02:51am | Aug 27, 2019 |
कराड : पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व देश पातळीवर आपलेसे ठरणारे आहे. ते विरोधकांची भारी बांधण्यातही मागे-पुढे पहात नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात खूप मोठी कामे केली. पण त्याचा कधीही गवगवा केला नाही. बोलणे कमी आणि काम जादा अशा नेतृत्वाच्या पाठीशी कराड दक्षिणमधील जनता ठाम राहील, असा मला विश्वास आहे. पाच वर्षात तुम्ही चांगली मशागत केली आहे. पीकही चांगलेच येणार आहे. मतदारांनी ते पीक राखण्याची जबाबदारी घ्यावी. पृथ्वीराजबाबांनी केलेल्या अनेक कामाच्या उदघाटनांना मला येता आले. तुमचा विचार प्रत्येकास समजून सांगा. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय राज्यात आणि देशात दिमाखदार झाला पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाला शोभणारा विजय करा. अशी साद कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी घातली.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रेठरे बुद्रुक व कार्वे जिल्हा परिषद गटाच्या बुथ कमिटी सदस्य संवाद मेळाव्यात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, भोरचे आ. संग्राम थोपटे, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, कराड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक आप्पा माने, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, आदित्य मोहिते, राहुल चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.बाळासाहेब थोरात म्हणाले, मी या भागाला नवखा नाही. किंवा हा भाग मला परिचित नाही, असेही नाही. माझी सासुरवाडी व रेठर्याच्यामध्ये फक्त नदी आहे. परंतु नातेसंबंध व्हायच्या आधीपासून मला यशवंतराव मोहितेंमुळे रेठरे माहिती आहे. भाऊंचा डावा विचार व समाजवाद मी विध्यार्थी असल्यापासून मला आवडत होता. त्या डाव्या विचारांनी महाराष्ट्र बदलाचे फार मोठे काम केले. कार्ल मार्क्स जगाचा होता. पण आपल्या देशाचे यशवंतराव मोहिते कार्ल मार्क्स होते. 1965 ते 90 पर्यंत समाज जीवनात आमूलाग्र बदल झाला. ती एक मोठी क्रांती होती. त्या क्रांतीला डावा विचार महत्वाचा ठरला. ते म्हणाले, पृथ्वीराज बाबांसारखे नेतृत्व या मतदारसंघाने आणखी वाढवले तर त्यांच्यामुळे तुमचाही लौकिक वाढेल. येत्या निवडणुकीत त्यांना मतदारसंघात गुंतवून न ठेवता राज्यभर प्रचारासाठी पाठवा. त्यांच्या विजयाची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यावी. निवडणुकीत शुद्ध अंतःकरणाने काम करा. कॉंग्रेसमोरील हा कठीण काळ लवकरच संपेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, सध्या कॉंग्रेससमोर कठीण काळ आहे. मीही या स्थितीत प्रदेश अध्यक्ष आहे. 1980 ला इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. पुन्हा त्या पंतप्रधान झाल्या. त्याकाळात कॉंग्रेसला उमेदवार मिळत नव्हते. एकजण कंडक्टर तर एकजण पाव विकणारा कॉंग्रेसकडून आमदार झाला. त्यावेळी कॉंग्रेसची वाताहत झाली होती. पण सामान्यांच्या अंतःकरणात कॉंग्रेस असल्यामुळे हेही संकट दूर झाले. यावर कॉंग्रेस हाच उपाय आहे. यासाठी मतदारांना पुन्हा साद घाला. पक्ष सोडून जाणार्यांना जाऊ द्या. त्यांच्या रिकाम्या जागा धरा. आणि कॉंग्रेस वाढवा. नव्या रक्ताची कॉंग्रेस तयार करा. कॉंग्रेसचा शाश्वत विचार देशाला टिकवू शकतो. तो विचार कधीच संपणार नाही. विदर्भ मराठवाड्यात वातावरण बदलायला लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही बदलायला वेळ लागणार नाही. समविचारी पक्षांची बोलणी सुरू आहे. लवकरच आमची मजबूत व बळकट आघाडी होईल.
आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यशवंतराव मोहिते यांचा विचार कदापि संपू देणार नाही. येथूनपुढे विचारांची लढाई होणार आहे. विचारांच्या लढाईत कॉंग्रेस आणि यशवंतराव मोहिते यांच्या विचारांची जोपासना करा. कॉंग्रेसचे विचार जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्दीने कामाला लागावे. पूरस्थिती सरकारला हाताळता आली नाही. कोल्हापूरला पार्टटाइम पालकमंत्री आहेत. सरकारकडून हुकूमशाही व ठोकशाही आणण्याचा प्रयत्न आहे.
डॉ.इंद्रजीत मोहिते म्हणाले, येथूनपुढे प्रत्येक बुथनुसार थेट संवाद होणार आहे. या विभागातील कोणीही पळून न जाता टाचा रोवून चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी राहणार आहे. आ. संग्राम थोपटे, जयवंतराव जगताप यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कराड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, कराड शहर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदिप जाधव, कराड दक्षिण सेवादल कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, नरेंद्र नांगरे-पाटील, नितीन थोरात, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, पंचायत समितीचे सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, सदस्या नंदाताई यादव, वैशाली वाघमारे, राजेंद्र चव्हाण, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, अदिल मोमीण, प्रदेश युुवक कॉंग्रेसचे सचिव नितीन पाटील, किरण सावकार, कराड दक्षिण युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, श्रीकांत मुळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उत्तमराव मोहिते, कृष्णत चव्हाण-पाटील, दिग्विजय उर्फ आबा सूर्यवंशी यांनी स्वागत केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पाटील यांनी आभार मानले.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |