कराड : बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना एफआरपी +350 रुपये चालू गळीत हंगामासाठी व साखर कारखानदार व सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी व एसपी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांच्या कथा व व्यथा सांगाव्या तेवढ्या थोड्याच आहेत महापुरात शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले व नंतर परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके कुजून गेली त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे अशातच साखर हंगाम चालू करण्याची लगबग कारखानदारांची चालू झालेली आहे परंतू अद्याप एकाही साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर करावा जेणेकरून जो कारखाना दर जास्त देईल त्या कारखान्याला शेतकरी आपला उस घालेल वाढत्या महागाईमुळे शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत सापडला आहे, नांगरटीचे दर डबल झाले आहेत, भांगलणीचे दर प्रचंड वाढले आहे, शेती पंपाचे वीज दर वाढले आहेत, रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या सर्व महागाई मध्ये शेतकरी कशीबशी शेती करतो माळेगावच्या साखर कारखान्याची एफ आर पी 2777 रूपये आहे तरीही या कारखान्याचे प्रशासन शेतकर्यांना 3400 दर देतो या कारखाना प्रशासनाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत या कारखान्याला जर एफआरपी पेक्षा ज्यादा दर देणं परवडत असेल तर इतर कारखान्यांना का परवडत नाही हा प्रश्न आता शेतकरी विचारू लागला आहे साखर कारखानदार हे फक्त साखरेच्या दरावर ऊसदर देतात बाकी उपपदार्थापासून त्यांना भरपूर नफा मिळतो उदा बग्यास मोल्यासिस , मळी परंतू शेतकर्यांना हे कारखानदार साखरेच्या दरावरच दर देतात शेतकर्यांचा उत्पादन खर्च वाढला परंतू त्यामानाने उत्पन्न वाढले नाही व उसाला कमी दर मिळतो त्यामुळे आज शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करतो कि एफआरपी+ 350 रुपये चालू गळीत हंगामात साखर कारखानदारांनी शेतकर्यांना द्यावे अन्यथा आम्ही सर्व शेतकरी संघटना मिळून दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने चालू होऊ देणार नाही यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास प्रशासन जबाबदार राहील.
म्हणून प्रशासनाने तात्काळ कारखान्याचे चेअरमन निर्णय घेण्याचे अधिकार असणारे प्रतिनिधी व संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घ्यावी.
निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, सातारा तालुका युवाध्यक्ष किरण गोडसे , कोरेगाव तालुका अध्यक्ष संजय घाडगे संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |