01:35am | Mar 05, 2020 |
कराड : शिक्षण घेऊन पदवी मिळवणे महत्वाचे नसून कौशल्यावर आधारित शिक्षण संपादन करणे आवश्यक आहे. शिक्षणातून माणुसकीचे दर्शन घडून गावाचा विकास साधता आला पाहिजे, असे प्रतिपादन त्रिशक्ती फ़ौडेशन, पुणे व विजय दिवस समारोह समिती, कराडचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी कराड येथील शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील एका कार्यक्रमात केले.
शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा महाविद्यालयीन स्तरावरील ‘पदवी’ प्रमाणपत्र वितरण 2020 हा बुधवारी दि. 4 मार्च रोजी संपन्न झाला. त्यावेळी कर्नल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विशेष उपस्थिती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र थोरात यांची होती तर अध्यक्षस्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे सहसचिव (अर्थ ) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी भूषवले.
या समारंभाचे औचित्य साधून शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कराडचाही ‘पदवी’ प्रमाणपत्र वितरण समारंभ उपरोक्त समारंभावेळी संयुक्तपणे उत्साहात संपन्न झाला. पुढे बोलताना कर्नल संभाजीराव पाटील म्हणाले, समाजातील अंधश्रद्धा, गरिबी व आळस झटकून टाकण्यासाठी महात्मा फुले, बापुजी साळुंखे, गाडगे महाराज यांनी शिक्षणाची दारे खेडोपाडी, डोंगराळ, दुर्गम अशा ग्रामीण भागात खुली केली. विद्यार्थ्यांनी शिस्त, शिष्टाचार व वागण्याची पद्धती सुधारली पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ म्हणाले, शिक्षणातून विद्यार्थी घडावा आणि त्याच्यात चैतन्य निर्माण व्हावे. स्वतःमधील परमेश्वर ओळखून स्वतःचा विकास साधता आला पाहिजे. जगणे सुंदर करण्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत.त्यासाठीच बापुजी साळुंखे यांनी सुसंस्काराला महत्व दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उप प्राचार्य अधिकराव कणसे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार व प्रा. टी. एम. आतार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सुरेश काकडे यांनी मानले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दयानंद कराळे, प्रा. दिलीपकुमार मोहिते, गुरुदेव कार्यकर्ते, स्नातक, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |