07:12pm | Aug 08, 2019 |
फलटण : फलटण शहरातील अवैध खासगी सावकारीने कधीकाळी संपूर्ण फलटण तालुका वेठीस धरलेला होता. सोमवार पेठेतील आण्णा उर्फ कात्याभाई व त्याच्या टोळीने फलटण तालुक्यामध्ये उच्छाद मांडलेला होता. परंतू सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी फलटण शहरासह तालुक्यातील अवैध खासगी सावकारांचे कंबरडे मोडले. त्यामुळे सोमवार पेठेतील आण्णा उर्फ कात्याभाईची दहशतही संपुष्टात आली होती. मात्र, एसपी संदीप पाटलांची बदली होताच कात्याभाई व त्याच्या टोळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
5 ऑगस्ट रोजी फलटण येथील सोमवार पेठेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे आयोजन येथील मातंग व इतर समाजाच्यावतीने करण्यात आले होते. शांततेत सुरु असलेल्या या जयंती कार्यक्रमावर काही समाजकंटकांनी पूर्वनियोजित हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यामध्ये लहान मुलांसह महिला व काही लोक जखमी झाले होते. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात 8 संशयितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमावर हल्ला करवणार्या सोमवार पेठेतील एका नगरसेवकासह त्याचा वडील आण्णा उर्फ (कात्याभाई) यांनी आपली कातडी वाचविण्यासाठी ज्यांच्यावर हल्ला झाला, अशा लोकांवरच एका महिलेला हाताशी धरुन विनयभंगाचा खोटा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’, असा प्रकार असूनही फलटण शहर पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता कात्याभाई व त्याच्या नगरसेवक मुलाच्या दबावाखाली येवून गुन्हा दाखल करुन घेतला. मात्र, या सर्व प्रकाराला फलटणमधील सोमवार पेठेतील सर्व्हे नं. 6 वर नगरपालिकेने टाकलेल्या आरक्षण क्र. 53 व 54 वरील ओपन स्पेस जागेची झालर आहे. 5 मे 2019 रोजी फलटण नगरपालिकेने वरील ओपन स्पेस जागेवर टाकलेल्या आरक्षणाच्या विरोधात त्या जागेवर राहणार्या लोकांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.
संबंधित जागेवर गेल्या 50 वर्षांपासून सुमारे 90 कुटूंबे वास्तव्यास आहेत. हे लोक संबंधित जागेचा नगरपालिका कर, पाणीपट्टी तसेच वीजबिलही भरत आहेत. असे असताना फलटण नरेशांसह त्यांच्या दोघा दाढीवाल्या बंधूंनी सातार्यातील बिल्डरांना हाताशी धरुन श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या ओपन स्पेस जागेचे बोगस दस्तावेज तयार करुन ही जागा फलटण नगरपालिकेला 21 कोटी रुपयांमध्ये विकण्याचा घाट घातला होता. परंतू खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण पालिकेतील विरोधी पक्ष सदस्यांनी सत्ताधार्यांचा डाव हाणून पाडत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेवून नगरविकास खात्याला या आरक्षणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सोमवार पेठेतील त्या जागेवर राहण्यार्या लोकांमुळेच आपला डाव फसला याची सल आण्णा उर्फ कात्याभाईसह त्याच्या मुलाच्या मनात होती. त्यामुळेच परवा झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमावर कात्याभाईने व त्याच्या नगरसेवक मुलाने पूर्वनियोजित हल्ला घडवून आणला. यावेळी कात्याभाईला 2011 सारखीच जातीय दंगल घडवून आणायची होती. मात्र संबंधित लोकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतल्यामुळे त्यांचा हा डाव फसला. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र आण्णा उर्फ कात्याभाईने फलटण शहर पोलिसांना हाताशी धरुन फिर्यादी तसेच या प्रकरणाशी काहीही संबंध नसणार्या लोकांवर सोमवार पेठेतीलच एका महिलेला हाताशी धरुन खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी सोमवार पेठेतील कात्याभाईच्या अवैध खासगी सावकारी करणार्या बगलबच्च्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे गेले वर्षभर कात्याभाई व त्याच्या नगरसेवक मुलाने डोके वर काढले नव्हते मात्र फलटण नरेशांच्या आदेशाने कात्याभाईने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. नगरपालिकेतील ‘त्या’ जागेच्या व्यवहारात कात्याभाई व त्याच्या नगरसेवक मुलाला 5 कोटी मिळणार होते. परंतू खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व ‘सातारा टुडे’च्या दणक्यामुळे तसेच त्या जागेवर राहणार्या लोकांनी केलेल्या विरोधामुळे त्यांचा हा व्यवहार झाला नाही. त्याचीच सल मनात राहिल्याने कात्याभाई व त्याच्या मुलाने लोकशाही अण्णाभाऊ साठे कार्यक्रमावर हल्ला केल्याचा आरोप संबंधित पीडीतांनी केलेला आहे. मात्र फलटण शहर पोलिसांनी राजकीय दबावापोटी पीडितांवरच विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोपही केला जात आहे.
2011 साली आण्णा उर्फ कात्याभाई व त्याच्या नगरसेवक मुलाच्या अवैध खासगी भीशीच्या वादामुळे फलटणमध्ये भीषण जातीय दंगल उसळली होती. गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा ऊर्फ कात्याभाईच्या घरात दर महिन्याला कोट्यवधी रुपयांच्या अवैध भीशीचा बाजार भरवला जात होता. फलटणमधील व्यापारी, नोकरदार व नगरसेवक या भीशीमध्ये सहभागी होत होते. 2011 साली सोमवार पेठेतील कात्याभाईचा राईट हॅण्ड समजल्या जाणार्या भीशीचालक गुंदेचा याला मंगळवार पेठेतील युवकांनी नाना पाटील चौकात अडवून मारहाण केली होती. त्यामुळे मंगळवार पेठ आणि सोमवार पेठेत अण्णा उर्फ कात्याभाईमुळे भीषण दंगल उसळली होती. सातारा पोलिसांना या दोन्ही पेठांमध्ये कर्फ्यू लावावा लागला होता. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी या दंगलीस कारणीभूत असलेल्या अण्णा ऊर्फ कात्याभाईला घरात घुसून पोलिसी खाक्या दाखवला होता. वायसे पाटलांच्या रट्ट्यामुळे कात्याभाई कित्येक दिवस अंथरुणाला खिळून होता. मात्र, सुंभ जळाला तरी पीळ कायम असल्याने कात्याभाईने आपले अवैध धंदे सुरुच ठेवले. सोमवार पेठेत कायम अशांतता राखून आपली गुंडगिरी टिकवायची आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमवायचे हा फंडा राबवल्यानेच सोमवार पेठेत कायम अशांतता आहे.
एसपी मॅडमजी आण्णा उर्फ कात्याभाईच्या मुसक्या आवळाच !
गेल्या तीन दशकांपासून अवैध खासगी सावकारी व गुंडगिरीच्या माध्यमातून कात्याभाईने अनेकांचे मुडदे पाडून कोट्यवधींची माया कमवली. देशी दारुचा अवैध गुत्ता चालवून अण्णा ऊर्फ कात्याभाईने कोट्यवधी रुपयांची माया कमवली. गुंडगिरीच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये दहशत माजवली. मात्र, फलटण नरेशांनी यांना गंगाजळी घालून व्हाईट कॉलर केले, राजकारणात आणले, नगराध्यक्ष पदासारखे पद घरात दिले. त्यामुळे हे व्हाईट कॉलर झाले. कात्याभाई काय चीज आहे, हे सोमवार पेठेतील शेंबड्या पोराला विचारले तरी ते कात्याभाईची कुंडली सांगू शकतात. 2011 साली या कात्याभाईने स्वत:च्या फायद्यासाठी फलटणमध्ये जातीय दंगल घडवून आणली होती. आता 8 वर्षानंतरही त्या जागेवरील लोकांना हटविण्यासाठी, त्यांची घरे जाळण्यासाठी कात्याभाईने परवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमावर पूर्वनियोजित हल्ला घडवून आणला. मात्र, लोकांच्या सतर्कतेमुळे कात्याभाई व त्याच्या नगरसेवक मुलाचा हा प्लॅन फसला गेला आहे. त्यामुळे वेळीच यावर डॅमेज कंट्रोल करुन कात्याभाई व त्याच्या मुलाच्या मुसक्या आपण आवळाव्याच. जेणेकरुन फलटणमध्ये येणार्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |