्र तावडेने सातार्यात वास्तव्य असताना सनातनचा फार मोठा स्लिपर सेल अस्तित्वात आणली असल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. नालासोपार्याच्या निमित्ताने सनातन मधील सातार्यातील एका-एका पिलावळीची नावे समोर येवू लागली आहेत. सनातनच्या आश्रमामध्ये भल्याभल्यांचे माईंड वॉश केले जाते. अल्पशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत सनातनचे साधक आहेत. मालेगाव, मडगांव व बंगलोर स्फोटानंतर सनातन संस्थेचा खरा चेहरा देशवासियांना समजलेला आहे. तपास यंत्रणांनी सनातनच्या साधकाला एखाद्या प्रकरणात ताब्यात घेतले तर सनातनच्या वकीलांची फौज उभी राहते. तपास यंत्रणांवर दबाव टाकला जातो. मिडिया ट्रायल मोठ्या प्रमाणावर चालवले जाते. परिणामी तपासाची दिशाभूल केली जाते. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी भगव्या दहशतवादावर बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र त्यांनी त्यावेळी व्यक्त केलेली शक्यता खरी ठरु लागली आहे.
कॉंग्रेसच्या काळातच सनातन वर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र माशी कुठे शिंकली, आणि सनातन वर बंदी ‘म्यान’ केली. त्याची फळे आता भोगावी लागत आहेत. प्रत्येक धर्मामध्ये कमी-अधिक प्रमाणात कर्मकांड असतात. मात्र सनातन ने या कर्मकांडांऐवजी कायदा हातात घेतल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विवेकवादी विचारवंतांच्या हत्येमागे एकच शक्ती आहे, हे सांगण्याची आवश्यकता आता उरलेली नाहीये. तपास यंत्रणेचा तपास त्यांच्या पद्धतीने सुरु आहे. सनातनचे कार्य त्यांच्या पद्धतीने सुरु आहे. दहशतवादालाही आता वेगवेगळे रंग चढू लागले आहेत. हिरवा, निळा आणि आता भगवा. गेल्या ४-५ शतकाकांपासून पंढरपुरच्या वारीमध्ये भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून लाखो वारकरी पंढरपूरला जातात. या पंधरा दिवसांत पंढरीरायाच्या भेटीची आस या वारकर्यांना लागलेली असते. भागवत धर्माचा झेंडा भगवाच असतो. छत्रपती शाहू (पहिले) यांच्या अधिपत्याखाली पेशव्यांनी अटकेपार जरी पताका फडकवल्या, त्यावेळी या देशाचा रंग एकच होता. तो म्हणजे भगवा. हा भगवा रंग बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना पोटात सामावून घेत होता. मात्र गेल्या काही दशकांमध्ये ध्वजांच्या रंगाचीही जातीनुसार विभागणी झाली. नव्वदच्या दशकामध्ये काश्मिरमधील हिंसाचार टोकाला गेला. बाबरी मस्जिद पतनानंतर देशात खासकरुन मुंबईमध्ये जातीय दंगली उसळल्या. तेव्हापासून एका विशिष्ट जातीला रंगाचे लेबल लावले गेले. राज्यात दलितांवर अत्याचार वाढू लागले. जंगलापुरताच मर्यादित असणारा नक्षलवाद शहरापर्यंत येवून पोहोचला. भीमा-कोरेगाव च्या निमित्ताने निळा दहशतवाद ही तयार करण्यात आला. सनातन, शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनांमुळे आता भगवा दहशतवादही जागासमोर येत आहे. परवा दिल्लीतील जंतरमंतरवर ज्या पुस्तकाने देशाची एकात्मता व अखंडता टिकवली आहे, अशी राज्यघटना दहन करुन देशात पुन्हा एकदा मनुस्मृतीप्रमाणेच अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली गेली. हे चाललेय काय? समजतंय पण उमजत नाही, असे काहीसे वातावरण देशात सध्या निर्माण झाले आहे. सातारा सारख्या निमशहरामध्ये सुद्धा सनातनचे मोठे नेटवर्क आहे. सुधन्वा गोंधळेकर या सनातन आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान साधकाच्या निमित्ताने साताऱ्यातील 'भगवा दहशतवाद' जगासमोर आलेला आहे. भविष्यामध्ये काहीतरी फार मोठे 'कांड' होण्यागोदरच सातारा पोलिसांना मात्र हे 'मोड्यूल' संपूर्णपणे उध्वस्त करावे लागणार आहे. तरच येणाऱ्या काळात साताऱ्यातील जातीय सलोख्याचे वातावरण टिकून राहणार आहे.
‘सातारा टुडे’चे ‘ते’ वृत्त ठरले खरे!
परवा नालासोपार्याच्या घटनेवरुन सातारा जिल्ह्याचे सनातनवादी कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. सुमारे महिनाभरापूर्वीच सातारा टुडे ने याबाबतची भीती व्यक्त केली होती. एटीएसने दाभोलकर हत्या प्रकरणानंतर सातार्यातून मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रे हस्तगत केली होती. यानंतर अग्निशस्त्रे बाळगणार्या अनेकांसोबत आर्थिक तडजोड करुन त्यांना क्लीनचिट देण्यात आली होती. त्याचवेळी अशांना ठेचले असते तर सातार्यात आज अग्निशस्त्रे नावाला शिल्लक राहिली नसती. परंतू आजतागायत जिल्ह्यात साडेतीनशे पेक्षा जास्त अग्निशस्त्रे असल्याचे बोलले जात आहे. या अग्निशस्त्रांचे कनेक्शन यापूर्वी दाभोलकर हत्येसोबत असल्याचे सिद्ध झाले आहे. अशातच काल नालासोपार्यातील छाप्यानंतर सातार्यातील सुधन्वा गोंधळेकर याचे नाव समोर आल्यामुळे सातार्यातील सनातन चा स्लिपर सेल अजून एक्टिव आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
सनल एडमार्कु अजूनही मृत्यूच्या छायेत
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील एक मोठे नाव म्हणजे सनल एडमार्कु. डॉ. दाभोलकर आणि सनल एडमार्कुचे जिव्हाळ्याचे नाते. 2009 साली वसईतील एका चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या पायातून रक्त येतंय, म्हणून देशभरातील ख्रिस्ती लोकांनी वसईमध्ये धाव घेतली होती. मात्र सनल एडमार्कुने हे रक्तबिक्त काही नाही, हे थोतांड आहे, असे म्हणत रक्त नसून गटाराचे मूर्तीपर्यंत झिरपलेले पाणी आहे, हे सिद्ध केले होते. यानंतर सनल एडमार्कुवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले होते. मुंबईतील कॅथलिक सेक्युलर फोरम सनल विरोधात न्यायालयात गेली होती. जिवाच्या भीतीने सनल एडमार्कु आज फिनलंड येथे निर्वासित म्हणून जगत आहे. नरेंद्र दाभोलकरांनी 16 ऑगस्ट 2013 रोजी सनलशी संपर्क साधला होता व त्याला भारतात येण्यासाठी गळ घातली होती. तसेच तुझ्या सुरक्षेची हमी मी घेतो, असा शब्दही दिला होता. परंतू चारच दिवसांत म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे सनल पुरता खचला. पाठिमागे एकदा सनलशी संपर्क झाला, मात्र भारतात माझ्या जिवितास धोका असल्याने मी माझे कार्य फिनलंडमधूनच चालवणार, असे सांगण्यात आले होते. येत्या २० ऑगस्टला दाभोलकर हत्येला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. सनातनच्या वाढत्या कारवायांमुळे सनल एडमार्कुलाही मृत्यूच्या भीतीमुळे आपले जीवन फिनलंडमध्येच जगावे लागत आहे. मात्र आपल्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशात राहणाऱ्या सनलला भारतात परत आल्यानंतरची सुरक्षेची हमी हे शासन का घेत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |