12:55am | Oct 01, 2018 |
कराड : लोकसभा व विधानसभा निवडणुकींचा आजच्या घडीला अंदाज बांधणे कठीण आहे. सध्याचे वातावरण भाजपाच्या विरोधात असलेतरी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनी वेगळी चूल उभी करणे म्हणजे भाजपाला पाठिंबा दिल्यासारखे आहे. त्यामुळे काँग्रेस कशी कमी करता येईल, असा बंदोबस्त भाजपवाले करणार यात कोणतीही शंका नाही. मात्र काँग्रेसकडे प्रचंड मुद्दे असूनही ते शांत का? असा सवाल प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा व आ. बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
कराड दौऱ्यावर असताना त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे-पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
आ. बच्चू कडू म्हणाले, सध्या भाजपाकडे जेवढा पैसा आहे, तेवढा कदाचित अमेरिकेच्या अध्यक्षाकडेही नसेल. गेल्या पन्नास वर्षात जेवढे काँगे्रसला कमवता आले नाही, तेवढे भाजपने पाच वर्षातच कमवून घेतले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कसे मॅनेज करायचे हे त्यांना चांगले माहीत आहे. भाजप निवडणुकीचे राजकारण व्यवस्थित करेल यात शंका नाही. त्यामुळे त्यांना लढण्याची गरज पडणार नाही, असेच चित्र आहे. लोकांचा काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही चांगला नाही. कारण गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसने जे पाप या देशात केले, ते सर्व पाच वर्षात पाठीवर टाकून लोक समजून घेतील, असे अजिबात वाटत नाही.
ते म्हणाले, काँग्रेस अजूनही ठोस मुद्दे घेऊन समोर येताना दिसत नाही. त्यांच्याकडे प्रचंड मुद्दे आहेत, असे असतानाही ते शांत आहेत, हे कोडे न उलघडण्यासारखे आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांविषयीचा एखादा ठोस मुद्दा घेऊन मोठ्या ताकदीने आंदोलन केले आहे, असे कुठे दिसत नाही. प्रकाश आंबेडकर व एमआयएम यांचा भाजपा एक नंबरचा शत्रू आहे. म्हणून त्यांचा भाजपला विरोध आणि भाजप नको म्हणून कांॅग्रेस असलेतरी चालेल, अशी त्यांची भुमिका आहे. परंतू वेगळ्या चुली मांडून या भुमिकेतून नेमके काय निष्पन्न होणार आहे? हे त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चांगले माहिती आहे. मात्र प्रहार संघटना व आम्ही जनतेसोबतच राहू, वेळप्रसंगी स्वतंत्र लढू, असेही आ. कडू यांनी सांगितले.
'आरएसएस'च्या कार्यकर्त्यासाठीच'...
भाजप सरकारकडून शासकीय व्यवस्था असतानाही नोकर भरती करण्याची प्रक्रिया खाजगी कंपनीला देण्यात आली आहे. ती कंपनी मध्यप्रदेशमधील एका घोटाळ्यात समाविष्ट आहे. पेपर काढण्यापासून ते सर्व काही कामे ही एक खाजगी कंपनी करत आहे. त्यामधून सरकारला भाजप व 'आरएसएस'चे कार्यकर्ते सरकारी नोकरीत आणायचे आहेत. त्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप एक प्रश्नाला उत्तर देताना आ. बच्चू कडू यांनी केला.
डिजीटल इंडिया आहे ना !
इव्हीएम मशीनमध्ये हस्तक्षेप करता येतो तर ऑनलाईन सरकारी यंत्रणेत करता येणार नाही का? असा सवाल करत बच्चू कडू म्हणाले, खाजगी कंपनीला सरकारी नोकर भरतीचा ठेका देण्याचे कारणच काय? पुण्याला जी परीक्षा झाली ती कॉफीच होती. ते म्हणाले, परीक्षा फक्त नावापुरती होते. पेपरचे लॉगींग बंद झाल्यानंतर ते पुन्हा ओपन करून पेपर लिहिले जात आहेत. याची माहिती संबंधीत आयुक्तांना विचारली तर ते सात दिवसात अहवाल आल्यावर पाहू म्हणाले. अहो, 'डिजीटल इंडिया आहे ना!' मग पाच मिनिटाच्या आत रिपोर्ट यायला पाहिजे, असा उपरोधिक टोला आ. कडू यांनी लगावला.
वेळप्रसंगी मारायला कमी करणार नाही
गरीबांची पोर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत, अभ्यास करतात. लाखो रूपये शिकवण्यावर खर्च करून सोळा सोळा तास डोळे फोडतात. मात्र सरकारी नोकरी गरीबांच्या पोराला न लागण्याची व्यवस्थाच भाजप सरकारने केली आहे. अधिकारी राजकीय पक्षांची दलाली करत आहेत, हे कोण सहन करणार? हे राज्य अधिकाऱ्यांच्या बापाचे आहे काय? त्यादिवशी चुकुन आम्ही संबंधित अधिकाऱ्याला मारले नाही. मात्र वेळप्रसंगी मारायलाही कमी करणार नाही. यावर कोणीही आमदार, खासदार बोलताना दिसत नाहीत.
लवकरच ऊस परिषद
ऊस दराचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या वर्षीची एफआरपीची रक्कम अद्याप कारखानदारांनी दिलेली नाही. उधारी किती दिवस असावी, याला मर्यादा आहेत. एखाद्या बँकेने दोन महिन्यासाठी जरी पैसे दिले तरी ते व्याज लावतात. मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांची उर्वरित रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही सहकार आयुक्तांशी येत्या चार दिवसात मिटींग करणार आहे. तसेच एफआरपी, उपपदार्थांचे उत्पादन, ऊस उत्पादनासाठी येणार खर्च आदी विषयावर व्यापक चर्चा करून ऊस दराविषयीची भुमिका स्पष्ट करण्यासाठी लवकरच कराडमध्ये ऊस परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याचेही आ. बच्चू कडू यांनी सांगितले.
मंत्रालयासमोर बावनकुळे यांचा उलटा पुतळा
सध्या शेतकऱ्यांना अडचणी आणून वीज बिल वसुली केली जात आहे. वीज बिलाबाबत चुकीचा काढलेला आदेश पंधरा दिवसात मागे घेतला नाहीतर मंत्रालयासमोर ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा पाय बांधलेला उलटा पुतळा टांगून आंदोलन करणार आहे. तसेच भुगर्भातील पाणी उपसा केले म्हणून फक्त शेतकऱ्यांवर पाणीकर लावून शेतकऱ्यांच्या विरोधात हा कायदा केला जात आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कायद्याला येत्या अधिवेशनात आम्ही विरोध करणार असल्याचे आ. कडू यांनी सांगितले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |