05:01pm | Oct 17, 2018 |
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील विविध विभागातील अनुकंपा उमेदवारांची पहिली बैठक सातारा येथील मुख्याध्यापक भवनात पार पडली. महाराष्ट्रातील हजारो उमेदवार अनेक वर्षांपासून अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत या विषयावर ही बैठक घेण्यात आली होती.समर्थ शिक्षक परिषदेचे संस्थापक सुधीर विसापुरे, शिक्षक परिषद कोषाध्यक्ष संजय गुरव, सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ प्रसिद्धी प्रमुख कुंदन सुतार, सामाजिक कार्यकर्ते मोहन जगताप,ओबीसी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष मंगेश अभंग, दस्तागिर शेख ,संजीवनी शिक्षण संस्थेचे सचिव ए. आर. पाटील, विजय लोहार यांचेसह पश्चिम महाराष्ट्रासह अहमदनगर सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड आदी भागातून अनुकंपा उमेदवार बैठकीला उपस्थित होते.
एक वर्षांपासून अनुकंपा उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत ,परंतु ते संघटित नसल्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे सर्वच स्तरावर दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनुकंपा उमेदवार विविध विभागात आपल्या नोकरीसाठी हेलपाटे मारीत आहेत. परंतु त्यांच्या प्रश्नाकडे सर्वच स्तरावर दुर्लक्ष झाले. यासाठी अनुकंपा उमेदवारांची संघटना व त्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडून त्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी की बैठक महत्त्वाची ठरणारी आहे.
समर्थ शिक्षक परिषदेचे संस्थापक सुधीर विसापूरे म्हणाले,' अनुकंपा उमेदवारांच्या पाठीशी कोणीही नाही, जे पाठीशी होते ती माणसं या जगातून गेली आहेत. त्यामुळे अनुकंपा उमेदवारांच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही प्रयत्न करू. शेवटपर्यंत त्यांचे प्रश्न सोडवू. प्रशासनाला आपली तळमळ आपल्या कुटुंबाची होणारी होरपळ सांगू. प्रेमाने हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाला भाग पाडू . त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे .अनुकंपा उमेदवारांनी गाफील न राहता वेळोवेळी शासनाला आपल्या नोकरी संदर्भात मागणी करणारे अर्ज करावेत त्यावरती पोहोच घ्याव्यात. जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत सातत्य ठेवा. संस्था, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे पदाधिकारी याकडे अर्ज करा. अनुकंपा भरती ला कसलीही बंदी नाही. तुमचा प्रश्न तेवत ठेवायचा असेल आपणास न्याय मिळेपर्यंत लढावे लागणार आहे दबावतंत्र वापरणाऱ्यांचे दबाव हणून पाडू .परमेश्वराची माणसं जगात आहेत विश्वास ठेवून आपण आपल्या हक्कासाठी प्रयत्न करू. येत्या दिवाळीपर्यंत संबंधित प्रशासनाला अर्जाद्वारे आपली मते सांगूया.सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ प्रसिद्धी प्रमुख कुंदन सुतार म्हणाले,की जिल्हा परिषद स्तरावर अधिकारी अनुकंपा भरतीसाठी उदासीन आहेत .अधिकारी त्यांची थट्टा करीत असून सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे .सामाजिक कार्यकर्ते मोहन जगताप म्हणाले , 'गांधीगिरीच्या मार्गाने अनुकंपा उमेदवारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आपणास न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. शिक्षक परिषद कोषाध्यक्ष संजय गुरव म्हणाले,' गेली अनेक वर्षे असणारा हा प्रश्न लवकरात लवकर निकालात लावण्यासाठी आपण एकत्र येण गरजेच आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अनुकंपा उमेदवारांचा पूर येऊन गर्दी व्हयला हवी आपणास न्याय मिळवण्यासाठी येत्या काही दिवसात आझाद मैदान मुंबई येथे गांधीमार्गाने उपोषण करण्याचा इशारा उमेदवारांनी प्रकट केला.महाराष्ट्रातील विविध विभागाचे अनुकंपा उमेदवार जेथे आहेत त्यांनी अनुकंपा धारक संघटना महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |