07:31pm | Oct 27, 2019 |
सातारा : परवा झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा कोणाला स्वप्नातही वाटला नसावा असा पराजय झालेला आहे. या पराभवानंतर एक्झिट पोलसह अनेक राजकीय विश्लेषकांनाही तोंड फोडून घ्यावे लागले. सातारा जिल्ह्यातील मतदारांना गृहित धरण्याची चूक उदयनराजेंसह त्यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी केलेली आहे. या निर्णयाचा फटका उदयनराजेंना सव्याजासह बसलेला आहे. परंतू विजयानंतर राष्ट्रवादीने उन्माद न दाखवता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था कशा शाबूत राहतील याकडे जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. यापक्षी उलट भाजपसह उदयनराजेंच्या गोटात स्मशान शांतता पसरली आहे. वादळा अगोदरची शांतता जशी असते अगदी तशी. परंतू ते उदयनराजे आहेत. त्यांच्या भावनांचा कडेलोट कोणत्याही क्षणी होवू शकतो. त्यामुळे उदयनराजेंच्या अवतीभोवती असणार्या अनेक चिकटपट्टूंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लोकसभेच्या सतराव्या निवडणुकीत उदयनराजेंना गळाला लावण्यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली होती. यात भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राचे मुकूटमणी तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आघाडीवर होते. उदयनराजे आपल्याबरोबर आले तर आगामी विधानसभा निवडणुका आपण आरामात जिंकू, असा फाजील आत्मविश्वास चंद्रकांत पाटील बाळगून होते. परंतू लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आपल्या निवडक सहकार्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून नक्की कोणत्या पक्षातून लढायचे, याबाबत चाचपणी करायला सुरुवात केली होती. कोणी भाजपचा, तर कोणी राष्ट्रवादीचा सूर आळवला. शेवटी रिस्क नको म्हणून उदयनराजेंनी राष्ट्रवादीतून लढण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील आमदारांसह स्थानिक पुढार्यांचा विरोध असतानाही शरद पवारांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. उदयनराजेंचे राष्ट्रवादीचे तिकिट जाहीर होताच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले माजी आ. तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एका दिवसात भाजपमधून कोलांटउडी घेत मातोश्रीवर जावून हाती शिवबंधन बांधले. कॉलर विरुद्ध मिशी, अशी लढत सातार्याच्या लोकसभेच्या आखाड्यात झाली. परंतू उदयनराजेंसमोर सेना-भाजपची प्रचारयंत्रणा म्हणावी इतकी प्रबळ ठरत नव्हती. तरीही उदयनराजेंना पाटण, कराड उत्तर-दक्षिण येथे असलेल्या विरोधाच्या जोरावर नरेंद्र पाटील यांनी कडवी लढत दिली. परंतू निकालादिवशी उदयनराजेंनी बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या तुलनेत मात्र 2019 च्या निवडणुकीत उदयनराजेंचे मताधिक्य निम्यावर आले. वास्तविक यापासून उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी धडा घ्यायला हवा होता. सातारा जिल्ह्यातील मतदारांची नाराजी कोणत्याही पक्षावर नव्हती, तर ती फक्त उदयनराजेंवर होती. सातारा शहराचा विकास म्हणजे जिल्ह्याचा विकास नव्हे, हेही उदयनराजेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे होते. पाटण, कांदाटी खोर्यासारख्या दुर्गम भागामध्ये आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण, हेही लोकांना माहित नाही अशी परिस्थिती आहे. दुसर्या राजकीय पुढार्यांच्या तुलनेत उदयनराजे हे मनाने अगदीच मोकळे ढाकळे. जे पोटात, तेच ओठावर. मात्र उदयनराजेंच्या आजूबाजुला असलेले त्रिकुट त्यांना काही सुचून देत नव्हते. पैसा... पैसा... आणि पैसा. याच्या नादात या त्रिकुटाने उदयनराजेंना संमोहित केल्यासारखी परिस्थिती होती. महाराज... हेच खरं, असंच झालं पाहिजे यामुळेच उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत पराभव झालेला आहे. उदयनराजेंच्या पराभवाची मिमांसा खरेतर खूप मोठी होवू शकते. 2009 पासून 2019 पर्यंत उदयनराजेंना जिल्ह्यातील जनतेने डोक्यावर घेतले. परंतू काहीही कारण नसताना देशातील पहिलीच पोटनिवडणूक सातारकरांवर लादल्यानेच त्यांचा पराभव झाला. वास्तविक पवारांच्या सातार्यातील त्या पावसातील सभेमुळे लोकांची सहानुभूती त्यांना जरुर मिळाली. परंतू ही सहानुभूती कोरेगावात शशिकांत शिंदेंच्या पथ्यावर का बरे पडली नाही? एप्रिल-मे मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंच्या प्रचारासाठी माजी आ. शशिकांत शिंदेंनी जिल्हा पिंजून काढला. परंतू तीन महिन्यातच ज्या उदयनराजेंसाठी शशिकांत शिंदे मते मागत होते. तेच शशिकांत शिंदे तीन महिन्यातच त्यांना मते देवू नका, असे सांगू लागले. त्याची जबर किंमत शशिकांत शिंदेंना मोजावी लागली. लायकी नसलेला माणूस शेवटी उदयनराजेंच्या जिवावर कोरेगावातून निवडून आला. उदयनराजेंच्या विरोधात शड्डू ठोकणार्या शशिकांत शिंदेंना मात्र अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. एकमेकांना लोळवायच्या नादात शशिकांत शिंदेंसह उदयनराजेंची विकेट पडली. यात धन मात्र कोल्ह्या-कुत्र्यांची झाली. असो.
गेल्या तीन दशकांच्या राजकारणात उदयनराजेंचा प्रवास म्हणावा इतका सुसह्य राहिलेला नाही. राजकीय साठेमारीत त्यांना अनेकदा विजनवासात जावे लागले. परंतू सातारकरांची सहानुभूती त्यांना नेहमीच मिळत राहिलेली आहे. राजकीय पुढार्यांच्या फ्रेम बाहेरील इमेज उदयनराजेंची राहिलेली आहे. त्यामुळे त्यांची क्रेझ राज्यातील तरुणाईमध्ये आहे. आपल्या विशिष्ट बॉडी लँग्वेज मुळे ते अनेकांना भावतात. त्यामुळे कसलेल्या राजकारण्याची झबी त्यांच्यामध्ये कधीच पहायला मिळत नाही. यामुळेच काहीजण त्यांना अलगदपणे चिकटतात. असेच काही चिकटपट्टू गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना भेटत गेले. मूळ निष्ठावंतांना बाजूला सारुन त्यांनी जलमंदिरातील कारभार आपल्या हातात घेतला. उदयनराजेंना चॉकलेट घ्यायची म्हटली तरी हे चिकटपट्टूच त्यांना घेवून देतात. पैसा उदयनराजेंचा, मात्र मिजास चिकटपट्टूंची. या चिकटपट्टूंनीच गेल्या पाच वर्षात उदयनराजेंच्या निष्ठावंतांना जलमंदिरातून बाहेरचा रस्ता दाखवला. निष्ठावंतांची भूख कमी होती. जेवढे लागेल तेवढेच खायचे. यामुळे उदयनराजेंनाही फारशी झळ लागत नसायची. मात्र चिकटपट्टूंनी उभ्या केलेल्या मृगजळाला उदयनराजे भुलले. 1 लाख 28 हजार मते कमी पडली की काय म्हणून उदयनराजेंना भाजपात धाडण्याचा घाट घातला गेला. कल्याण रिझॉर्टला बैठकांवर बैठका झाल्या. भरीस भर म्हणून महसूलमधील चंद्रकांत पाटलांनी थेट अमित शहांपर्यंत फिल्डिंग लावली. चांगल्या चाललेल्या संसाराची एखादी सटवी जशी राखरांगोळी करते, अशा सटव्यांचा थवा चिकटपट्टूंनी उदयनराजेंच्या आजूबाजूला उभा केला. दिल्लीत जावून उदयनराजेंनी आपला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपवाल्यांनी उदयनराजे पक्षात आले म्हटल्यावर दख्खन आपलेच, अशा पद्धतीचे चित्र निर्माण केले. मात्र राज्यातील परिस्थिती झपाट्याने बदलत होती. इकडे महाजनादेश यात्रा, तर तिकडे शिवसंकल्प यात्रा चांद्यापासून बांद्यापर्यंत धडका देत होत्या. कोणताही स्टार प्रचारक नसतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मागच्या तुलनेत या विधानसभेला यश मिळवले. मात्र सातारची निवडणूक प्रतिष्ठेची करुन राष्ट्रवादीनेही पक्षांतराचा वचपा काढलेला आहे. उदयनराजेंनी चिकटपट्टूंचे ऐकून आपले फार मोठे राजकीय नुकसान करुन घेतले आहे. वेळीच अशा चिकटपट्टूंना बाजूला नाही केले तर उदयनराजेंच्या राजकीय भवितव्याचे नुकसान होणार आहे. आतापर्यंत उदयनराजेंनी वंचित सोडला तर सर्वच पक्षात आपले भविष्य शोधण्याचा प्रयत्न केला. उद्या चिकटपट्टू अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'रिपब्लिकन' पक्षातही प्रवेश करायला लावतील. यामध्ये चिकटपट्टूंचे नुकसान नाही, तर उदयनराजेंचेच नुकसान होणार आहे. उदयनराजेंच्या अवतीभोवती असलेले हे सर्व चिकटपट्टू आपल्या व्यवसायातील भरभराट वाढावी तसेच पैसा कमविण्यासाठी त्यांच्या बरोबर आहेत. वेळ आल्यावर हेच चिकटपट्टू उदयनराजेंकडे ढूंकूनही पाहणार नाहीत. त्यावेळी जुने निष्ठावंतच उदयनराजेंना साथ देतील, याबाबत साशंकता नसावी. पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठ्यांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान गार्दी ज्यावेळी अहमदशहा अब्दालीची फौज भाजून काढत होता. त्यावेळी दुसर्या प्रहरानंतर मराठे जिंकणार, गोलाईची लढाई यशस्वी होणार अशी परिस्थिती असतानाच गारद्या-पारध्यांचा विजय आम्हाला मान्य नाही, आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात काय, असे म्हणत दमाजी गायकवाड व विंचूरकरांच्या फौजांनी गोलाईचे 'कडे तोडून भगदाड पडलेल्या अब्दालीच्या सैन्यावर चाल केली. एका दमात अब्दालीने विंचूरकरांसह दमाजी गायकवाडांची फौज कापून काढली. तोफांचा मारा बंद झाल्यामुळे विखुरलेली अब्दालीची फौज मराठ्यांवर तुटून पडली. तेथून पुढचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. उदयनराजेंच्या अवतीभोवतीही असेच आधुनिक विंचुरकर, गायकवाड चिकटपट्टूंच्या रुपाने असल्यानेच सातारच्या लढाईत छत्रपतींचे दुसर्यांदा पानिपत झाले आहे. पानिपतच्या त्या लढाईतून मराठीजणांनी अद्यापपर्यंत कोणताही बोध घेतलेला नाही. परंतू परवाच्या निवडणूक लढाईमधून उदयनराजेंनी जरुर बोध घ्यावा, अशी तमाम सातारकरांची इच्छा आहे.
- संग्राम निकाळजे
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |