01:43am | Apr 01, 2020 |
सातारा : कोरोना (कोविड-19) प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात लॉक डाऊन जाहीर झाला आहे. तसेच सातारा जिल्हाधिकारी यांनीही जिल्ह्यात जमाव व संचारबंदी आदेश पारित केला आहे. असे असतानाही काही लोक याचे उल्लंघन करुन बंदोबस्तावर असणार्या पोलिसांशी विनाकारण वाद व हुज्जत घालत आहेत. यापूर्वी अनेकांना प्रेमाने समुपदेशन करण्यात आले आहे. मात्र यापुढे पोलिसांशी हुज्जत घातल्यास थेट संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी अनिश्चित काळासाठी लॉक डाऊन जाहीर केले आहे. सातारा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कलम 144 नुसार जमाव व संचारबंदी आदेश पारित केलेला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित 2 रुग्ण आढळले असून जिल्ह्याच्या सीमेला लागून असणार्या पुणे व इस्लामपूरमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असताना सातारा जिल्ह्यातील लोक मात्र आम्हाला काहीच होत नाही, अशा भावनेतून जमावबंदीच्या आदेशानंतरही फिरताना दिसून येत आहेत. तसेच दोनच दिवसांपूर्वी सातार्यात भाजीपाल्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. त्यामुळे जमाव व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन होतच आहे. तसेच कोरोना संसर्गाचा धोकाही यानिमित्ताने उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी यापुढे विनाकारण रस्त्यावर फिरल्यास आता थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. काही आरोग्यप्रेमी नागरिक कोरोना संसर्गाचा धोका असतानाही आपले आरोग्य धोक्यात घालून मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांनीही आपला जीव सुरक्षित असेल तरच आपण भविष्यात मॉर्निंग वॉक करु शकू. थोडे दिवस मॉर्निंग वॉक नाही केले तर काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे मॉर्निंग वॉकवाल्यांनी आपल्या कुटूंबियांसमवेत घरातच होम क्वारंटाईन व्हावे. काही नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच काहीजण आपल्या पाळीव जनावरांना घेवून रस्त्यांवर फिरत आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकार्यांनी यांना आतापर्यंत प्रेमाने सांगून त्यांचे समूपदेशन केले आहे. मात्र यापुढे कोणालाही प्रेमाने सांगितले जाणार नाही. तसेच पोलिसांशी हुज्जत वा वाद घातल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही सातपुते यांनी नियमाची पायमल्ली करणार्या लोकांना दिला आहे.
धार्मिक कार्य, विधी घरातच पार पाडा !
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोका असताना काही लोक धर्माच्या नावाने स्तोम माजवून कायद्याची पायमल्ली करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून पुढच्या महिन्यात येत असलेल्या रमजान ईद, हनुमान जयंती, रामनवमी या दरम्यान लोकांनी आपल्या घरातच राहून धार्मिक कार्य, प्रार्थना, विधी घरातच पार पाडाव्यात. यापूर्वी घराच्या छतावर प्रार्थना करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही लोकांनी यातून काही बोध न घेतल्यास संबंधितांवर यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम पोलीस अधीक्षक सातपुते यांनी नियम मोडणार्या ‘कोडग्या’ लोकांना दिला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |