सातारा : येत्या डिसेंबरमध्ये मुदतपूर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा घाट केंद्र सरकारने घातलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे गणित यंदा बिघडणार नाही, याची काळजी राष्ट्रवादी सुप्रिमो घेत आहेत. सातारा लोकसभा उमेदवारीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. त्यामुळे सातार्यात दहिहंडीत राडा घालणार्या प्रवृत्ती घुसल्या होत्या. परंतू राडा झालाच नाही. त्यामुळे न फुटलेल्या दहिहंडीचा वचपा गणेशोत्सवात काढला जाणार असल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
गेल्या काही वर्षामध्ये सातारा जिल्ह्यातील राजकारण भलतेच टोकदार झाले आहे. यापूर्वी सातार्याचे राजकारण एवढे टोकदार कधीच नव्हते. एकमेकांबद्दलचा राजकीय जिव्हाळा नसला तरी वैयक्तिक जिव्हाळा जपला जात होता. पक्षाचे जे मत असेल तेच मत त्या राजकीय पुढार्याचे असायचे. शेवटी पक्षनिष्ठा महत्त्वाची होती. वैयक्तिक स्वार्थ कधीच पक्षप्रेमामध्ये बाधा आणीत नव्हता. परंतू सध्या एकाच पक्षात राहून एकमेकांची ‘जिरवण्याची’ खुमखुमी वाढीस लागली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षातील सातारा जिल्ह्याचे वातावरण गढूळ झाले आहे. परस्परांमधील स्नेहभाव कमालीचा दुरावला गेला आहे. भाषांमध्ये एकमेकांविषयी ‘टणात्कार’ वाढीस लागला. महत्त्वाकांक्षा पराकोटीला पोहोचल्या. 'पती मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे', अशी प्रवृत्ती वाढीस लागल्यामुळे सातार्यातील राजकीय परिस्थिती स्फोटक बनलेली आहे.
सातारा म्हटले की, कंदी पेढे आणि सातारचे दोन महाराज, अशी परिस्थिती पूर्वी होती. 2005 सालच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये सातारच्या राजघराण्यांमध्ये ऐतिहासिक मनोमिलन झाले. तने जोडली गेली, परंतू मने दुभंगलेलीच असल्याचे वेळोवेळी पहायला मिळाले. घराघरांत भांडणे लावून सत्तेची चव चाखण्याची बारामतीकरांची जुनी खोड आहे. राज्यातील अनेक राजकीय घराण्यांमध्ये मुलगा-वडिलांचा, भाऊ-भावाचा हा स्नेहभाव बारामतीकरांनी कधीच राखू दिला नाही, हे शाश्वत सत्य आहे. सुमारे 9 वर्षे राजकीय विजनवासात काढल्यानंतर 2009 ला श्री. छ. उदयनराजे यांचा राजकीय विजनवास संपला. सातारच्या थोरल्या गादीचा वारसदार दिल्लीच्या संसदेत गेल्यामुळे शिवछत्रपतींच्या राजघराण्यावर प्रेम करणार्या अनेकांना हायसे वाटले. परंतू मतदारसंघ पुनर्रचनेत 'उपरे' व्हावे लागलेल्या अनेकांना यानिमित्ताने पोटशूळ सुरु झाला. सातारचे दहा वर्षे टिकलेले ऐतिहासिक मनोमिलन गेल्या नगरपालिका निवडणुकीत दुभंगले. त्यामुळे सातार्यात पुन्हा एकदा जुना थरार सातार्यातील जनतेला पहावयास मिळाला. निमित्त होते आनेवाडी टोलनाक्याचे. परंतू टार्गेट होते खा. उदयनराजे. खा. उदयनराजेंची आर्थिक कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी सुप्रिमोंनी चाल खेळली. त्याला फलटणकरांनी साथ दिली. खा. उदयनराजेंची आर्थिक कोंडी केल्यानंतर हा माणूस सरळ होईल, असा ढोबळ मनाने अर्थ संबंधितांनी काढला असावा. परंतू मोडेल पण वाकणार नाही, हा वकूब ठायी असणार्या खा. उदयनराजेंनी थेट आनेवाडी टोलनाक्यावर धडक दिली. यानंतर झालेला राडा सर्वश्रुत आहे.
सोना ऍलाएज खंडणी प्रकरण, सुरुची राडा प्रकरणांमुळे जिल्हा ढवळून निघाला. एवढी प्रकरणे होवूनसुद्धा खा. उदयनराजेंची गढी अभेद्य असल्यामुळे मराठा मोर्चाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 24 जुलै रोजी फलटणमधून सुमारे शेकडो गुंडांची फौज दाखल झाली होती. ती का ? आणि कशासाठी ? आली होती, हे पोलिसांना चांगलेच माहित आहे. सातार्यातील मराठा मोर्चा दिवशीच खा. उदयनराजे पुण्यात गेले व तेथील मोर्चात ते सामील झाल्यामुळे फलटणमधून आलेल्या त्या टोळधाडीचे मिशन 'फेल' झाले. त्यामुळे सातार्यात आज सर्वकाही आलबेल आहे. परवा शहरात झालेल्या दहिहंडीमध्ये घुसून काहीजणांनी आपापल्या नेत्याच्या घोषणा दिल्या, जयजयकार केला. त्यामुळे दोन्हीवेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातार्यात अशांतता पसरविण्यासाठी काही बाह्य शक्ती सक्रिय झालेल्या आहेत. त्यामुळे येणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातार्यात राडा होणारच, अशी शक्यता गृहित धरुन सातारा पोलिसांना सजग व्हावे लागणार आहे. 'इंटिलिजेन्स' बरोबर राजकीय पुढार्यांच्या मागेपुढे फिरणार्या पिलावळींच्या कुंडल्या आणि भानगडी बाहेर काढून त्यांची तडीपारी केली तरच येणार्या काळामध्ये सातारा शांत राहणार आहे.
... आता गणेशोत्सवात नको
सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. या उत्सवाला दहिहंडीप्रमाणे गालबोट लागणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घ्यायला हवी. सध्या सणासमारंभात घुसखोरी करुन तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, हे सातारकरांना आता कळायला हवे. त्यामुळे हा गणेशोत्सव सातारकरांना आनंदाचा जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
- संग्राम निकाळजे
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |