सातारा : शिक्षण प्रचंड महाग झालंय. खासगी शिक्षण संस्थांचे आक्रमण सरकारी शिक्षण व्यवस्थेला नेस्तनाबूत करत आहे. परिणामतः मोफत आणि सक्तिच्या शिक्षण संकल्पनेचा बोजवारा उडालाय. भविष्यात केवळ महालापुरतेच शिक्षण मर्यादीत राहील. पालापर्यत ते पोहचेल की नाही अशी भीती आहे. ही भयावह परिस्थिती वेळीच रोखली पाहिजे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत नव्याने बदल होणं आवश्यक असून शिक्षण हा स्टेटसचा नव्हे तर तो नॉलेजचा भाग आहे, ही मानसिकता समाजमनात रुजवावी लागेल, असे विचार विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अरुण जावळे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य टी.एन. मिसाळ यांनी भूषविले तर अरुणभाऊ पोळ, के. एम. पाटोळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अरुण जावळे पुढे म्हणाले, माणूस हा आजीवन विद्यार्थी असतो. तो सतत काहीतरी शिकत असतो आणि येत असलेल्या अनुभवातून स्वतःचे आयुष्य समृध्द करत असतो. अशा विद्यार्थासमोर जगातला सर्वात हुशार विद्यार्थी असणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ठेवणं महत्वपूर्ण होतं. म्हणून तब्बल १५ वर्षे मी सरकार दरबारी प्रयत्न केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा शासनाने विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. याचे मला मनस्वी समाधान आणि आनंद आहे. ही विद्यार्थी दिवसाची चळवळ निरंतरपणे सुरू ठेवल्यास नवभारताच्या भाविष्याची जडणघडण मजबूत होण्यास मदत होणार आहे. कारण आज नवभारताचा कणा विद्यार्थी आणि तरुणाई आहे. जगाच्या पाठीवर तरुणाईची सर्वात जास्त टक्केवारी असणारा कोणता देश असेल तर तो भारत आहे. त्यामुळे भारताला जगात स्वतःची सर्व पातळ्यावरील ताकद दाखविण्याची संधी आहे.
उद्याचा नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभारायचा असेल, तर तमाम गोरगरिबबांच्या, वंचितांच्या आणि एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणण्याची आणि एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे पाहण्याची आवश्यकता आहे. यासाठी डॉ. आंबेडकरांचा एकूणच संघर्ष समजून घेतला पाहिजे, त्यांचे विचारसाहित्य वाचले पाहिजे, त्यांचा उत्तुंग आदर्श घेऊन प्रज्ञेच्या नभांगणात भरारी घेतली पाहिजे, असेही अरुण जावळे यांनी शेवटी स्पष्ट केले.
टी. एन. मिसाळ यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून झगडल्यास कोणताच विद्यार्थी अथवा माणूस जगाच्यापाठीवर यशापासून दूर राहणार नाही. प्रास्ताविक अरुणभाऊ पोळ यांनी तर सुत्रसंचालन पाटोळे यांनी केले. असंख्य विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |