02:09am | Mar 24, 2020 |
सातारा : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्याच्या सर्व सीमा सोमवार सायंकाळपासून सील करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार जिल्ह्याबाहेरून येणार्या वाहनांना आणि जिल्ह्यातून बाहेर जाणार्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे अत्यावश्यक सेवा यातून वगळल्या आहेत.
सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी शेखरसिंह म्हणाले, सातारकरांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील जनतेचे खरोखर अभिनंदन. आता हाच जनता कर्फ्यू दि. 31 मार्चपर्यंत पाळावा. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नये. यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. मात्र, औद्योगिक क्षेत्रांना पूर्ण लॉक डाऊन करण्यास सांगितले आहे. मोठ-मोठ्या कंपन्यांची यंत्रणा मोठी असल्याने त्यांना पुरेसा कालावधी देण्यात आला आहे.
खाजगी बसेस पूर्ण बंद केल्या आहेत. केवह शासकीय कर्मचार्यांसाठी एसटीचे काही रूट सुरू ठेवण्यात येतील. मात्र, खाजगी वाहनांना पूर्णपणे बंद आहे दुचाकीस्वारांनाही रस्त्यावर वाहन घेवून जाण्यास मज्जाव केला आहे. अन्नधान्य व किरणा साहित्य, दूध असे जीवनावश्यक साहित्य आपल्या जवळपासच्या दुकानातूनच खरेदी करावे. त्याकरिता पायी चालत जावे, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या आहेत. या काळात साठेबाजी होणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेणार असून असे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शेखरसिंह यांनी सांगितले.
कंपन्या व उद्योगधंदे लॉक डाऊन होणार असल्याने या काळात कंपन्यांचे नुकसान होवू शकते. मात्र, व्यवस्थापनाने कुणालाही कामावरून काढून टाकू नये, तसेच त्यांना त्यांचे वेतन द्यावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच गंभीर परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक तेथे अन्नधान्य किंवा फूड पॅकेटस् यांचे वाटप करण्यात येईल. अशा बिकट परिस्थिीतीत जिल्ह्यातील कुणीही उपाशी राहणार नाही, याची दक्षता घेवू. गरज भासल्यास मोठ्या संख्येने क्वारंटाईन करण्याची पूर्ण तयारी झाली आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्याच्या सर्व सील करण्यात आल्या आहेत. सर्व चेकपोस्टवर पोलिस बंदोबस्त ठेवला असून जिल्ह्यात बाहेर येणार्यांना चेकपोस्टवरूनच माघारी पाठवले जात आहे तर जिल्ह्यातून बाहेर जाणार्यांनाही जिल्ह्याच्या सिमेवरून पुढे जावू दिले जात नाही. दुचाकी वाहनांना पूर्णपणे प्रतिबंध केला आहे. तसेच पेट्रोल पंपही अत्यावश्यक सेवा पुरवणार्यांसाठीच उपलब्ध होणार आहे, जेणेकरून विनाकारण फिरणार्यांवर पायबंद बसेल. तसेच किराणा साहित्य चालत जावूनच खरेदी करावे जेणेकरून आवश्यक तेवढेच साहित्य संबंधित खरेदी करेल व साठेबाजी होणार नाही, असेही तेजस्वी सातपुते म्हणाल्या.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |