02:48am | Dec 07, 2019 |
कराड : स्मशानात माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर प्रांरभ होतो. जगणं समृध्द करा, स्वत:च्या नवीन पायवाटा शोधा, असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. डॉ. मोहन राजमाने अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. संजय कांबळे. द. जो. पवार, उपप्राचार्य माधुरी कांबळे, डॉ. नंदिनी रणखांबे, डॉ. अभय पाटील, मेजर रवींद्र रणखांबे, डॉ. दिलीपकुमार कसबे, डॉ. महिपती शिवदास, डॉ. आर. बी. वनभट्टे, प्रा.निर्मला पोळ उपस्थित होते.
उत्तम कांबळे पुढे म्हणाले, जगण्याला समृध्द करण्यासाठी आयुष्याची वाट घडवणे आवश्यक आहे. आपला जन्मापासूनचा प्रवास सांगत असताना, अनेक कडू.गोड आठवणी त्यांनी सांगितल्या. दु:ख, दारिद्रय, अवहेलना, यातना, वेदना, सहन करत, त्याकडे सकारात्मकतेने बघत, आयुष्याचे ध्येय कसं प्राप्त करावं, भूक ही माणसाला खुप काही शिकवून जाते, आयुष्यानं आपल्याला खुप काही शिकवलं, जगण्याच बळ दिलं, असे सांगितले. ‘पोराला जन्माला घातलं आहे, चोराला नाही‘ या आईच्या वाक्याने त्यांच्या आयुष्यात मोठी क्रांती केली, असे सांगत, मन, मेंदू, व मनगट तुमचं आयुष्य घडवत असतात. जगण्याला लव यू म्हणा. शिक्षण ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. शाळेत माहिती मिळते, पण ज्ञानाचे विश्लेषण आयुष्याच्या शाळेतच होते. असे अनमोल विचार त्यांनी मांडले.
प्रा.डॉ.मोहन राजमाने म्हणाले, उत्तम कांबळे यांचे आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या आयुष्याची वाट तुडवताना जीवनामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली सांगितली. आलेल्या दु:खाला सामोरे जाताना परिस्थिती बदलण्यासाठी मनात जिद्द असली पाहिजे. मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वत:च पायवाट कष्टाने शाधावी.
प्रा.डॉ.रमेश पोळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रेश्मा दिवेकर, प्रा. सुचिता अथकर, डॉ.प्राजक्ता निकम, प्रा.सीमा चव्हाण, प्रा राणी चव्हाण, प्रा. एन. डी. बनसोडे, प्रा.एस.व्ही.यादव व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. कोमल कुंदप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.तानाजी पाटील यांनी आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |