सातारा : देशाच्या पंतप्रधानांचा आम्ही आदर करीत आलो आहे. पण आत्ताचे पंतप्रधान हे जातीयवादी आहेत. भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. पवारांच्या पुतण्याने शरद पवारांची दांडी गुल केली. या मोदींच्या टिकेचा अजित पवारांनी समाचार घेतला. मोदी साहेब पवार घराणे आजही एकत्र आहे, आणि भविष्यातही मरेपर्यंत एकत्रच राहील. याची तुम्ही काळजी करू नका, असा पलटवार माजी मुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांनी सातार्यात केला.
दरम्यान राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातार्यातील गांधी मैदानावरून विराट जनसुमदायाच्या उपस्थित शक्ती प्रदर्शन करीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे उमेदवारी अर्ज आज मंगळवार दि. 2 रोजी दुपारी दाखल केला.
यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्रीमंत सौ. दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, शिवाजीराजे भोसले, सारंग पाटील, सत्यजीत पाटणकर, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार, अखिल भारतीय माथाडीचे कामगार नेते अविनाश रामीष्टे, धर्मराज जगदाळे, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परीषद व पंचायत समितीचे सदस्य, यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथे झालेल्या सभेतील टिकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांचा आम्ही आदर करत आलो आहे. परंतु आत्तापर्यत जेवढे पंतप्रधान होवून गेले त्यानीं कधीही व्यक्ती आणि घराण्यावर टिका केली नाही. पण आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांवर न बोलता घराण्यावर टिका करीत आहेत. पवारांच्या पुतण्यांनी शरद पवारांची दांडी गुल केली. मोदीसाहेब पवार आजही एकच आहेत आणि उद्या मरेपर्यंत एकत्रच रहातील, मोदीसाहेब पवार घराण्याची तुम्ही चिंता करू नये, असा टोला लगावला.
सातारा लोकसभा मतदार संघातील जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एवढे कडक ऊन असतानाही तुम्ही सर्वजण इथे आला आहात. आजची गर्दीच सर्वकाही सांगून जात आहे. निकाल काय लागणार हे सांगायला जोतिषाची गरज नाही. सातारचा निकाल काय लागणार हे, सगळ्या महाराष्ट्रला कळून चुकले आहे. ही निवडणूक जातीपातीच्या आणि शाहू, फुले विचारांच्या विरोधात आहे. लोकांच्या मनात मोदीची लाट राहिलेली नाही. हे आजच्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे. मोदी विरोधात सर्वत्र लाट निर्माण झाली आहे. पण माझे एकच सांगणे आहे की, गेल्यावेळी जी चुक केली, ती पुन्हा होता कामा नये. कार्यकर्त्यांनी गाफील न रहाता कामाला लागले पाहीजे. उदयनराजेंना विक्रमी मतांनी निवडून आणून महाराष्ट्र इतिहास घडवायचा आहे, असे अजित पवार यांनी सांगीले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला जनसुमदाय पाहून मी एकच सांगतो. खा. उदयनराजे गेल्यावेळ्यापेक्षा यावेळी रेकॉड ब्रेक करून विजयी होतील असा आपला विश्वास आहे. देशात जातीयवादी पक्षाने थैमान घातले आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्याला हे जातीयवादी सरकार उलथवून टाकण्यासाठी शाहू, फुले विचारार घेवून लढले पाहीजे. 2014 ला झालेली चूक आता पुन्हा करायची नाही. झालेली चुक सुधारण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने अर्ज भरणार आहेत. शहू फुले विचाराच्या विरोधात लढाई आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही. नोटा बंदीमुळे शेतकरी, छोटे व्यापारी देशोधडीला लागले.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, विरोधकांना धडकी भरेल अशी रॅलीला गर्दी झाली होती. आजची अर्ज भरण्यासाठी निघालेली रॅली विजयाची रॅली होतीे. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी पुन्हा इतिहास घडऊन दाखवा. सातार्यात मोदी नाही तर शरद पवारांची लाट चालते हे पुन्हा एकदा दाखवून द्यावे असा टोला लगावला. 23 रोजी निकालाला मत पेट्या उघडण्यात आल्यानंतर फक्त घड्याळाच मत दिसले पाहिजे असे आ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांगीतले.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आघाडीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांचा दाखल करण्यासाठी आलेल्या रॅलीतील गर्दी वरून निकाल स्पष्ट झालं आहे. सातारा जिल्ह्यातील मतदार जनता ही शरद पवारांच्या विचारांनी एकत्र आलेली आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे. शेकर्यांच्या विकासासाठी शरद पवारांच्या विचारला मत द्या, असे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगीतले.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, विनंतीला मन देऊन आपण आलात मी तुमचे स्वागत करतो, आभार मानतो. पाच वर्षांपूर्वी तुम्ही बहुमत दिले, पण काय झाले. अभिनय करून मते मिळवली, दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. जनतेने बहुमत दिले, त्या बहुमताच्या जोरावर सत्ता मिळाली. सत्ता मिळाली की, या सरकारला तळागाळातील जनतेचा विसर पडला. गरीबांच्या खात्यावर 15 लाख रूपये टाकू अशी घोषणा या सरकारने केली होती. पण गरीबांच्या खात्यात पैसे जमा करणे सोडा, या सरकाने जनतेची फसवणुक केली आहे. नोटा बंदी करून सर्वसामान्यांकडून पैसे काढूल घेतले. शेतकरी, छोटे व्यापारी अडचणीत आले. ऑनलाइन खरेदीला या सरकारने पाठींबा दिला. त्यामुळे आज व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. पाच वर्षाच्या काळातच मोठ्या प्रमाणावर शेकर्यांंच्या आत्महत्या झाल्या आहेत. आता मन की बात ला जनता भुलणार नाही. गेल्यावेळी जनतेने बहुमत दिले, त्यां जनतेचा तुम्ही विश्वासघात केला. बहुमत मिळाले आणि या सरकारच्या डोक्यात अहंकार निर्माण झाला आहे. देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. देशाला विकून टाकण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. काही उद्योग पती मोठे करून ठेवले, आज त्यांच्या कडून विकत घ्यावे लागत आहे. एक माणूस देशा पेक्षा मोठा कसा होतो. या भाजप सरकारने एक माणसाला तेल, गॅस विकला, उद्या हेच लोक आपल्या नद्या विकतील. जनतेच्या विरोधात अधिकार घेण्याचा निर्णय कोणी दिला. हा अधिकार जनतेने दिला आहे. आतातरी जनतेने शहाणे होवून 2014 ला झालेली चुक पुन्हा करू नये. नाहीतर भारताचा सोमालिया झाल्याशिवाय रहाणार नाही, असे शेवटी खा. उदयनराजेंनी सांगीतले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |