03:12am | Feb 13, 2019 |
सातारा : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब गोसावी यांनी हजारो ठेवीदारांचे पैसे हडप करुन त्यांना देशाधडीला लावले. तुमचे गुण ओळखल्यानेच जनतेने तुम्हाला घरचा रस्ता दाखवला. बाळू गोसावी म्हणजे काय असामी आहे हे जनतेलाही चांगलेच कळून चुकले आहे. लिंब ङ्गाटा ते लिंब या रस्त्याचे काम आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून मार्गी लावले आहे. हे लिबं नव्हे तर पंचक्रोशीतील लोकांनाही माहिती आहे. सोक्षमोक्ष लावयला केव्हाही आणि कुठेही यायला तयार आहे. त्यामुळे गोरगबीरांना लुबाडणार्यांनी विकासाच्या ङ्गुका बाता मारु नयेत, असा टोला पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांनी लगावला.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लिंब आणि परिसरात जी काही विकासकामे झाली आहे ती ङ्गक्त आणि ङ्गक्त आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळेच झाली आहेत. गेल्या 10 वर्षात खासदार ङ्गंडातून एकही विकासकाम झालेे नाही. केवळ खासदारांच्या पत्राचे बॅनर मात्र लिंबात झळकले. प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही, हे तमाम जनतेलाही माहिती आहे. लिंब ङ्गाटा ते लिंब हा रस्ता कोणत्या योजनेतून झाला याची पुसटशी कल्पनाही नाही तर, गोसावी तुम्ही पुरावा काय देणार? जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम यांनी या रस्त्याला जिल्हा परिषदेच्या सभेत मान्यता घेतली. सदर मंजूर आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला. 2019-20 च्या जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्रामुळे आणि पाठपुराव्यामुळे या रस्त्याला 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून काम लवकरच चालू होणार आहे. आज जिल्हा परिषदेत प्रतीक कदम तर पंचायत समितीत मी आहे. आज या दोन्ही संस्थांमुळे कामे होतात, हे कधीकाळी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या गोसावींना अपेक्षेप्रमाणे माहिती नसावे.
लिंब ग्रामपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेब गोसावी आता न केलेल्या कामांचे ङ्गुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. काम कोणी मंजूर केले आणि कोणामुळे मार्गी लागले हे शासन दप्तरी नोंद आहेच आणि तमाम जनतेलाही माहिती आहे. आता निवडणूक जवळ आली आहे. बाबाराजेंनी अनेक कामे केली आहेत. आता आपण जनतेसमोर कोणता मुद्या घेवून जायचं असा प्रश्न लोकच गोसावी यांना विचारत आहेत आणि कोणताही सक्षम मुद्दा नसल्याने गोसावींची लुडबूड सुरु झाली आहे हेही जनतेला माहिती आहे. केवळ तोंड आहे म्हणून बडबड करण्याव्यतिरीक्त तुम्ही कोणते आणि काय पुरावे देणार? मी लिंब मध्येच राहतो आणि लिंबच्या चौकातही लोकांची अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो. तुम्ही शाहूपुरीत राहून राजकारणापुरता लिंबच्या जनतेबद्दल खोटा कळवळा दाखवणार. कागदोपत्री सोडा तर, झालेली विकासकामे हाच खरा जनतेसाठी पुरवा आहे. तरीही लिंबच्याच काय शाहूपुरीच्या चौकात देखील पुरावे दाखवू. केव्हाही सांगा, असेही सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे.
लिंब गाव आपले म्हणता मग, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना लिंब गावात रस्ता राहू द्या, एक खडा तरी टाकला का? याचे उत्तर द्या. तुम्ही सदस्य असताना संपुर्ण शाहूपुरी गटात काय दिवे लावले हे जनतेसमोर आहे. त्याचे ङ्गळ शाहूपुरी गटातील जनतेनेच तुम्हाला दिले आहे. आता शाहूपूरीत काहीही चालत नाही. आपल्याला काडीची किंमत नाही. त्यामुळे लिंब मध्ये लुडबूड करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा तुमचा प्रयत्न सुज्ञ जनताच हाणून पाडेल. त्यामुळे धुतल्या तांदळासारखे असाल तर खर्याला खरे म्हणायला शिका आणि मग जनतेबद्दलचा कळवळा दाखवा. लिंबची जनता ही सुज्ञ आहे. ती माझी जागृत शक्ती आहे. या जनतेसाठी मी 24 तास काम करतो आणि करतच राहणार आहे. तुमच्या सारखा निवडणूकीपुरता मी लिंबात येत नाही. जे दोन वर्षापुर्वी निवडणूकीत पराभूत झाले ते भुछत्र आता लिंब ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमुळे पुन्हा उगवले आहे. तुमच्या म्हणण्यानुसार खासदारांनी काम आणले तर, तुम्ही दोन वर्षांपासून कुठे गायब होता? तुमचे कतृत्व काय आहे हे मलाच काय जनतेलाही चांगलेच माहिती आहे. प्रथम जनहिताचे एखादेतरी काम करा आणि मग बोला. खोटी कागदे हातात नाचवून जनतेची दिशाभूल करु नका.
मी कोणाच्याही कामात लुडबूड करत नाही आणि कोणाच्या कामाचे श्रेयही घेत नाही. जी कामे करतो ती प्रामाणिकपणे आणि दर्जेदार करतो, हे जनतेसमोर आहे आणि जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे श्रेय घेण्याचे तुम्ही शिकवू नका. एकच रस्ता नाही, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून आम्ही किती रस्ते आणि किती विकासकामे केली याचे उत्तर लिंबची सुज्ञ आणि जागरुक जनताच देईल आणि याची प्रचिती आगामी निवडणूकीतही तुम्हाला येईल. ङ्गार काही बोलून मला तुमच्यासारख्या ङ्गुकटच्या गोपाळ्या मारता येत नाहीत. काही काम जमत नाही पण, किमान गोर गरिबांचे लुबाडलेले पैसे तरी परत करा, असा खरमरीत सल्ला सावंत यांनी दिला आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |