कराड : एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे लॉकडाऊन यामुळे शेतकर्यांची अवस्था दयनिय झाली आहे. हातातोंडाला आलेले पिक शेतीतच कुजत पडला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बँका, पतसंस्थासह शेती तारणावरील कर्ज भरू शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकर्यांचे शेतीतारणावरील सर्व कर्जे पंचनामे करून माफ करावीत अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आज कोरोनासारख्या रोगामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती उत्पादीत माल हा नाशवंत आहे. हा माल वेळेवर गेला तर ठीक नाहीतर तोमाल टाकून देण्याशिवाय शेतकर्यांच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही. अतिवृष्टी झाली त्यावेळी सर्वांत जास्त नुकसान शेतकर्यांचे झाले. जास्त पाऊस पडल्यामुळे शेतातील उभी पिके कुजून गेली. शेतकर्यांना नेहमी संघर्ष करावा लागतो कधी निसर्गामुळे तर कधी मानवनिर्मित संकटांमुळे आज कोरोनासारख्या रोगामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेली पाच-सहा महिने रात्री बारा वाजता पाणी पाजून, रात्रंदिवस कष्ट करून पिकविलेली द्राक्षे, केळी, टोमॅटो वांगी, गवारी, भेंडी, कलिंगड, झेंडूची फुले अशी सर्व उत्पादीत पिके आज हातातोंडाला आली असताना अचानक कोरोनासारख्या व्हायरसमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. या लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाले असून शेत शेतमालावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. यातच पिकांचे दर ढासळले, वाहतुक नसल्यामुळे शेतमाल शेतातच कुजून गेला आहे. काही शेतकर्यांनी आपली जनावरे उभ्या पिकात सोडली तर काही शेतकर्यांनी फुकट भाजीपाला व फळांचे वाटप केले. ऊसाची अवस्थाही अशीच झाली आहे. ऊस तोडायच्या कालावधीत न तोडल्यामुळे ऊसाची वजने निम्म्याने घटली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्यांनी शेती तारण ठेवून बँका पतसंस्थांकडून कर्जे घेतली आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला शेतकरी शेती तारणावरील आपली कर्जे भरू शकत नाही. तरी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने शेती तारण कर्जाचे व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांची कर्जे माफ करावीत, अशी मागणी साजिद मुल्ला यांनी केली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |