शाळेत असताना आजपावेतो पत्र लिहिण्याचा अनेकदा प्रपंच केला. मात्र अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या अब्राहम लिंकन यांच्या पत्रांची सर आमच्या पत्रांना कधी आली नाही. किंबहुना अब्राहम लिंकन यांच्याच पत्राने शालेय विद्यार्थ्यांसह मास्तरांच्याही डोक्यात घर केले असावे. सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रांची किंमत अल्प झाली आहे. तारांपासून व्हॉटसअॅपपर्यंतचा प्रवास करणारा समाज प्रगल्भ होत आहे. परंतु या सोशल मीडियाच्या जमान्यातही साताऱ्यातील ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना न्यायापासून वंचित राहिलेल्या आपल्या पत्नीच्या वेदनांची जाणीव करुन देणारे पत्र लिहून चक्क न्याय देण्याची कैफियत त्यांच्या दरबारात मांडली आहे.
स्वातंत्र्यपूर्व भारतामधील पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाचे वारे वाहत होते. दक्षिण आणि उत्तर सातारा जिल्हा औद्योगिकीकरणामुळे सोनियाचे दिवस अनुभवत होता. त्यावेळी किर्लोस्कर, कूपर आणि कल्याणी या कुटुंबियांनी पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाचा पाया रचला. ओगलेवाडीपासून सातारारोडपर्यंत औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. मुंबई इलाख्याचे पहिले मुख्यमंत्री सर धनजीशा कूपर यांनी सातारा शहरानजिकच्या सातारारोडमध्ये औद्योगिकतेचे रोपटे लावले होते. या रोपट्याचा बघता - बघता वटवृक्ष झाला. धर्माने पारशी असूनही माणुसकीची नैतिकता बाळगणारे कुटुंब म्हणजे साताऱ्यातील कूपर कुटुंब (या कुटुंबाच्या कर्तृत्वाचा धांडोळा घ्यायचा झाल्यास दिवसरात्रही पुरणार नाहीत). एकेकाळी साने गुरुजी, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ज्योत्याजीराव फाळके आणि ग. दि. माडगुळकर यांच्यापर्यंत जी सामाजिक समता, समताप्रधान समाजनिर्मिती अशा पद्धतीची सत्यशोधक समाज चळवळ राबविली गेली, त्याला पाठबळ देण्याचे काम कूपर कुटुंबियांनी केले. गेल्या शतकभरामध्ये या कुटुंबियांनी हा वसा अव्याहतपणे सुरू ठेवला आहे. परंतु कायद्यासमोर सर्वचजण गाढव असतात, मात्र कायदा गाढव नाही. त्याची अंमलबजावणी करणारे कधीकधी गाढवासारखे वागतात. या गाढवांसाठीच हापत्रप्रपंच साताऱ्यातील ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केला आहे. या संबंधातील गोषवारा खाली देत आहोत. कूपर यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबरदस्त दंड व शिक्षेची तरतूद करण्यासाठी आपण प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पुरातन, जुन्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो व त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. (संदर्भ : इकॉनॉमिक्स टाइम्स, ई-पेपर, दि. २१.०८.२०१९) यामुळे स्वत:ची कोणतीही चूक नसताना अपघातास बळी पडणाऱ्यांना निश्चितपणे न्याय मिळेल व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अटकाव बसेल, याची मला खात्री आहे. नवीन उपाययोजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली गेल्यास अपघाताला बळी पडणाऱ्या निरपराध लोकांच्या वेदना, दु:ख काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल व भीषण अपघाताच्या प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा करूया! अशा प्रकारे दु:ख व वेदना भोगत असलेल्यांचे एक उदाहरण या निमित्ताने मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आणि या वेदना आजही माझी पत्नी महारुख कूपर वयाच्या ७२ व्या वर्षीही दररोज भोगत आहे. १९ ऑक्टोबर २००८ रोजी पुण्यातील महात्मा गांधी मार्गावर वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवित, भरधाव वेगाने व अत्यंत हलगर्जीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या विश्वजीत राजेश मिश्रा या वाहन चालकाने एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या माझ्या पत्नीला जोरदार धडक दिली. वास्तविक पाहता तिची काहीही चूक नव्हती. मिश्रा हा त्याच्या मित्रांची मोटारसायकल चालवत होता. कॅम्प भागातील स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिच्या चालकाने तक्रार नोंदविली होती. या अपघातात माझ्या पत्नीचे पाय अतिशय वाईट प्रकारे मोडले गेले, फॅक्चर झाले होते. तिला संचेती हॉस्पिटलमध्ये अनेक महिने दाखल केले होते. परिणामी, आम्हाला फार मोठा वैद्यकीय खर्च सहन करावा लागला. मात्र, आज या घटनेस १० वर्षे झाली तरीही ती अद्याप पूर्णपणे पूर्ववत बरी झाली नाही. आजही तिला दररोज त्याच्या वेदना, दु:ख सहन करावे लागत आहे. अजूनही ती पूर्वीप्रमाणे चालू शकत नाही.
पोलिसांनी भा. दं. वि. कलम २७९ (भरधाव वेगाने वाहन चालविणे), ३३७ (दुसऱ्याला इजा करून त्याच्या जिवाला धोका निर्माण करणे किंवा त्याची सुरक्षितता धोक्यात आणणे) आणि ३३८ (जिवाला धोका निर्माण करणारी किंवा गंभीर इजा करणारी कृती करणे) तसेच, मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७ अन्वये केस नं. ६०४३५३/ २००८ ने तक्रार दाखल केली. मोटारसायकलस्वारास अटक करण्यात आले व त्याला सोडून देण्यात आले. मोटार वाहन कायद्यान्वये दाखल झालेल्या केसच्या एकाही सुनावणीस वारंवार नोटिसा पाठवूनही तो हजर झाला नाही. त्याने प्रतिसाद द्याावा म्हणून खूप प्रयत्नही केले होते. मला खात्री आहे, हजारो किरकोळ रस्ते अपघातास बळी पडणाऱ्याकडे हे सर्व करण्याइतपत पुरेशी साधनसामग्रीही नसते. या प्रकरणातील सर्वात चीड आणणारा प्रकार म्हणजे भा. पो. वि. अन्वये गुन्हा दाखल केला असतानाही लोकअदालतमध्ये आम्हाला कोणतीही सूचना न देता किंवा अपघातातील व्यक्तीस किंवा तक्रार करणाऱ्यांना कल्पना न देता केस एकतर्फी निकालात काढण्यात आली. २०१२ मध्ये जेव्हा हे समजले तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. इतकेच नव्हे तर, वरिष्ठ न्यायालयात या निर्णयास आव्हान देण्यासाठी न्यायालयीन निर्णयाची प्रत आम्हाला उपलब्ध झाली नाही. वूâपर यांनी या प्रकरणाशी निगडीत कागदपत्रे पत्रासोबत जोडली आहेत. दोषी मोटारसायकलस्वाराला शिक्षा होण्यासाठी मंत्री महोदयांनी योग्य ती पावले टाकावीत आणि पुन्हा अपघात करण्यासाठी अशांना मोकाट सोडू नये, अशी मागणीही केली आहे. कूपर हे जगप्रसिध्द उद्योजक आहेत. त्यांच्या उद्योगामुळे सातारा जिल्ह्याची ओळख ही सातासमुद्रापार आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या उद्योजकाचा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्याच तळपायाची आग मस्तकात जाते. बेमुर्वतखोर यंत्रणेमुळे आजपर्यंत पीडितांना शस्त्रे हातात घ्यायला लागली. ज्यावेळी कायदा कुचकामी होतो, त्यावेळी लोकांना कायदा हातात घ्यावा लागतो. कूपर कुटुंबियांची कायद्यासमोरची अपरिहार्यता या पत्राच्या निमित्ताने समोर आलेली आहे. कूपर यांच्याप्रमाणेच या देशातील अनेकजण आपल्या आप्तांना अपघातामध्ये गमावल्याची किंवा कायमचे अपंगत्व आल्याची वेदना दररोज छातीशी कवटाळून आलेले दिवस ढकलत असतात. भारतामधील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी बोलणे थोतांड भक्तांच्यादृष्टीने महापाप आहे. बाहेरच्या देशामध्ये फिरत असताना भारतामध्ये आपला जन्म झाला, हे आपले सुदैव की दुर्दैव असा प्रश्नही निर्माण होतो. राफेल विमान बनवायला निघालेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला वीस वर्षे झाली, सातारा - पुणे रस्ता तयार करता आला नाही. जगातील सर्वात निकृष्ट दर्जाच्या महामार्गावरुन प्रवास करतानाचा टोल मात्र द्यावा लागतो. हे केवळ भारतातच घडू शकते. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यावरील अपघात अगदीच नगण्य, असा सत्ताधाऱ्यांचा होरा आहे. किडे-मुंग्या मरावेत अशा पद्धतीने देशाच्या रस्त्यावर अपघात होवून लोक मरताहेत. मात्र प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही. दंड वाढवण्यापेक्षा, वाहन चालविताना दंडाची आकारणी करण्यापेक्षा रस्ते चांगले करा. पुरातन वाहन कायद्यात दुरुस्ती करुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबर शिक्षेची तरतूद करा. परंतु त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी करण्याची तसदीही घ्या. अशाप्रकारचे आवाहनही ज्येष्ठ उद्योजक फरोख कूपर यांनी आपल्या पत्राद्वारे नितीन गडकरी यांना केलेले आहे. मात्र, गडकरींसह त्यांची टीम महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहे. साताऱ्यातील ज्येष्ठ उद्योजकांनी लिहिलेले हे पत्र गडकरींपर्यंत पोहोचते की नाही, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी हेच पत्र अब्राहम लिंकनप्रमाणे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी गडकरींना लिहिले असते तर गडकरींनीच काय, नरेंद्र मोदींनी त्याची तत्काळ दखल घेतली असती. परंतु या देशात सर्वसामान्यांना किंमत नाही. त्याची जागा डस्टबीनच. परंतु साताऱ्याला औद्योगिकीकरणामध्ये सोनियाचे दिवस दाखविणाऱ्या सर धनजीशा कूपर यांच्या थेट वंशजाने आपल्या कैफियतवजा पत्रामुळे कूपर यांच्याच नव्हे, तर समस्त सातारकरांच्या भावना गडकरींपर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात, अशी अपेक्षा बाळगावी का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
- संग्राम निकाळजे
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |