04:27pm | Jun 24, 2019 |
सातारा : काल आंधळीच्या धरणात माणच्या बांडगुळ आमदाराने दोन दिवस माण मधील लोकांना एक संदेश पाठवला. उत्तर माणच्या 32 गावांना उचलून पाणी देण्यासाठी आंधळीच्या धरणात जॅकवेलचं (पाणी पुरवठा विहीर) भूमिपुजन या कार्यक्रमासाठी बर्याच लोकांना निमंत्रित केलं होतं. मात्र ज्या बातम्या दिल्या त्यात म्हटलं की सर्वेक्षण आणि अन्वेषण या कामाचं भूमिपूजन. माण तालुक्यातील जनतेची दिशाभूल करण्याचं पाप या आमदाराने केलं आहे अशी टिका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली.
सहा इंची व्यासाची दोनशे फूट खोल बोअर मारायचं कालचं काम होतं. याचं अधिकृत कोणतंही पत्र अजून उपलब्ध नाही. पण हरकत नाही दुष्काळी भागाला कोण पाणी मागत असेल तर त्याचं कौतुक करणारी आम्ही माणसं आहे. पण जनतेची दिशाभूल करण्याचं पाप जर कोण करत असेल तर ती अतिशय चुकीचं गोष्ट आहे.
18 सप्टेंबर 2018 ला नामदार चंद्रकांत पाटील हे माणच्या दौर्यावर आले होते. त्यादिवशी 16 गावच्या पाण्याचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 14 ऑक्टोबरला नामदार चंद्रकांत पाटील हे वडगाव, बिजवडी, पाचवड या दुष्काळी दौर्यावर आले होते. या दौर्यात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी टेंभूमधून वाढीव गावांना पाणी द्यावं त्याचबरोबर माणच्या उत्तर भागाला आंधळी धरणातून उचलून पाणी द्यावं अशी मागणी केली होती. धारांनी लगेच अधिकार्यांना सुचना करुन नकाशावरुन प्राथमिक सर्वेक्षण करायचं आदेश दिले होते. असं पाणी देता येतं असा अहवाल जिहे-कटापूर व टेंभूच्या अधिकार्यांनी दिला होता. या सगळ्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न लबाड लाडगं जे ढोंग करतंय ते करत आहे. मागील नऊ वर्षात ज्यांनी कधीसुध्दा टेंभूच्या व उत्तर माणच्या पाण्याचा विषय काढला नाही ते घाईगडबडीने श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दहा हजार रुपयांच्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी कार्यक्रम घेवून माणच्या जनतेची मोठी दिशाभूल करण्याचं पाप सुरु आहे.
माझे तीन प्रश्न आहेत
ही योजना किती तारखेला मंजूर झाली?
जॅकवेलसाठी किती निधी लागणार आहे. याचं इस्टिमेट झालंय का?
प्रशासकीय मान्यता किती तारखेला मिळाली?
या सर्वेक्षणला किती निधी मंजूर केला?
या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं नाही.
याशिवाय हे सांगतायत की पाण्यासाठी मुंबईला एक मिटिंग झाली. आजपर्यंत या भामट्या आमदाराने गल्लीतील मिटींगच्या सुध्दा बातम्या केल्या. 19 जूनला मुंबईला जी बैठक झाली त्या मिटींगमध्ये काय घडलं हे का सांगितलं नाही. चोरासारखं का काम करताय, त्या मिटींगमध्ये काय घडलं हे जनतेसमोर मांडा. याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्याला या मिटींगला बोलवलं नाही असं म्हणायचं धाडस हा नालायक करतोय. भाजपच्या कार्यकर्त्यात एवढी ताकद आहे हे सगळे आमचे मंत्री आहेत ज्यावेळी मिटींग लावायची त्यावेळी आमच्या पत्रावर लावू या बांडगुळ आमदाराच्या पत्राची काय गरज आहे. नामदार चंद्रकांत पाटील, नामदार गिरीश महाजन यांना घेवून हा प्रश्न सुटला पाहिजे. नक्की माणच्या या दोन्ही भागात पाणी आलं पाहिजे या दृष्टीने प्रामाणिकपणे काम करणारी आम्ही मंडळी आहे. डाॅ. कापसेंचा कृष्णा खोरेची स्थापना करण्यात वाटा आहे त्यावेळी हे आमदार चड्डीत होतं की बनावट नोटा छापत होतं. गर्दीत दुंडा पैसा चालवायचा जो प्रयत्न चाललाय ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे.
आमची लायकी आहे का? गावं कळणं म्हणाले होते, ज्याला गावातून हाकलून दिलं होतं असलं हे बांडगूळ आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील म्हणत होते हे काँग्रेसचं कडू इंद्रावणं आहे. माणमध्ये हे आमदार म्हणत होतं माझा डीएनए काँग्रेसचा आहे. माझी मागणी आहे याचा पहिला डीएनए तपासा, हे त्या सोनिया मॅडमशी धड नाय या सोनिया मॅडमशी धड नाय. हे नक्की हाय कुणाचं म्हणून तरी याचा डीएनए तपासा. म्हणजे कळंल तरी कोणत्या पक्षाचं आहे, कुठल्या पक्षाचं नक्की काम करतंय हे कुणालाच कळना झालंय. आमच्या मंत्र्यांच्या दारात जावून बसतंय. आमच्या मंत्र्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांनी सांगितलंय हे बदनाम झालेलं आहे. भाजपमध्ये आलं तरी पन्नास टक्के बायका मतं देणार नाहीत असे रिपोर्ट वर गेलेत. त्यामुळे भाजपची आम्हाला खात्री आहे असल्या बांडगुळाला भाजप दारात उभी करणार नाही. विखे पाटलांबरोबर प्रवेश करणार होते पण पक्षाने घ्यायला नको का पक्षात. समाजामध्ये डागळलेली प्रतिमा असलेल्या माणसांना भाजपसारखा चांगला पक्ष हा पक्षात घेत नसतो. धड आपण इकडं पण नाय तिकडं पण नाय म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याला बदनाम करायचा नावं ठेवायचा धंदा सुरु केला आहे. अशा मुक्या माजाच्या माणसाची जिरवायची असा भाजप, शिवसेना, रासप, रिपाईच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय. ह्याला आमदारकीतून गाडायचं ही भूमिका आम्ही घेतलीय.
आंधळीत दहा महिन्यांनी पाणी येणार असं सगळ्यांनी सांगितलंय. याचे चार महिने राहिलेत चार महिन्यानंतर आमदारकी सोडाच पण हे तालुक्यात पण दिसणार नाही. भाजप सक्षम आहे, भाजपच्या माध्यमातून नक्की या योजना पुर्ण करणार आहे. त्यामुळे याने शेवटच्या चार महिन्यात जनतेची दिशाभूल करु नये. चार महिन्यानंतर काय घडेल हे यानं ठरवू नये.
आम्ही सत्तेसाठी, आमदारकीसाठी भाजपमध्ये आलो नाही. भाजप जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करु फक्त हे बांडगुळ सोडून. या डागाळलेल्या आमदाराला गाडल्याशिवाय राहणार नाही.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |