08:30pm | Apr 01, 2020 |
सातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दहाही औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांची धडधड थांबली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील दिवसाला होणारी सुमारे 150 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता कामगारांना किमान वेतन देण्याची सूचना शासनाने केली आहे.
आगामी दहा दिवस उद्योग बंद राहणार आहेत. त्यामुळे उद्योगांसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याजमाफ करावे, एमएसईबी, एमआयडीसीचे सर्व सर्व्हिस चार्जेस माफ करावेत, कर्ज हप्ते भरण्यास बँकांनी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उद्योजकांकडून होऊ लागली आहे. याबाबत सर्व उदयोजक मास च्या वतीने मागण्या ई मेल द्वारे केंद्र सरकारला कळवणार आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे हाच उपाय आता राहिल्याने राज्य सरकारने प्रमुख शहरांचे लॉकडाऊन’ केले आहे. तर उर्वरित जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्या दिवसापासून 31 मार्चपर्यंत औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. मात्र लॉक डाऊन चा कालावधी वाढल्याने किमान 20 एप्रिल पर्यंत कारखान्यांची धडधड पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नाही. त्यानुसार आगामी दहा दिवस जिल्ह्यातील दहाही औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद राहणार आहेत. पण, यामध्ये औषधे, सर्जिकल उपकरणे आणि डिफेन्सचे साहित्य बनविणार्या कंपन्यांना सूट देण्यात आली आहे. या बंदमुळे दररोज जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील सुमारे दीडशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
तसेच शासनानेही सर्व कामगारांना या बंदच्या काळातील पगार देण्याची सूचना कंपन्यांना केली आहे. शासनाची ही सूचनाही उद्योजकांनी मान्य केली आहे. पण, त्यासोबतच त्यांना सोसावे लागलेल्या नुकसानीपोटी त्यांच्याही शासनाकडून काही अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये बंदच्या काळातील कर्जावरील व्याज माफ करण्याची सूचना शासनाने बँकांना करावी. तसेच जीएसटी व इतर कर भरण्यास मुदतवाढ द्यावी. वीज वितरण कंपनी आणि औद्योगिक विकास महामंडळ यांचे सर्व्हिस चार्जेसही माफ करावेत. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकांनी मुदतवाढ द्यावी आणि वर्किंग कॅपिटल वाढवून द्यावे, अशी मागणी उद्योजक करू लागले आहेत. याची अंमलबजावणी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व उद्योजकांच्या वतीने पत्र दिले जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगाला करोनाच्या लॉक डाउनने तीस हजार कोटीचा फटका दिला आहे. सातारा जिल्हयातील दहा औ. वसाहतींची निर्यात मध्य आशिया व युरोप खंडात होते मात्र तिथेही करोनाच्या संसर्गाने उत्पादन थांबल्याने जागतिक मंदीला जणू आमंत्रण च मिळाले आहे. त्यामुळे उत्पादनाच्या कर्जामुळे उदयोजकांच्या आर्थिक समस्या वाढवल्या आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |