06:48pm | Aug 03, 2018 |
सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा महसूल विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणार्या तेटली, ता. जावली येथील बोगस सातबारा प्रकरणामुळे सातारा महसूल विभाग चर्चेत आला होता. मात्र, ज्या तहसिलदारांच्या अखत्यारित हे बोगस सातबारा प्रकरण झाले, अशा निष्क्रिय जावली तालुका तहसिलदार रोहिणी आखाडे यांचा सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी उत्कृष्ठ तहसिलदार पुरस्कार दिल्यामुळे जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कुठे तरी मोठ्या प्रमाणावर पाणी मुरतंय, या शंकेला आधार मिळत आहे.
तेटली, ता. जावली येथे बोगस सातबारा तयार करुन त्याद्वारे शासनाच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ‘सातारा टुडे’ ने उजेडात आणले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. तसेच राजकीय, सामाजिक व महसूल विभागातीलही काही लोकांचा या प्रकरणात सहभाग असल्याबाबत ‘सातारा टुडे’ ने वार्तांकन केले होते. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या दोन्ही यंत्रणांनी हाच धागा पकडून तपास केल्याने अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या. तेटली, ता. जावली, जि. सातारा येथील सर्व्हे नं. 104/2, 109/4 मधील पैकी जमीन 1 हेक्टर 10 आर, 60 गुंठे, 87 गुंठे असे सर्व्हे नंबर अस्तित्वात नसताना त्या सर्व्हे नंबरचे बनावट ऑनलाईन सातबारे अस्तित्वात आणून त्या आधारे सातारा येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर, त्यांची पत्नी व मुलाच्या नावे बनावट साठेखत व खरेदीपत्र तयार करुन त्यांच्याकडून या व्यवहारासाठी 20 लाख रुपये घेतल्याची फिर्याद श्रीधर कंग्राळकर व त्यांच्या कुटूंबियांनी 29 जानेवारी रोजी मेढा पोलीस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणाचा तपास सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. त्या अनुषंगाने सातारा गुन्हे शाखा व मेढा पोलिसांनी संयुक्तरित्या या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर नितीन भानुदास काळे (वय 34, रा. सैदापूर, ता. जि. सातारा), दिलीप भुवाल सहाणी (वय 27, रा. सैदापूर, सातारा), भरत नामदेव सूर्यवंशी (वय 32 रा. लांडेवाडी, औध, ता. खटाव, जि. सातारा), राहुल आनंद धनावडे (वय 28, रा. विवर, ता. जावली, जि. सातारा), संभाजी रावसाहेब घाटगे (वय 57 रा. सैदापूर, ता. जि. सातारा), सारिका राजेंद्र जाधव (वय 37 रा. आंबवडे खु. ता. जि. सातारा) संतोष काशिनाथ मालुसरे (रा. फुरुस, ता. जावली), एकनाथ देवजी मालुसरे (रा. केळघर तर्फ सोळशी, ता. जावली) यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आल्यानंतर बोगस सातबारा तयार करणे, त्याद्वारे त्याचे दस्तावेज अस्तित्वात आणल्या प्रकरणी व बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात भादंवि 420, 465, 466, 467, 468, 471, 472, 120 ब सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66, 66 क, 66 ड या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील सर्व संशयित सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र, तेटली बोगस सातबारा प्रकरणाचा तपास सध्या थंडावलेला आहे. यातील बडी धेंडे अद्याप खुलेआम वावरत आहेत. जिल्हा प्रशासनालाही या प्रकरणात प्रथमपासूनच ‘इंटरेस्ट’ नसल्यामुळे यातील बडी धेंडे मोकाट आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणात खोलात जावून तपास करावा लागणार आहे. तपास केल्यानंतरच याची व्याप्ती किती मोठी आहे, हे लक्षात येणार आहे.
जावली तहसिलदारांची भूमिका या प्रकरणात प्रथमपासूनच संशयास्पद असल्याचे वार्तांकन ‘सातारा टुडे’ ने वेळोवेळी केले आहे. मात्र जिल्हाधिकारी सातारा यांनी जावली तहसिलदार यांना पाठिशी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे निश्चितच संशयाला वाव मिळत आहे. ऑनलाईन सातबारा पोर्टल तयार व देखभालीचे काम एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर) कडे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय आदी कार्यालयांच्या ऑनलाईन पोर्टल व माहिती तंत्रज्ञान विषयांच्या संगणक प्रणालींचे काम एनआयसीकडे असते. असे असताना जावली तहसिलदारांच्या गळ्याला बोगस सातबारा प्रकरणाचा फास बसल्यानंतर आपल्या गळ्यातील साप दुसर्याच्या गळ्यात घालण्यासाठी जावली तहसिलदारांनी जावली तालुक्याचे ऑनलाईन पोर्टल हॅक झाल्याचा कांगावा करीत त्याबाबतची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दिली होती. जी एनआयसी पंतप्रधान कार्यालयापासून राष्ट्रपती कार्यालयांच्या संगणक प्रणालींची देखभाल व दुरुस्ती करीत असते. अशा एनआयसीवरच जावली तहसिलदारांनी संशयाची सुई फिरवत ऑनलाईन सातबारा पोर्टल हॅक झाल्याचा कांगावा करुन आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. एनआयसीने तयार केलेले पोर्टल्स शक्यतो कोणी हॅक करण्याच्या भानगडीत पडत नाही, एवढे अभेद्य सुरक्षा कवच एनआयसीच्या पोर्टलला असते. जावली तहसिलदारांच्या मते जर एनआयसीचे पोर्टल हॅक होत असेल तर नक्कीच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जावली तहसिलदार रोहिणी आखाडे यांना ताब्यात घ्यावे व त्यांची सखोल चौकशी करावी, त्यामुळे यामधील सत्य बाहेर निघण्यास मदत होणार आहे.
तेटली बोगस सातबारा प्रकरणाचा तपास सातार्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण कडे आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तहसिलदार कार्यालयातच काम करणार्या डाटा एन्ट्री ऑपरेटरने डी सी डोंगल (डिजिटल सिग्नेचर) क्रॅक करुन त्याचे क्लोन केले व त्याद्वारे जावली- महाबळेश्वर तालुक्यातील शेकडो एकर जमिनींचे बोगस सातबारे तयार केले आहेत. या सर्व गोष्टी जावली तहसिलदार यांना माहित होत्या. परंतू त्यांचा ‘इंटरेस्ट’ संपल्यानंतर त्यांनी हा साप सातार्यातील एका बिल्डरच्या गळ्यात सोडला. ‘सातारा टुडे’ने हे प्रकरण धसास लावले. मात्र, सातारा जिल्हाधिकारी यांनी या गोष्टिला फारसे महत्त्व दिले नाही. या संदर्भात उप जिल्हाधिकारी महसूल यांच्या अधिपत्याखाली चौकशी समिती नेमण्यात येणार होती. मात्र कुठे माशी शिंकली ते कळाले नाही, परंतू जिल्हाधिकार्यांची ही घोषणा हवेत विरुन गेली. महसुलातील एकही अधिकारी या संदर्भात जबाबदारी घेण्यास तयार नाही. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा पेपरलेस डिजिटल इंडिया या योजनेला हरताळ फासण्याचे काम सातारा महसूल विभागाने केलेले आहे. सातारा जिल्हाधिकार्यांनीही चोरालाच ओझे उचलण्यास सहकार्य केले आहे, असे सकृतदर्शनी दिसून येत आहे. तेटली, ता. जावली बोगस सातबारा प्रकरणी खरेतर जिल्हाधिकार्यांनी जावली तहसिलदारांचे निलंबन करुन खोलात जावून तपास करायला हवा होता. मात्र, ज्या तहसिलदारांवर संशयाची सुई फिरत आहे, अशा तहसिलदारांना जिल्हा ग्रामीण स्तरावरील बेस्ट तहसिलदार पुरस्काराने गौरविण्यात आल्याने ‘कुठे तरी पाणी मुरतंय’ या शंकेला वाव मिळाला आहे.
अमीर नॅन्सींच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात
सुमारे तीस वर्षापूर्वी मुंबई येथील बिल्डर अमीर नॅन्सी याने रेंगडीवाडी, ता. जावली येथे मोठ्या प्रमाणावर स्थानिक शेतकर्यांकडून जमिनी खरेदी केल्या होत्या. तसेच त्या जमिनी व्यवसायिक बिगरशेती (कमर्शिअल एनए) केलेल्या होत्या. त्याच जमिनींवर महाबळेश्वरमधील पहिले फाईव्ह स्टार रेसॉर्ट उभारण्यात आले होते. तसेच त्या जमिनी मुंबई, पुणे व आखातातील धनदांडग्यांना विकलेल्या होत्या. मात्र, बर्याच लोकांनी येथील जागेचा व्यवसायिक बिगरशेती कर न भरल्यामुळे या जमिनी जिल्हाधिकारी सातारा यांच्या नावावर झालेल्या होत्या. तशा नोंदी सातबार्यावर झालेल्या आहेत. असे असताना रेंगडेवाडी येथील नारायण बेलोशे व पुणे येथील शिवाजी पाडळे या दोघांनी संगनमत करुन स्वत:च्या तीन गुंठे जागेवर बेकादेशीर बांधकाम करुन जिल्हाधिकारी सातारा यांची सुमारे चाळीस गुंठे जमीनीला तार कंपाऊंड घालून त्याचा व्यावसायिक वापर केला आहे. याबाबतची तक्रार जयपाल महादेव भोसले, रा. निंबळक, ता. फलटण यांनी दि. 8 एप्रिल 2015 रोजी सातारा प्रांतांकडे लेखी पत्राद्वारे केलेली होती. याबाबत सातारा उपविभागीय कार्यालयाकडून तहसिल जावली यांना अहवाल पाठविण्याबाबतचे पत्र देण्यात आलेले होते. मात्र, तत्कालीन तहसिलदार रणजित देसाई यांनी संबंधितांकडून ‘मलिदा’ हाणून चुकीचा अहवाल सातारा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविला होता. परंतू तक्रारदार यांनी हरकत घेतल्यानंतर पुन्हा याबाबतचे पत्र जावली तहसिलदार यांना पाठविण्यात आले. परंतू विद्यमान तहसिलदार रोहिणी आखाडे यांनी संबंधित तक्रारीकडे कानाडोळा करुन प्रकरण दाबण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठी डिलिंग झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |