11:25pm | Nov 22, 2018 |
सातारा : मराठा आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल याविषयी खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. मराठा व इतर सवर्णांना आरक्षण द्यायचे असेल, तर सर्व पक्षांची सहमती घेऊन संसदेत कायदा केला पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी येथे व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. राज्यात सध्या मुळातच ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे अडचणी आहेत. तथापि, मराठा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मराठा व इतर सवर्णांना आर्थिक निकष लावून शिक्षण व नोकऱ्यात २५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे आठवले म्हणाले.
केंद्रातील सरकारच्या विरोधात महागठबंधन करण्याच्या हालचाली चालल्या असल्या तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची कोणाची तयारी नाही. त्यांच्याकडे ४ - ५ कॅप्टन आहेत. त्यामुळे कोणी कितीही आकांडतांडव केले तरी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्यात काही अडचण येईल असे आपणास वाटत नाही असे ते म्हणाले.
शिवसेना - भाजपची लोकसभेला युती होईल, पण विधानसभेचे काही सांगता येत नाही असा अंदाज व्यक्त करत आठवले यांनी, २०१४ च्या निवडणुकीत युतीने ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शिवसेना - भाजपने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवून त्यात चांगले यश मिळवले आहे. साडेचार वर्षात दोन्ही पक्षांची ताकद वाढली आहे. त्यामुळे लोकसभेला युती झाल्यास ४५ ते ४६ जागा मिळतील. असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी हे शांत राजकारणी आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अटलजी यांच्यातील संबंध विचारात घ्यावेत. काही मतभेद असतील तर ते मिटवून एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मोदी सरकार दलितविरोधी असल्याचा होत असलेला आरोप आठवले यांनी पेâटाळून लावला. बाबासाहेबांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम ६ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे. सरकार दलितांच्या हिताचेच काम करत आहे. संविधानाचे संरक्षण करण्याचे काम आमचे आहे. दलितविरोध करून कोणालाही निवडणुका जिंकता येणार नाहीत असे ते म्हणाले. वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी अशा शब्दात त्यांनी वंचित आघाडीची खिल्ली उडवली. वंचित आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादीचीच मते घेणार आहे. त्यामुळे त्या आघाडीचा भाजपला फायदाच होईल, असा दावा आठवले यांनी यावेळी केला.
राम मंदिरासंदर्भात लोकांच्या भावना तीव्र आहेत. पण कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी मंदिर बांधले जावू नये. जी जागा हिंदुंना दिली आहे, तेथे मंदिर बांधावे. जी जागा मुस्लिमांना दिली आहे, त्या ठिकाणी त्यांना मशिद, शिक्षण संस्था, जे काही बांधायचे असेल ते बांधावे. तसेच या दोन्हीसोबत त्या ठिकाणी बुध्द विहारही उभे राहिले तर त्यातून राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उदयनराजेंना पुन्हा साकडे
खासदार उदयनराजे यांना येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यास त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत अशा शब्दात आठवले यांनी उदयनराजे यांना पुन्हा एकवार साकडे घातले. गेल्या निवडणुकीवेळी त्यांच्यासाठीच आम्ही सातारची जागा घेतली होती. यावेळी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची खात्री नाही. ते रिपब्लिकन पक्षात आल्यास पक्षाची प्रतिमा उंचावेल असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |