02:36am | Aug 09, 2019 |
कराड : गेल्या आठ दिवसांपासून दररोज बिकट होत जाणारी कराड तालुक्यातील पूरस्थिती गुरुवारी काहीशी आटोक्यात आली. कोयना धरणासह इतर धरणांमधून कृष्णा आणि कोयना नदीच्या पात्रात केला जाणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे कराड तालुक्यातून वाहणार्या नद्यांच्या पातळीत थोडी घट झाली आहे. बुधवारी रात्री कराड शहरात ठिकठिकाणी घुसलेले पाणी गुरुवारी पहाटेपासून कमी होउ लागले. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड तालुक्यातील पूरस्थितीचा हेलिकॉप्टरमधून आढावा घेतला. सातार्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कराड शहरासह, तालुक्यातील रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द परिसरातील गावांमध्ये जाउन पूरग्रस्तांची विचारपूस केली.
आठवड्याच्या अधिक कालावधीपासून कराड तालुक्यात सुरु असणार्या पावसाने अखेर गुरुवारी दिवसभर काहीशी उसंत दिली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे गुरुवारी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे दरवाजे 16 फुटांवरुन 8 फुटांवर आणण्यात आले. त्यामधून पाण्याचा विसर्ग 68 हजार क्युसेक्स प्रति सेकंद इतका कमी करण्यात आल्यामुळे कृष्णा आणि कोयना नदीच्या पूर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. त्यामुळे कराड शहराला गेल्या चार दिवसांपासून पडलेला महापुराचा वेढा काहीसा सैल झाला. कराडमध्ये दत्त चौकाच्या बाजूने घुसलेले नदीचे पाणी सुमारे 20 ते 25 फूट मागे सरकले. त्यामुळे दत्त चौक, यशवंत हायस्कूल, पाटण कॉलनीसह मुख्य बाजारपेठ परिसरातील पुराचे पाणी मागे सरकले होते. यशवंतराव चव्हाण समाधीवरीलही पुराचे पाणी कमी झाल्यामुळे ती गुरुवारी दुपारपासून दिसू लागली. कृष्णा घाट परिसरातील पायर्या आणि मंदिरेही पुराच्या पाण्यातून बाहेर येत आहेत.
कराड शहर व तालुक्यातील 1052 कुटुंबातील 4633 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कराड नगरपालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा व विद्यालये या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तालुक्यातील 30 गावे पूरबाधित झाली आहेत.
पुराचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तांबवे येथील 184 कुटुंबातील 741 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. गोटे येथील 25 कुटुंबातील 128, पाल येथील 2 कुटुंबातील 17, उंब्रज येथील 25 कुटुंबातील 117, पोतले येथील 2 कुटुंबातील 6, खुबी येथील 2 कुटुंबातील 6, कापील 3 कुटुंबातील 19, पाचवड वस्ती मळा येथील 8 कुटुंबातील 45, कोर्टी येथील 3 कुटुंबातील 12, शेरे येथील 12, रेठरे बुद्रूक येथील 41 कुटुंबातील 162, येरवळे येथील 24 कुटुंबातील 99, सयापूर येथील 10 कुटुंबातील 38, कवठे येथील 76 कुटुंबातील 296, म्होप्रेतील 38 कुटुंबातील 215, खोडशी येथील 3 कुटुंबातील 12, रेठरे खुर्द येथील 120 कुटुंबातील 417, कार्वेतील 14 कुटुंबातील 73, आटकेतील जाधवमळ्यातील 113 कुटुंबातील 742, कोपर्डे हवेली व मालखेड येथील एक कुटुंब, आटकेमधील 26 कुटुंबातील 130, चचेगांव 14 कुटुंबातील 46, केसेतील 3 कुटुंब, वस्ती साकुर्डी व सुपनेतील प्रत्येकी 13 कुटुंबातील 55 लोक, साजूर येथील 8 कुटुंबातील 38, कोडोली येथील 23 कुटुंबातील 97 लोक, गोवारेतील 10 कुटुंबातील 34 असे एकूण 30 गावांतील 1052 कुटुंबातील 4633 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
कराड शहरातील भैरवनाथ मंदिर, पाटण कॉलनी, साई मंदिर परिसर, लल्लुभाई चाळ, जोशी बोळ, रुक्मिणीनगर, कोयना दूध कॉलनी, रुक्मिणीनगर झोपडपट्टी येथील 195 कुटुंबातील 752 लोकांना नगरपालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. कराड नगरपालिका व सामाजिक संस्थांच्यावतीने त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे.
कराड ते विटा राष्ट्रीय महामार्गावरील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जाणारा कृष्णा पूलही गुरुवारी सकाळपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा पूल पुराच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यामुळे मंगळवारी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी फक्त दुचाकी वाहनधारक आणि पादचार्यांसाठीच पुलावरील वाहतूक सुरु होती. मंगळवारी पुलाला टेकलेले कृष्णा नदीचे पाणी गुरुवारी सुमारे 15 ते 30 फूट खाली उतरल्यामुळे त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. परंतु पुलावर पूराचे पाणी पाहण्यासाठी येणार्यांना आवरण्यासाठी आणि सुरक्षा उपाययोजना म्हणून पोलीस कर्मचार्यांची तैनात करण्यात आली आहे.
पूरस्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे कराड शहरातील रिक्षा वाहतूक सुरु झाली असली तरी कोल्हापूर आणि सांगलीच्या दिशेने जाणारी एसटी बस सेवा ठप्प झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या अनेक विभागांमध्ये खंडीत झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचे काम वीज वितरण कंपनी कर्मचार्यांच्याकडून दिवसभर सुरु होते. तरीही अनेक विभागांमध्ये गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत होउ शकला नव्हता.
कृष्णा-कोयना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असणार्या बहुतेक गावांच्या स्मशानभुमी पाण्याखाली गेल्या आहेत. नदीकाठची शेतीही पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तांबवे, रेठरे बुद्रुक, गोंदी आदी नदीकाठच्या गावांमधील अनेक घरे गुरुवारीही पुराच्या पाण्याखाली होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |